शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शासनाचे माथाडी कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष, नरेंद्र पाटील यांची घणाघाती टिका

By नामदेव मोरे | Updated: March 23, 2023 19:40 IST

माथाडी चळवळीची अवस्था वाईट झाल्याची खंत...

नवी मुंबई : राज्यातील माथाडी कामगार चळवळीची अवस्था वाईट झाली आहे. १५ वर्षात अनेक सरकारे बदलली पण कोणीच कामगारांचे प्रश्न सोडविले नाहीत. आतापर्यंतचे कामगार मंत्री स्वत: उद्योजक व कारखानदार असल्यामुळे त्यांना कामगारांचे हितच कळत नाही. आत्ताच्या मंत्र्यांना कामगारांचे प्रश्न समजत नसल्याची घणाघाती टिका माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी केली आहे. कामगारांचे प्रश्न सोडविले जात नसल्यामुळे संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीला कोणत्याच मंत्री व नेत्यांना न बोलावण्याचा निर्णय घेतल्याचेही स्पष्ट केले.

महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनीयनचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या ४१ व्या पुण्यतिथीनिमीत्त माथाडी भवनमध्ये कामगार मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र पाटील यांनी कामगारांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. माथाडी कामगारांचे प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबीत आहेत. बोर्ड उद्धस्त होत आहेत. बोर्डामध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. बाजार समितीमधील कामे एमआयडीसीत स्थलांतर होत आहेत. १५ वर्षापासून विविध सरकारकडे पाठपूरावा करून कामगारांचे प्रश्न सुटत नाहीत. फक्त आश्वासनांवर बोळवण केली जात आहे. आत्ताच्या कामगार मंत्र्यांना कामगारांचे प्रश्नच समजत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. १५ वर्षातले कामगार मंत्री स्वत: उद्योजक किंवा कारखानदार असल्यामुळे त्यांना कामगारांचे हित समजत नसल्याची खंत व्यक्त केली. याला गणेश नाईक अपवाद असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आमदार शशिकांत शिंदे यांनी कामगार चळवळ संकटात असून ती टिकविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. अण्णासाहेबांनी मराठा समाजासह कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी जीवाचे रान केले. मराठा आरक्षणासाठी स्वत:चे बलीदान दिले. आता कामगारांचे हित जपण्यासाठी पुन्हा एकदा लढा उभारण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. यावेळी गुलाबदार जगताप, संघटनेचे अध्यक्ष एकनाथ जाधव, पोपटराव देशमूख, ऋषीकांत शिंदे, रविकांत पाटील, ॲड. भारती पाटील, रमेश पाटील, शुभांगी पाटील, शशिकला पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

मंत्र्यांसह नेत्यांना आमंत्रण नाही -अण्णासाहेब पाटील जयंती व पुण्यतिथीला प्रत्येक वर्षी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सत्ताधारी व विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांना आमंत्रण दिले जाते. मंत्रीही या मेळाव्याला उपस्थित रहात असतात. परंतु मागील १५ वर्षात कामगारांचे प्रश्न न सुटल्यामुळे यावर्षी कोणत्याच मंत्र्याला व नेत्याला मेळाव्योच आमंत्रण देण्यात आले नाही. मागील मागील चार दशकात पहिल्यांदा मंत्री व नेत्यांशिवाय मेळावा पार पडला. प्रश्न सुटत नसतील तर नेत्यांना बोलवायचे कशाला असा प्रश्न नरेंद्र पाटील यांनी उपस्थित केला.

कामगारांपासून नेत्यांनी आत्मचिंतन करावे -नरेंद्र पाटील यांनी सरकारवर टिका करतानाच संघटनेमधील त्रुटींवरही बोट ठेवले. कामगारांनी व संघटनेतील नेत्यांनीही आत्मचिंतन करावे. कामगार चळवळीसमोरील प्रश्नांना आपणही काही प्रमाणात जबाबदार आहोत. कामगारांच्या हितापेक्षा ठेकेदारीला प्राधान्य दिले जात आहे. एपीएमसीमधील माल एमआयडीसीत का जातो. माथाडींच्या हक्काची कामे त्यांना का भेटत नाहीत याविषयी चिंतन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.