शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

नवी मुंबईसह पनवेलमध्ये जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 23:22 IST

वाशीमध्ये फटाक्यांची आतषबाजी : पेढे वाटून आनंद साजरा; सैनिकांच्या धाडसाचे कौतुक

नवी मुंबई, पनवेल : भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील तीन ठिकाणी हल्ला केल्यानंतर पनवेलसह नवी मुंबईमधील नागरिकांनी जल्लोष केला. काश्मीरमधील जवानांवरील हल्ल्याचा सैनिकांनी बदला घेतल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली असून, फटाक्यांची आतषबाजी करून व पेढे वाटून आनंद साजरा केला.

काश्मीरमधील पुलवामामध्ये जवानांवर झालेल्या हल्ल्यास जशास तसे उत्तर द्यावे, अशी मागणी देशवासीयांकडून केली जात होती. हवाई दलाने मंगळवारी पहाटे पाकिस्तानमधील तीन ठिकाणची जैश ए मोहम्मदची ठिकाणे उद्ध्वस्त केल्याचे समजताच नवी मुंबईकरांनी जल्लोष सुरू केला. शिवसेना व भाजपा पदाधिकाऱ्यांनी वाशीमधील शिवाजी चौकामध्ये फटाक्यांची आतषबाजी केली. शहरात पेढे वाटले. पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी केली. काश्मीरमधील हल्ल्याचा बदला घेतल्याविषयी समाधान व्यक्त केले. वाशीमधील जल्लोषप्रसंगी भाजपाचे जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत, शिवसेना उपनेते विजय नाहटा, विठ्ठल मोरे, विजय माने, एम. के. मढवी, रंजना शिंत्रे व इतर मान्यवर उपस्थित होते.

नेरुळमध्ये रहिवाशांनी साखर वाटून भारतीय जवानांच्या पराक्रमाचे कौतुक केले. आर्मी कॉलनीमध्ये वास्तव्य करणाऱ्या सैन्य दलामधील अधिकाऱ्यांनीही हवाई दलाच्या पराक्रमाचा सर्वांना अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. १९६५ व १९७१ च्या युद्धात सहभागी झालेल्या निवृत्त कर्नल प्रताप शंकर शिंदे, एस. बी. खन्ना व इतरांनी यापूर्वीच्या युद्धाच्या आठवणींना उजाळा दिला. या घटनेमुळे पाकिस्तान हादरला असल्याची प्रतिक्रियाही शहरवासीयांनी व्यक्त केली. पनवेल परिसरामधील नागरिकांनीही देशवासीयांना अभिमान वाटेल अशी कामगिरी सैनिकांनी केली असल्याचे मत व्यक्त केले. पनवेल भाजपा कार्यालयामध्ये सिडको अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्यासह पदाधिकाºयांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला.