शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

नाईक घरी, भुजबळ तुरुंगात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 03:11 IST

शिवसेना संपविण्याची भाषा करणाऱ्यांच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा लागली. गणेश नाईक घरी बसले, छगन भुजबळ तुरुंगात असून, नारायण राणे राज्यातून तडीपार झाले आहेत.

नवी मुंबई : शिवसेना संपविण्याची भाषा करणाऱ्यांच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा लागली. गणेश नाईक घरी बसले, छगन भुजबळ तुरुंगात असून, नारायण राणे राज्यातून तडीपार झाले आहेत. त्यांची स्थिती पाहून भविष्यात शिवसेना सोडण्याचा विचार कोण करणार नाही, अशा शब्दात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पक्ष सोडणाºयांवर टीका केली.नेरुळमधील आगरी कोळी भवनमध्ये शिवसेना पदाधिकाºयांचा मेळावा आयोजित केला होता. मेळाव्यात बोलताना सुभाष देसाई यांनी भाजपावरही सडकून टीका केली. आतापर्यंत भाजपाच सत्तेवर येणार असल्याची भाषा करणारे आता एनडीए पुन्हा सत्ता मिळवेल, अशी भाषा वापरू लागले आहेत. भाजपाने आत्मविश्वास गमावला असून, आता त्यांना मित्रपक्षांची आठवण होऊ लागली आहे; परंतु शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याची घोषणा केली असून, येणाºया निवडणुकीमध्ये विधानभवनावर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. शिवसेना संपविण्याची भाषा अनेकांनी केली आहे; परंतु शिवसेना अभेद्य असून, पक्षाला आव्हान देणाºयांचे अस्तित्वही दिसत नाही. सद्य:स्थितीमध्ये शिवसेना सोडणारे गणेश नाईक घरी बसले आहेत. छगन भुजबळ तुरुंगात गेले आहेत. नारायण राणे राज्यातून तडीपार झाले आहेत. संसदेमध्ये हिंदी व इंग्रजीत बोलावे लागते व बोलले जाते. यामुळे पुढील सहा वर्षे हिंदी व इंग्रजी शिकणे व समजून घेण्यातच त्यांचा वेळ जाईल, अशी टीका त्यांनी केली. आनंद परांजपे यांच्यासह अनेकांचे अस्तित्व संपले असून, त्यांची अवस्था पाहून भविष्यात कोणी शिवसेना सोडण्याचे धाडस करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शिवसैनिक हे शिवसेनेची ताकद आहे. जोपर्यंत निष्ठावंत शिवसैनिक आहेत, तोपर्यंत सेना अभेद्य राहणार आहे. शिवसैनिकांनी अनेक वेळा गणेश नाईक यांची मक्तेदारी संपविली आहे. यापुढेही ठाणे जिल्ह्यात लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकांमध्ये भगवा फडकविला जाईल. ठाणेमध्ये क्लस्टर योजना राबविण्यासाठी १५ वर्षे संघर्ष केला. पाच वेळा विधानसभेत निलंबनाची कारवाई सहन केली. यानंतर क्लस्टर योजना अस्तित्वात आली. नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्त, झोपडपट्टीसह इतर प्रश्न सोडविण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मतभेद दूर करून पदाधिकाºयांनी संघटनेच्या कामामध्ये झोकून द्यावे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. उपनेते विजय नाहटा यांनी भाजपा हा विश्वासघातकी पक्ष आहे. त्यांच्याशी पुन्हा युती नको, अशी भूमिका व्यक्त केली. या वेळी खासदार राजन विचारे, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, बेलापूर विधानसभा संपर्कप्रमुख विठ्ठल मोरे यांचीही भाषणे झाली. मेळाव्याला नामदेव भगत, विजय माने, मनोहर गायखे, हरिभाऊ म्हात्रे, संद्या वडावकर, रंजना शिंत्रे, रतन मांडवे, काशीनाथ पवार, मनोज हळदणकर,ज्ञानेश्वर सुतार, गणपत शेलार,समीर बागवान उपस्थित होते.>मतभेद दूर कराशिवसेना मेळाव्यापूर्वी एकनाथ शिंदे व सुभाष देसाई यांनी विभाग अधिकाºयांपासून सर्व वरिष्ठ पदाधिकाºयांची बैठक घेतली. यामध्ये संघटनेमध्ये मतभेदावर अनेकांनी भाष्य केले. त्याचे पडसाद मेळाव्यात उमटले. मतभेद ठेवू नका. होर्डिंगवर कोणाचे फोटो लावले यावरून रुसण्यापेक्षा चांगले काम करण्यास प्राधान्य द्या, जनतेच्या प्रश्नावर आक्रमक होऊन आंदोलन करा, असे आवाहन करण्यात आले.

टॅग्स :Subhash Desaiसुभाष देसाई