शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मोरबे धरणग्रस्त गावांतील कामे नवी मुंबई महापालिका करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 00:52 IST

मोरबे धरण प्रकल्पाअंतर्गत सात गावे आणि आठ वाड्या विस्थापित झाल्या आहेत.

नवी मुंबई : मोरबे धरण प्रकल्पाअंतर्गत सात गावे आणि आठ वाड्या विस्थापित झाल्या आहेत. या पुनर्वसित गावांसाठी पाणीपुरवठा करण्याचे काम नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यामध्ये जलवाहिन्या टाकणे, भूस्तरीय टाक्या बांधणे, रस्त्यांचे डांबरीकरण करणे आदी कामे सुमारे पाच कोटी रुपयांची कामे करण्यात येणार आहेत. या बाबतचा प्रस्ताव प्रशासनाने शनिवार, १९ जानेवारी रोजी झालेल्या महासभेत मंजुरीसाठी मांडला होता, त्याला सर्वानुमते मंजुरी मिळाली आहे.मोरबे धरण प्रकल्पांतर्गत विस्थापित झालेल्या गावांमधील नागरिकांना नळ योजना, खेळाचे मैदान असलेली शाळा, चावडी व समाजमंदिर, अंतर्गत रस्ते, विजेची सोय, दहनभूमी, दफनभूमी, उघडी गटारे, सार्वजनिक शौचालय, गायरान जमीन, गुरचरण, परिवहन थांब्यासाठी जागा, खेळवाडी, भविष्यातील वाढीव जमीन देऊन विस्थापित करण्यात आले आहे.गावांना २००३ सालापासून नागरी सुविधा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पुरविण्यात येत असून, पाणीपुरवठा करण्यास नकार दिला असून सदरच्या योजना भविष्यात नवी मुंबई महापालिकेने चालवाव्यात, यासाठी नागरिकांनी मोरबे धरणावर मोर्चे काढून वेळ प्रसंगी पाणी बंद करून आंदोलने केली आहेत. या ठिकाणी टंचाईग्रस्त गावांना महापालिकेच्या माध्यमातून टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.>पाच कोटी १६ लाख खर्चडांबरीकरण करणे, जलवाहिन्या टाकणे. बहुस्तरीय टाक्या व जलशुद्धीकरण केंद्र बांधणे आदी कामांचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला होता. या प्रस्तावाला महासभेची मंजुरी मिळाली आहे. कामासाठी पाच कोटी १६ लाख ७१ हजार रु पये खर्च येणार आहे.