शहरं
Join us  
Trending Stories
1
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
2
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
3
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
4
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
5
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
6
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
7
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
8
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
9
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
10
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
11
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
12
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
13
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
14
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
15
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
16
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
17
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
18
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
19
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
20
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!

पनवेलमधील नालेसफाई अर्धवटच; पाणी तुंबण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 01:41 IST

प्रशासनाच्या निष्काळजीविषयी नागरिकांमध्ये असंतोष

- वैभव गायकरपनवेल : मागील वर्षी सिडको वसाहतीसह पनवेल महानगरपालिका क्षेत्रात तुंबलेल्या पाणी ठिकाणांत पुन्हा एकदा पाणी तुंबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा ठिकाणांची साफसफाई योग्यरीत्या झाली नसल्याचे दिसून येत आहे. यामध्ये सायन-पनवेल महामार्गाचाही समावेश असून प्रशासनाच्या निष्काळजीविषयी नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.खारघर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, करंजाडे तसेच पनवेल शहराचा यामध्ये समावेश आहे. पाणी तुंबण्याचा धोका लक्षात घेता दोन्ही प्रशासनामार्फत नाले, गटार आदीची कामे हाती घेण्यात आली. मात्र, यामधील महत्त्वाची समस्या संबंधित कंत्राटदारांना अपयश प्राप्त झाले आहे. सध्याच्या घडीला नाल्यांची साफसफाई करण्यात आली आहे. मात्र नाले, गटार आदीमधील गाळ बाहेर काढले जात नसल्याने पुन्हा एकदा शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी पाणी पोहोचण्याचा धोका कायम आहे. नुकतीच पावसाला सुरु वात झाली आहे. मात्र, काही ठिकाणच्या अपुऱ्या कामांमुळे पावसाचे पाणी साचण्यास सुरु वात झाली आहे. खारघर रेल्वेस्थानक, कळंबोली उड्डाणपुलाखाली, कळंबोली डेपो परिसर, कळंबोली उड्डाणपुलाजवळील नाला, खारघर टोलनाका, एमजीएम जंक्शन, खांदा कॉलनी उड्डाणपूल, कामोठे शहरातील स्टेशन परिसर, बांठिया स्कूल नवीन पनवेल, पनवेल शहरातील कफनगर, कोळीवाडा, तालुका पोलीस स्टेशन रोड आदी ठिकाणी पावसाळ्यात नियमित पाणी साचते. पावसाळ्यात नाल्यांची सफाई होते. मात्र, त्यामधील गाळ काढला जात नसल्याने नियमित पाणी तुंबण्याचा प्रकार वाढत आहे. सायन-पनवेल महामार्गावर कळंबोली स्थानकाजवळ जवाहर इंडस्ट्रीमधील पाण्याचा निचरा योग्यरीत्या होत नसल्याने येथील पाणी महामार्गावर साचत आहे. या ठिकाणच्या नाल्याच्या कमी आकारामुळे ही समस्या उद्भवली आहे. पनवेल शहरात रस्त्यांचे काँक्र ीटीकरण करण्यात आले आहे. मात्र, रस्त्याच्या दुतर्फा गटारांची कामे पूर्ण झाली नसल्याने पावसाचे पाणी या ठिकाणच्या सोसायटीत शिरण्याची भीती आहे. मागील वर्षी सायन-पनवेलमधील रस्त्याच्या अर्धवट कामांमुळे अनेक ठिकाणी पाणी साचत होते. या वर्षी सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्त्याच्या दुतर्फा नाल्यांची सफाई तसेच ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा होत नाही, अशा ठिकाणी गटारे बांधण्यास सुरु वात केली आहे. अद्यापही हे काम सुरू आहे. मात्र, या मार्गाच्या दुतर्फा नाल्यामध्ये साचलेला गाळ सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत काढण्यात आलेला नाही. कोपरा गावाजवळील नाले आजही मातीने तुडुंब भरले आहेत. उरण फाटा या ठिकाणीही हीच अवस्था आहे. या मार्गालगत असलेल्या डोंगरावरील पाणी मोठ्या प्रमाणात मार्गावर दरवर्षी येते. यामुळे संपूर्ण मार्ग पाण्याखाली जात असल्याने याचा परिणाम वाहतुकीवर होतो. हेच मार्ग मोठ्या प्रमाणात धोकादायकझाले आहेत.शहरात पाणी साचणारी ठिकाणपनवेल - स्वामी नित्यानंद मार्ग, कफनगर, कोळीवाडा, तालुका पोलीस रोड, सहस्रबुद्धे हॉस्पिटलखारघर - खारघर स्टेशन, सेक्टर १२, सेक्टर १०, सेक्टर ८, कोपरा उड्डाणपूलकामोठे - सुषमा पाटील विद्यालय, स्टेशन रोड, वृंदावन पार्क, कामोठेसबवेकळंबोली - सुधागड शाळा, केएल ४, केएल ५, बस डेपो, एमजीएम जंक्शन, गुरु द्वारा रोडनवीन पनवेल - बांठिया स्कूल, खांदा जंक्शन, खांदा कॉलनी उड्डाणपुलाला जोडणारा रस्ता, आदईकरंजाडे -सेक्टर १ ते ४ या ठिकाणी पाणी तुंबण्याचा प्रकार जास्त आहे.