शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
2
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
3
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
4
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
5
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार
6
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
7
Viral News: कानपूरहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात उंदीर; उड्डाणाला साडेतीन तास विलंब!
8
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
9
अमूलनं बटर, तूप, चीज, आईस्क्रीम आणि चॉकलेटच्या किमती केल्या कमी; प्रत्येक वस्तूवर किती बचत होणार? जाणून घ्या
10
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
11
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
13
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
14
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
15
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
16
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
17
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
18
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
19
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
20
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!

माझी माती माझा देश अभियान; नवी मुंबईत शहीद वीरांच्या कुटुंबियांचा सन्मान

By नामदेव मोरे | Updated: August 9, 2023 15:46 IST

महानगरपालिकेने तयार केली अमृत वाटिका

नवी मुंबई : माझी माती माझा देश अभियाना अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेने शहीद वीरांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला. वसुधा वंदन उपक्रमाअंतर्गत देशी वृक्षांचे रोपण करून अमृत वाटिका निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली. यावेळी उपस्थित एक हजार पेक्षा जास्त नागरिकांनी पंचप्रण शपथ घेतली.

नेरूळ मधील ज्वेल्स ऑफ नवी मुंबई येथे आयोजीत कार्यक्रमामध्ये १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात शहीद झालेल्या आर. एस. सिंग यांच्या पत्नी मिरादेवी, एन. एस. कठैत यांची मुलगी अनिता गांधी, भोपाल सिंग यांच्या पत्नी हरमिंदर कौर, जम्मू कश्मीरमध्ये शहीद झालेल्या लक्ष्मण शेळके यांचा मुलगा अर्जुन शेळके यांचा सत्कार करण्यात आला. नवी मुंबईमध्ये बँक ऑफ बरोडा मधील दरोडा रोखताना शहीद झालेल्या पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब आढाव यांच्या पत्नी शुभांगी आढाव यांचाही सन्मान करण्यात आला. माझी माती माझा देश अभियानानिमीत्त ७५ देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी अमृत वाटिका तयार करण्याची घोषणाही करण्यात आली. आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबई हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील नागरिक येथे वास्तव्याला असल्याबद्दल अभिमान व्यक्त केला. आमदार मंदा म्हात्रे यांनीही या अभियानामध्ये नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल आनंद व्यक्त केला. सर्वांनी हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन केले. आयुक्त राजेश नार्वेकर यांनी अभियानाविषयी व महानगरपालिका राबवत असलेल्या उपक्रमांविषयी माहिती दिली.

यावेळी आत्मनिर्भर आणि विकसीत राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करू, गुलामीची मानसिकता मूळापासून नष्ट करू, देशाच्या समृद्धा वारशाचा गौरव करू, भारताची एकात्मता बनविण्याचे स्वप्न साकार करू, गुलामीची मानसिकता मूळापासून नष्ट करू, देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करू, देशाची एकात्मता बलशाली करू आणि देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रती सन्मान बाळगू , देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करू अशी शपथ घेतली.

शासकीय पोर्टलवर सेल्फी पाठविण्याचे आवाहनकार्यक्रमाच्या वेळी माती व मातीचे दिवे हातात घेऊन सेल्फी व छायाचित्रे काढली. हा सेल्फी किंवा छायाचित्र मेरीमाटी मेरा देश या शासनाच्या पोर्टलवर अपलोड करावी. या उपक्रमात सहभागी होणारांना ऑनलाईन प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. ९ ते १४ ऑगस्ट या कालावधीमध्ये मातृभूमीविषयीचे व शहीद वीरांविषयीचे आपले प्रेम व अभिमान व छायाचित्र अभियानाच्या वेबसाईटवर पाठविण्याचे आवाहनही महानगर पालिकेने केले.