शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
7
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
8
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
9
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
10
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
11
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
12
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
13
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
14
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
15
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
16
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
19
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
20
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?

नवी मुंबईसह पनवेलमध्ये जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 23:22 IST

वाशीमध्ये फटाक्यांची आतषबाजी : पेढे वाटून आनंद साजरा; सैनिकांच्या धाडसाचे कौतुक

नवी मुंबई, पनवेल : भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील तीन ठिकाणी हल्ला केल्यानंतर पनवेलसह नवी मुंबईमधील नागरिकांनी जल्लोष केला. काश्मीरमधील जवानांवरील हल्ल्याचा सैनिकांनी बदला घेतल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली असून, फटाक्यांची आतषबाजी करून व पेढे वाटून आनंद साजरा केला.

काश्मीरमधील पुलवामामध्ये जवानांवर झालेल्या हल्ल्यास जशास तसे उत्तर द्यावे, अशी मागणी देशवासीयांकडून केली जात होती. हवाई दलाने मंगळवारी पहाटे पाकिस्तानमधील तीन ठिकाणची जैश ए मोहम्मदची ठिकाणे उद्ध्वस्त केल्याचे समजताच नवी मुंबईकरांनी जल्लोष सुरू केला. शिवसेना व भाजपा पदाधिकाऱ्यांनी वाशीमधील शिवाजी चौकामध्ये फटाक्यांची आतषबाजी केली. शहरात पेढे वाटले. पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी केली. काश्मीरमधील हल्ल्याचा बदला घेतल्याविषयी समाधान व्यक्त केले. वाशीमधील जल्लोषप्रसंगी भाजपाचे जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत, शिवसेना उपनेते विजय नाहटा, विठ्ठल मोरे, विजय माने, एम. के. मढवी, रंजना शिंत्रे व इतर मान्यवर उपस्थित होते.

नेरुळमध्ये रहिवाशांनी साखर वाटून भारतीय जवानांच्या पराक्रमाचे कौतुक केले. आर्मी कॉलनीमध्ये वास्तव्य करणाऱ्या सैन्य दलामधील अधिकाऱ्यांनीही हवाई दलाच्या पराक्रमाचा सर्वांना अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. १९६५ व १९७१ च्या युद्धात सहभागी झालेल्या निवृत्त कर्नल प्रताप शंकर शिंदे, एस. बी. खन्ना व इतरांनी यापूर्वीच्या युद्धाच्या आठवणींना उजाळा दिला. या घटनेमुळे पाकिस्तान हादरला असल्याची प्रतिक्रियाही शहरवासीयांनी व्यक्त केली. पनवेल परिसरामधील नागरिकांनीही देशवासीयांना अभिमान वाटेल अशी कामगिरी सैनिकांनी केली असल्याचे मत व्यक्त केले. पनवेल भाजपा कार्यालयामध्ये सिडको अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्यासह पदाधिकाºयांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला.