शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

नैसर्गिक नाल्यांचा झोपडीवासीयांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 05:54 IST

जेएनएनयूआरएम अंतर्गत निधी मिळाला नसल्याने महापालिकेचे एकत्रित नाला व्हिजन बारगळले आहे.

नवी मुंबई : जेएनएनयूआरएम अंतर्गत निधी मिळाला नसल्याने महापालिकेचे एकत्रित नाला व्हिजन बारगळले आहे. नाल्यांना संरक्षण भिंत नसल्यामुळे नेरुळ ते दिघा दरम्यान अनेक ठिकाणी पावसाचे पाणी वसाहतीमध्ये घुसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेने वेळेत उपाययोजना केल्या नाहीत, तर गंभीर दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.नवी मुंबई महानगरपालिकेच्या एक बाजूला डोंगररांगा व दुसऱ्या बाजूला खाडी आहे. पावसाळ्यात डोंगरावरून येणारे पाणी १० प्रमुख व २९ मोठ्या नाल्यांमधून खाडीला जाऊन मिळते. अनेक नाल्यांमधून नदीप्रमाणे पाणी ओसंडून वाहत असते. २६ जुलै २००५मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये नाल्यांमधील पाणी वसाहतीमध्ये जाऊन अनेकांना जीव गमवावा लागला होता. यानंतरही इंदिरानगर परिसरामध्ये नाल्यामध्ये वाहून गेल्याने नागरिकांचा जीव गेला होता. नैसर्गिक नाल्यांचे संरक्षण करण्यासाठी ठोस योजनाच नसल्यामुळे नाल्यांच्या काठावर अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. एमआयडीसीमध्ये काही ठिकाणी कारखान्यांना भूखंड देण्यासाठी प्रवाह बदलण्यात आले आहेत. नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात डेब्रिज टाकल्याने पात्र अरुंद झाले आहे. अतिक्रमणामुळे पावसाळ्यात नाल्यातील पाणी रोडवर व वसाहतीमध्ये जाऊ लागले आहे. माजी महापौर सुधाकर सोनावणे, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, शिवसेना नगरसेवक बहादूर बिस्ट यांनी वेळोवेळी हा मुद्दा महापालिकेच्या सर्वसाधारण व इतर सभांमध्ये उपस्थित केला होता. महापालिकेने दहा वर्षांपूर्वीच एकत्रित नाला व्हिजनची योजना तयार करून जेएनएनयूआरएम योजनेअंतर्गत निधी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. नगरसेवकांनी नाल्यांना संरक्षण भिंत बांधण्याची मागणी केल्यानंतर नाला व्हिजनअंतर्गत कामे केली जाणार असल्याचे सांगितले जात होते; परंतु जेएनएनयूआरएमने नाला व्हिजनची योजना नाकारल्यामुळे पालिकेला स्वत:च्या निधीमधून हे काम करावे लागणार आहे.एमआयडीसीमध्ये बोणसरी, इंदिरानगर, दिघा, चिंचपाडा, सुभाषनगर, इलठाणपाडा व इतर अनेक ठिकाणी नाल्यांच्या बाजूला वसाहती आहेत. यापैकी फक्त इंदिरानगरमध्ये तेथील नागरिकांनी व लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करून नाल्याला संरक्षण भिंत बांधून घेतली आहे. इतर ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्यात आलेली नाही. परिणामी, पावसाळ्यात पूरसदृश स्थिती निर्माण होत आहे. एमआयडीसीमध्ये दोन ठिकाणी नाल्यावर कंपनी उभी राहिली आहे. नैसर्गिक नाला बुजवून त्यावर बांधकाम केल्यामुळे पाण्याचा योग्य निचरा होत नाही. महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे व नैसर्गिक नाल्यांचे संरक्षण व देखभालीसाठी धोरण नसल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. लवकर याविषयी ठोस निर्णय न घेतल्यास त्याचा फटका रहिवाशांना बसणार आहे.चिंचपाड्याचा प्रस्ताव तयारमहापालिका प्रभाग-८ मधील मनपा शाळा क्रमांक ५३ ते रिलायबल कंपनीपर्यंत नाल्यातील पाणी प्रत्येक वर्षी वसाहतीमध्ये जात आहे. जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विरोधी पक्षनेते विजय चौगुले व नगरसेवक बहादूर बिस्ट यांनी नाल्याला संरक्षण भिंत बांधण्यात यावी, यासाठी मागणी केली आहे. प्रशासनाने सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते; परंतु अद्याप हा ठराव सभेपुढे आलेला नाही. यामुळे लोकप्रतिनिधींसह नागरिकांमध्ये असंतोष असून, अशीच स्थिती राहिल्यास आंदोलनाचा इशारा नगरसेवक बहादूर बिस्ट यांनी दिला आहे. पालिकेला साकडेनेरुळ एमआयडीसीमधील बोणसरी झोपडपट्टीमध्येही प्रत्येक वर्षी पावसाचे पाणी शिरत आहे. शिवसेनेच्या वतीने वारंवार महापालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. शाखाप्रमुख महेश कोठीवाले, मोहम्मद शेख, महेबूब पटेल, सागर मनगूतकर, शांताराम गावई, मुबारक चुगींवाले, कल्मेश मनगूतकर, मिलन दास, राजू मोडके, जलील चुगींवाले, हितेश जाधव यांनी यासाठी वारंवार पत्रव्यवहार केला आहे.प्रवाह बदललाएमआयडीसीमध्ये दोन कंपन्यांनाना नैसर्गिक नाल्याच्या दोन्ही बाजूचा भूखंड दिला आहे. कंपनीने नैसर्गिक नाला बुजविला आहे. नाल्यावर बांधकाम केले असून, आकार कमी केला आहे. याविषयी एमआयडीसीकडे तक्रारी करूनही त्याची दखल घेतलेली नाही.