शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
3
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
7
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
8
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
9
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
10
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
11
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
12
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
13
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
14
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
15
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
16
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
17
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
18
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
19
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
20
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले

शासनाचे माथाडी कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष, नरेंद्र पाटील यांची घणाघाती टिका

By नामदेव मोरे | Updated: March 23, 2023 19:40 IST

माथाडी चळवळीची अवस्था वाईट झाल्याची खंत...

नवी मुंबई : राज्यातील माथाडी कामगार चळवळीची अवस्था वाईट झाली आहे. १५ वर्षात अनेक सरकारे बदलली पण कोणीच कामगारांचे प्रश्न सोडविले नाहीत. आतापर्यंतचे कामगार मंत्री स्वत: उद्योजक व कारखानदार असल्यामुळे त्यांना कामगारांचे हितच कळत नाही. आत्ताच्या मंत्र्यांना कामगारांचे प्रश्न समजत नसल्याची घणाघाती टिका माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी केली आहे. कामगारांचे प्रश्न सोडविले जात नसल्यामुळे संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीला कोणत्याच मंत्री व नेत्यांना न बोलावण्याचा निर्णय घेतल्याचेही स्पष्ट केले.

महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनीयनचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या ४१ व्या पुण्यतिथीनिमीत्त माथाडी भवनमध्ये कामगार मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र पाटील यांनी कामगारांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. माथाडी कामगारांचे प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबीत आहेत. बोर्ड उद्धस्त होत आहेत. बोर्डामध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. बाजार समितीमधील कामे एमआयडीसीत स्थलांतर होत आहेत. १५ वर्षापासून विविध सरकारकडे पाठपूरावा करून कामगारांचे प्रश्न सुटत नाहीत. फक्त आश्वासनांवर बोळवण केली जात आहे. आत्ताच्या कामगार मंत्र्यांना कामगारांचे प्रश्नच समजत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. १५ वर्षातले कामगार मंत्री स्वत: उद्योजक किंवा कारखानदार असल्यामुळे त्यांना कामगारांचे हित समजत नसल्याची खंत व्यक्त केली. याला गणेश नाईक अपवाद असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आमदार शशिकांत शिंदे यांनी कामगार चळवळ संकटात असून ती टिकविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. अण्णासाहेबांनी मराठा समाजासह कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी जीवाचे रान केले. मराठा आरक्षणासाठी स्वत:चे बलीदान दिले. आता कामगारांचे हित जपण्यासाठी पुन्हा एकदा लढा उभारण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. यावेळी गुलाबदार जगताप, संघटनेचे अध्यक्ष एकनाथ जाधव, पोपटराव देशमूख, ऋषीकांत शिंदे, रविकांत पाटील, ॲड. भारती पाटील, रमेश पाटील, शुभांगी पाटील, शशिकला पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

मंत्र्यांसह नेत्यांना आमंत्रण नाही -अण्णासाहेब पाटील जयंती व पुण्यतिथीला प्रत्येक वर्षी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सत्ताधारी व विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांना आमंत्रण दिले जाते. मंत्रीही या मेळाव्याला उपस्थित रहात असतात. परंतु मागील १५ वर्षात कामगारांचे प्रश्न न सुटल्यामुळे यावर्षी कोणत्याच मंत्र्याला व नेत्याला मेळाव्योच आमंत्रण देण्यात आले नाही. मागील मागील चार दशकात पहिल्यांदा मंत्री व नेत्यांशिवाय मेळावा पार पडला. प्रश्न सुटत नसतील तर नेत्यांना बोलवायचे कशाला असा प्रश्न नरेंद्र पाटील यांनी उपस्थित केला.

कामगारांपासून नेत्यांनी आत्मचिंतन करावे -नरेंद्र पाटील यांनी सरकारवर टिका करतानाच संघटनेमधील त्रुटींवरही बोट ठेवले. कामगारांनी व संघटनेतील नेत्यांनीही आत्मचिंतन करावे. कामगार चळवळीसमोरील प्रश्नांना आपणही काही प्रमाणात जबाबदार आहोत. कामगारांच्या हितापेक्षा ठेकेदारीला प्राधान्य दिले जात आहे. एपीएमसीमधील माल एमआयडीसीत का जातो. माथाडींच्या हक्काची कामे त्यांना का भेटत नाहीत याविषयी चिंतन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.