शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

नवी मुंबईतून राष्ट्रवादीला मताधिक्याची आस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 23:29 IST

ठाणे लोकसभा मतदारसंघ : गणेश नाईक यांची प्रतिष्ठा पणाला

नवी मुंबई : ठाणे लोकसभा क्षेत्रात सहापैकी विधानसभेचे ऐरोली आणि बेलापूर हे दोन मतदारसंघ नवी मुंबई महापालिका क्षेत्रात मोडतात. या दोन्ही मतदारसंघात राष्ट्रवादीचा बोलबोला असला, तरी मोदी लाटेत बेलापूरचा किल्ला राष्ट्रवादीला गमवावा लागला होता, तर ऐरोली विधानसभा क्षेत्रात अगदी निसटता विजय मिळविण्यास राष्ट्रवादीला यश आले होते. ठाणे लोकसभा मतदारसंघातून या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने अनंत परांजपे यांना उमेदवारी दिली होती. त्यांना निवडून आणण्याचा विडा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री गणेश नाईक यांनी उचलला होता. लोकसभेच्या मागील निवडणुकीत नवी मुंबईतून शिवसेनेचे राजन विचारे यांना आघाडी मिळाली होती. मात्र, या वेळी ही आघाडी मोडीत काढून परांजपे यांना मताधिक्य मिळेल, असा विश्वास राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटत आहे.

लोकसभेच्या २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत राजन विचारे यांनी राष्ट्रवादीचे संजीव नाईक यांचा जवळपास दोन लाख मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत विचारे यांना बेलापूर मतदारसंघातून तब्बल ३५ हजार, तर ऐरोली मतदारसंघातून जवळपास २० हजार मताधिक्य मिळाले होते. एकूणच त्या निवडणुकीत शिवसेनेचे राजन विचारे यांनी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातून सुमारे ५५ हजार मतांची लीड घेतली होती. या वेळी विचारे यांना नवी मुंबईतून मागच्यापेक्षा अधिक मताधिक्य मिळेल, असा विश्वास शिवसेनाला वाटत आहे. तर नवी मुंबईतून परांजपे यांना किमान ४० हजारांचे मताधिक्य मिळेल, अशी खात्री राष्ट्रवादीला वाटते आहे.

मागील पाच वर्षांत दिघ्यातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आला. राष्ट्रवादीचे नवीन गवते यांच्या कुटुंबात तीन नगरसेवक आहेत, त्यामुळे या परिसरात गवते कुटुंबीयांचा प्रभाव आहे. त्यामुळे या निवडणुकीत या विभागातील मते कोणाच्या पारड्यात पडली, हे उद्या मतमोजणीतून स्पष्ट होणार आहे. त्याचप्रमाणे विधानसभेच्या मागील निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर लढलेले संदीप नाईक यांच्या विरोधात लढलेले त्यांचे चुलत बंधू वैभव नाईक यांना ४६ हजार मते मिळाली होती, या वेळी नाईक कुटुंबीयांतील राजकीय दरी दूर झाल्याचे दिसून आले. त्याचा राष्ट्रवादीचे अनंत परांजपे यांना किती फायदा होतो, हे स्पष्ट होणार आहे.माजी मंत्री गणेश नाईक यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती, त्यामुळे परांजपे यांना निवडून आणण्यासाठी त्यांनी प्रचाराचा धुराळा उडविला. त्यांच्या सोबतीला माजी खासदार संजीव नाईक, आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक मैदानात उतरल्याचे पाहावयास मिळाले. या वेळी काँग्रेसशी जुळवून घेण्यातही नाईक यांना यश आल्याचे दिसून आले. त्यामुळे याचा किती प्रभाव मतदारांवर पडतो, हेही गुरुवारी स्पष्ट होणार आहे.युतीमध्ये मनोमिलनाचा अभावबेलापूर मतदारसंघात भाजपच्या मंदा म्हात्रे आमदार आहे. विधानसभेच्या मागील निवडणुकीत सेनेचे विजय नाहटा यांना ५०,९८३ मते पडली होती. तर राष्ट्रवादीचे गणेश नाईक यांच्यापेक्षा अवघ्या दीड हजार मताधिक्यांनी विजयी झालेल्या मंदा म्हात्रे यांना ५५,३१६ इतकी मते मिळाली होती.नाहटा आणि मंदा म्हात्रे यांना मागच्या निवडणुकीत मिळालेली एकगठ्ठा मते विचारे यांच्या पारड्यात पडतील, अशी अटकळ शिवसेनेचे नेते बांधत आहेत; परंतु प्रत्यक्ष प्रचारादरम्यान भाजप आणि शिवसेना यांच्यात फारसे मनोमिलन झाल्याचे दिसले नाही, त्यामुळे बेलापूरमधून राजन विचारे मतांची आघाडी राखण्यात कितपत यशस्वी होतील, हे मतमोजणीतून स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :maval-pcमावळ