शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘नैना’ला चार वर्षांत मिळणार कोंढाणेचे ४०० एमएलडी पाणी; विस्थापित गावांचे होणार पुनर्वसन

By कमलाकर कांबळे | Updated: August 12, 2024 13:03 IST

धरणाचे काम पूर्ण करण्याचा सिडकोचा निर्धार; २००७ पासून रखडपट्टी

कमलाकर कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: कथित सिंचन घोटाळ्यामुळे दीर्घकाळ रखडलेल्या रायगड जिल्ह्यातील कोंढाणा धरणाचे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने सिडकोने कंबर कसली असून त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू होण्यापूर्वी या कामाचे कार्यादेश देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. कोंढाणे धरणामुळे सिडकोच्या माध्यमातून विकसित होत असलेल्या नैना क्षेत्रातील शहरांची तहान भागविता येणार आहे. पुढील चार वर्षांत हे धरणाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सिडकोने ठेवले आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता ४०० एमएलडी करण्याची योजना आहे.

उल्हास नदीवर कोंढाणे धरण आहे. २००७ पासून धरणाचा विस्तार रखडला. २०१७ मध्ये धरण सिडकोकडे हस्तांतरित झाले.तांत्रिक अडचणींमुळे धरणाचे काम रखडले. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी धरण बांधकामांसाठी ठेकेदार नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली आहे. 

विस्थापित गावांचे होणार पुनर्वसन

कर्जत तालुक्यातील उल्हास  नदीवर कोंढाणे गावात ४०० हेक्टर जागेवर कोंढाणे धरण विकसित केले जाणार आहे. या धरणाची उंची  ८० मीटर इतकी असणार आहे.  ज्यामध्ये संपूर्ण जलाशय पातळी उंचावर आहे. प्रस्तावित धरणामुळे कोंढाणे आणि चोची ही दोन गावे विस्थापित होणार आहेत. या गावांतील ११८ कुटुंबांना सुमारे आठ किलोमीटर अंतरावर स्थलांतरित केले जाणार आहे. बाधित झालेल्या इतर गावांमध्ये उदेवाई, कुणे आणि नांदगाव यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे सिडकोने गावांच्या पुनर्वसनाचा आराखडाही तयार केला आहे.

प्रकल्पाचा खर्च वाढला

कोंढाणे धरणाची सध्याची पाणीसाठवण क्षमता १०५ एमएलडी इतकी आहे. त्यात वाढ करून ती ४०० एमएलडी करण्याची योजना आहे. धरण हस्तांतरित झाले त्यावेळी म्हणजेच सात वर्षांपूर्वी सिडकोने या कामाचा खर्च एक हजार कोटी रुपये निर्धारित केला होता. यात आता ४०० ते ५०० कोटींनी  वाढ झाल्याचे समजते.

नैना क्षेत्रातील शहरांसाठी नियोजन

  • सिडकोच्या माध्यमातून नैना क्षेत्राचा विकास केला जात आहे. पहिल्या टप्प्यातील  २३ गावांच्या ३७ चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या परिघात १२ नगररचना परियोजनेच्या (टीपीएस) माध्यमातून १२ शहरे वसविली जाणार आहेत.
  • त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील ७३ गावांचा सर्वसमावेशक विकास केला जाणार आहे. नैनाच्या पहिल्या टप्प्यात सिडकाेने पायाभूत सुविधांची कामे सुरू केली आहेत. जवळपास साडेसहाशे कोटी रुपयांच्या विकासकामांचे प्रस्ताव मागविले आहेत. त्याचबरोबर पाण्याचेसुद्धा नियोजन सुरू केले आहे.  
  • कोंढाणे धरणामुळे नैना क्षेत्रातील नियोजित शहरांचा पाणीप्रश्न निकाली निघणार आहे.  नैना क्षेत्रातील नियोजित शहरांची पुढील  वीस वर्षांतील संभाव्य लोकसंख्येला पुरेल इतका पाणीसाठा या धरणातून उपलब्ध होणार आहे.
टॅग्स :DamधरणNavi Mumbaiनवी मुंबई