शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

माझी माती माझा देश अभियान; नवी मुंबईत शहीद वीरांच्या कुटुंबियांचा सन्मान

By नामदेव मोरे | Updated: August 9, 2023 15:46 IST

महानगरपालिकेने तयार केली अमृत वाटिका

नवी मुंबई : माझी माती माझा देश अभियाना अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेने शहीद वीरांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला. वसुधा वंदन उपक्रमाअंतर्गत देशी वृक्षांचे रोपण करून अमृत वाटिका निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली. यावेळी उपस्थित एक हजार पेक्षा जास्त नागरिकांनी पंचप्रण शपथ घेतली.

नेरूळ मधील ज्वेल्स ऑफ नवी मुंबई येथे आयोजीत कार्यक्रमामध्ये १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात शहीद झालेल्या आर. एस. सिंग यांच्या पत्नी मिरादेवी, एन. एस. कठैत यांची मुलगी अनिता गांधी, भोपाल सिंग यांच्या पत्नी हरमिंदर कौर, जम्मू कश्मीरमध्ये शहीद झालेल्या लक्ष्मण शेळके यांचा मुलगा अर्जुन शेळके यांचा सत्कार करण्यात आला. नवी मुंबईमध्ये बँक ऑफ बरोडा मधील दरोडा रोखताना शहीद झालेल्या पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब आढाव यांच्या पत्नी शुभांगी आढाव यांचाही सन्मान करण्यात आला. माझी माती माझा देश अभियानानिमीत्त ७५ देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी अमृत वाटिका तयार करण्याची घोषणाही करण्यात आली. आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबई हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील नागरिक येथे वास्तव्याला असल्याबद्दल अभिमान व्यक्त केला. आमदार मंदा म्हात्रे यांनीही या अभियानामध्ये नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल आनंद व्यक्त केला. सर्वांनी हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन केले. आयुक्त राजेश नार्वेकर यांनी अभियानाविषयी व महानगरपालिका राबवत असलेल्या उपक्रमांविषयी माहिती दिली.

यावेळी आत्मनिर्भर आणि विकसीत राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करू, गुलामीची मानसिकता मूळापासून नष्ट करू, देशाच्या समृद्धा वारशाचा गौरव करू, भारताची एकात्मता बनविण्याचे स्वप्न साकार करू, गुलामीची मानसिकता मूळापासून नष्ट करू, देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करू, देशाची एकात्मता बलशाली करू आणि देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रती सन्मान बाळगू , देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करू अशी शपथ घेतली.

शासकीय पोर्टलवर सेल्फी पाठविण्याचे आवाहनकार्यक्रमाच्या वेळी माती व मातीचे दिवे हातात घेऊन सेल्फी व छायाचित्रे काढली. हा सेल्फी किंवा छायाचित्र मेरीमाटी मेरा देश या शासनाच्या पोर्टलवर अपलोड करावी. या उपक्रमात सहभागी होणारांना ऑनलाईन प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. ९ ते १४ ऑगस्ट या कालावधीमध्ये मातृभूमीविषयीचे व शहीद वीरांविषयीचे आपले प्रेम व अभिमान व छायाचित्र अभियानाच्या वेबसाईटवर पाठविण्याचे आवाहनही महानगर पालिकेने केले.