शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

नालेसफाईचा उडाला बोजवारा

By admin | Updated: June 6, 2016 01:40 IST

मान्सूनपूर्व कामांची डेडलाइन संपून देखील शहरातील महत्त्वाच्या नाल्यांची सफाई झालेली नसल्याचे पहायला मिळत आहे. यामुळे नाल्यातून वाहणारे पावसाचे पाणी तुंबून पूरपरिस्थिती

सूर्यकांत वाघमारे,  नवी मुंबईमान्सूनपूर्व कामांची डेडलाइन संपून देखील शहरातील महत्त्वाच्या नाल्यांची सफाई झालेली नसल्याचे पहायला मिळत आहे. यामुळे नाल्यातून वाहणारे पावसाचे पाणी तुंबून पूरपरिस्थिती उद्भवण्याचा धोका निर्माण झालेला आहे.यंदा देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. शिवाय अपेक्षित वेळेपेक्षाही लवकर पावसाची हजेरी लागणार आहे. त्यानुसार राज्यात काही ठिकाणी दोन दिवसांपासून पावसाला सुरवात झाली असून नवी मुंबईतही पावसाच्या हलक्या सरी झाल्या आहेत. मात्र पावसाळा तोंडावर आलेला असतानाही प्रशासन सज्ज झालेले नसल्याचे पहायला मिळत आहे. मान्सूनपूर्व कामांसाठी प्रशासनाकडून ठेकेदारांना ३१ मेची अंतिम मुदत देण्यात आलेली होती. ही मुदत उलटून गेली तरीही शहरातील मुख्य नाल्यांची अद्याप सफाई झालेली नाही. त्यामध्ये एपीएमसीमधील वाशी - सानपाडा मार्गालगतच्या मुख्य नाल्यासह, घणसोली, कोपरखैरणे व नेरुळ येथील नाल्यांचा समावेश आहे. सद्य:स्थितीला या नाल्यांमधील गाळ काढणे आवश्यक असतानाही त्यामध्ये डेब्रिज व मातीचे ढीग साचले आहेत. तर काही ठिकाणी नागरिकांनी अथवा व्यावसायिकांनी टाकलेल्या कचऱ्यामुळे नाल्याची कचराकुंडी झाल्याचे दिसत आहे. पावसाळ्यातही नाल्यांची हीच परिस्थिती राहिल्यास त्याठिकाणी पाणी तुंबून ते लगतच्या रहिवासी क्षेत्रात जाण्याची शक्यता आहे.शहरामधून गेलेले बहुतांश नाले औद्योगिक क्षेत्रातील दूषित अथवा सांडपाणी खाडीत सोडण्यासाठी वापरले जातात, तर याच मुख्य नाल्यांमधून डोंगरावरून शहराच्या दिशेने वाहत येणाऱ्या पाण्याचा प्रवाह खाडीकडे वळवला जातो. त्यामुळे पावसाळ्यात हे नाले तुडुंब भरुन वाहत असतात. त्याकरिता प्रतिवर्षी पावसाळ्यापूर्वी सर्व नाल्यांमधील गाळ काढला जातो. शिवाय पावसाळा संपेपर्यंत ठेकेदारांमार्फत नाल्यातील अडथळे हटवले जातात. मात्र यंदाचा पावसाळा तोंडावर आलेला असतानाही नाल्यांची सफाई झालेली नाही. परिणामी शहरातील अनेक विभागांमध्ये पूरपरिस्थती उद्भवण्याचा धोका आहे. वाशी-सानपाडा मार्गालगत मार्केटच्या बाजूचा नाला पूर्णपणे बुजलेला आहे. प्रतिवर्षी पावसाळ्यात हा नाला तुडुंब भरुन वाहत असल्यामुळे लगतचा मुख्य रस्ता देखील जलमय होत असतो. त्यामुळे या नाल्यातील गाळ काढणे आवश्यक असतानाही त्याकडे दुर्लक्ष झालेले आहे. परिणामी यंदाच्या पावसामुळे सदर नाल्यातील पाणी लगतच्या मार्केटमध्ये देखील घुसण्याचा धोका निर्माण झाला आहे, तर नेरुळच्या एसबीआय कॉलनीलगतच्या नाल्याच्या काँक्रीटीकरणाचे काम अद्यापही सुरू आहे. वेळीच हे काम पूर्ण न झाल्यामुळे अंतिम टप्प्यात सुरू असलेल्या घाईमुळे कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यामुळे शहरातील मान्सूनपूर्व कामांचा आढावा प्रशासनाकडून घेतला जाणे आवश्यक आहे. पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पाहणी दौऱ्यातून मे महिन्यात पावसाळापूर्व कामांचा आढावा घेतला होता. मात्र कामाची अंतिम मुदत संपल्यानंतर आढावा घेण्यात आलेला नसल्याचे नाल्यांच्या दुरवस्थेवरून दिसून येत आहे.