शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

माझी माती माझा देश अभियान; नवी मुंबईत शहीद वीरांच्या कुटुंबियांचा सन्मान

By नामदेव मोरे | Updated: August 9, 2023 15:46 IST

महानगरपालिकेने तयार केली अमृत वाटिका

नवी मुंबई : माझी माती माझा देश अभियाना अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेने शहीद वीरांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला. वसुधा वंदन उपक्रमाअंतर्गत देशी वृक्षांचे रोपण करून अमृत वाटिका निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली. यावेळी उपस्थित एक हजार पेक्षा जास्त नागरिकांनी पंचप्रण शपथ घेतली.

नेरूळ मधील ज्वेल्स ऑफ नवी मुंबई येथे आयोजीत कार्यक्रमामध्ये १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात शहीद झालेल्या आर. एस. सिंग यांच्या पत्नी मिरादेवी, एन. एस. कठैत यांची मुलगी अनिता गांधी, भोपाल सिंग यांच्या पत्नी हरमिंदर कौर, जम्मू कश्मीरमध्ये शहीद झालेल्या लक्ष्मण शेळके यांचा मुलगा अर्जुन शेळके यांचा सत्कार करण्यात आला. नवी मुंबईमध्ये बँक ऑफ बरोडा मधील दरोडा रोखताना शहीद झालेल्या पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब आढाव यांच्या पत्नी शुभांगी आढाव यांचाही सन्मान करण्यात आला. माझी माती माझा देश अभियानानिमीत्त ७५ देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी अमृत वाटिका तयार करण्याची घोषणाही करण्यात आली. आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबई हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील नागरिक येथे वास्तव्याला असल्याबद्दल अभिमान व्यक्त केला. आमदार मंदा म्हात्रे यांनीही या अभियानामध्ये नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल आनंद व्यक्त केला. सर्वांनी हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन केले. आयुक्त राजेश नार्वेकर यांनी अभियानाविषयी व महानगरपालिका राबवत असलेल्या उपक्रमांविषयी माहिती दिली.

यावेळी आत्मनिर्भर आणि विकसीत राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करू, गुलामीची मानसिकता मूळापासून नष्ट करू, देशाच्या समृद्धा वारशाचा गौरव करू, भारताची एकात्मता बनविण्याचे स्वप्न साकार करू, गुलामीची मानसिकता मूळापासून नष्ट करू, देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करू, देशाची एकात्मता बलशाली करू आणि देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रती सन्मान बाळगू , देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करू अशी शपथ घेतली.

शासकीय पोर्टलवर सेल्फी पाठविण्याचे आवाहनकार्यक्रमाच्या वेळी माती व मातीचे दिवे हातात घेऊन सेल्फी व छायाचित्रे काढली. हा सेल्फी किंवा छायाचित्र मेरीमाटी मेरा देश या शासनाच्या पोर्टलवर अपलोड करावी. या उपक्रमात सहभागी होणारांना ऑनलाईन प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. ९ ते १४ ऑगस्ट या कालावधीमध्ये मातृभूमीविषयीचे व शहीद वीरांविषयीचे आपले प्रेम व अभिमान व छायाचित्र अभियानाच्या वेबसाईटवर पाठविण्याचे आवाहनही महानगर पालिकेने केले.