शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

नाईक घरी, भुजबळ तुरुंगात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 03:11 IST

शिवसेना संपविण्याची भाषा करणाऱ्यांच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा लागली. गणेश नाईक घरी बसले, छगन भुजबळ तुरुंगात असून, नारायण राणे राज्यातून तडीपार झाले आहेत.

नवी मुंबई : शिवसेना संपविण्याची भाषा करणाऱ्यांच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा लागली. गणेश नाईक घरी बसले, छगन भुजबळ तुरुंगात असून, नारायण राणे राज्यातून तडीपार झाले आहेत. त्यांची स्थिती पाहून भविष्यात शिवसेना सोडण्याचा विचार कोण करणार नाही, अशा शब्दात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पक्ष सोडणाºयांवर टीका केली.नेरुळमधील आगरी कोळी भवनमध्ये शिवसेना पदाधिकाºयांचा मेळावा आयोजित केला होता. मेळाव्यात बोलताना सुभाष देसाई यांनी भाजपावरही सडकून टीका केली. आतापर्यंत भाजपाच सत्तेवर येणार असल्याची भाषा करणारे आता एनडीए पुन्हा सत्ता मिळवेल, अशी भाषा वापरू लागले आहेत. भाजपाने आत्मविश्वास गमावला असून, आता त्यांना मित्रपक्षांची आठवण होऊ लागली आहे; परंतु शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याची घोषणा केली असून, येणाºया निवडणुकीमध्ये विधानभवनावर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. शिवसेना संपविण्याची भाषा अनेकांनी केली आहे; परंतु शिवसेना अभेद्य असून, पक्षाला आव्हान देणाºयांचे अस्तित्वही दिसत नाही. सद्य:स्थितीमध्ये शिवसेना सोडणारे गणेश नाईक घरी बसले आहेत. छगन भुजबळ तुरुंगात गेले आहेत. नारायण राणे राज्यातून तडीपार झाले आहेत. संसदेमध्ये हिंदी व इंग्रजीत बोलावे लागते व बोलले जाते. यामुळे पुढील सहा वर्षे हिंदी व इंग्रजी शिकणे व समजून घेण्यातच त्यांचा वेळ जाईल, अशी टीका त्यांनी केली. आनंद परांजपे यांच्यासह अनेकांचे अस्तित्व संपले असून, त्यांची अवस्था पाहून भविष्यात कोणी शिवसेना सोडण्याचे धाडस करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शिवसैनिक हे शिवसेनेची ताकद आहे. जोपर्यंत निष्ठावंत शिवसैनिक आहेत, तोपर्यंत सेना अभेद्य राहणार आहे. शिवसैनिकांनी अनेक वेळा गणेश नाईक यांची मक्तेदारी संपविली आहे. यापुढेही ठाणे जिल्ह्यात लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकांमध्ये भगवा फडकविला जाईल. ठाणेमध्ये क्लस्टर योजना राबविण्यासाठी १५ वर्षे संघर्ष केला. पाच वेळा विधानसभेत निलंबनाची कारवाई सहन केली. यानंतर क्लस्टर योजना अस्तित्वात आली. नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्त, झोपडपट्टीसह इतर प्रश्न सोडविण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मतभेद दूर करून पदाधिकाºयांनी संघटनेच्या कामामध्ये झोकून द्यावे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. उपनेते विजय नाहटा यांनी भाजपा हा विश्वासघातकी पक्ष आहे. त्यांच्याशी पुन्हा युती नको, अशी भूमिका व्यक्त केली. या वेळी खासदार राजन विचारे, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, बेलापूर विधानसभा संपर्कप्रमुख विठ्ठल मोरे यांचीही भाषणे झाली. मेळाव्याला नामदेव भगत, विजय माने, मनोहर गायखे, हरिभाऊ म्हात्रे, संद्या वडावकर, रंजना शिंत्रे, रतन मांडवे, काशीनाथ पवार, मनोज हळदणकर,ज्ञानेश्वर सुतार, गणपत शेलार,समीर बागवान उपस्थित होते.>मतभेद दूर कराशिवसेना मेळाव्यापूर्वी एकनाथ शिंदे व सुभाष देसाई यांनी विभाग अधिकाºयांपासून सर्व वरिष्ठ पदाधिकाºयांची बैठक घेतली. यामध्ये संघटनेमध्ये मतभेदावर अनेकांनी भाष्य केले. त्याचे पडसाद मेळाव्यात उमटले. मतभेद ठेवू नका. होर्डिंगवर कोणाचे फोटो लावले यावरून रुसण्यापेक्षा चांगले काम करण्यास प्राधान्य द्या, जनतेच्या प्रश्नावर आक्रमक होऊन आंदोलन करा, असे आवाहन करण्यात आले.

टॅग्स :Subhash Desaiसुभाष देसाई