शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक स्टडी रिपोर्ट
4
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
5
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
6
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
7
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
8
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
9
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
10
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
11
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
12
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या
13
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
14
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
15
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
16
...तर तुम्हा-आम्हाला स्वस्त वीज मिळेल! खासगी कंपन्यांच्या प्रवेशाने महाराष्ट्राच्या वीज बाजारात स्पर्धा वाढणार
17
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
18
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
19
सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय!
20
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?

आॅनलाइन सिस्टीममुळे उमेदवारांच्या शुभ मुहूर्ताला मुरड

By admin | Updated: February 6, 2017 05:00 IST

उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आॅनलाइन सिस्टीम दिली आहे. निवडणूक आयोगाच्या या भूमिकेमुळे पसंतीच्या शुभ मुहूर्तावर उमेदवारी अर्ज भरण्याला उमेदवारांना मुरड

आविष्कार देसाई, अलिबागउमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आॅनलाइन सिस्टीम दिली आहे. निवडणूक आयोगाच्या या भूमिकेमुळे पसंतीच्या शुभ मुहूर्तावर उमेदवारी अर्ज भरण्याला उमेदवारांना मुरड घालावी लागली आहे. शुभ मुहूर्त साधता न आल्याने निवडणुकांच्या निकालावर काही परिणाम तर होणार नाही ना, अशी भीती उमेदवारांसह कार्यकर्त्यांमध्ये आहे.पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रामध्ये विविध राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आजही अशा शुभ मुहूर्ताच्या चक्करमध्ये पडताना दिसून येतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड जिल्ह्यातही अशा अंधश्रध्दांना खतपाणी घातले जाते. शिवाजी महाराजांनी शत्रूवर आक्रमण करताना कधी मुहूर्त पाहिला नाही. त्यांनी फक्त गनिमी काव्याने अचूक वेळ साधत शत्रूला नामोहरण केले होते. त्याच रायगड जिल्ह्यात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड तालुक्यात चवदार तळ््याचा सत्याग्रह करताना मुहूर्त पाहिला नाही, तर त्या वेळची परिस्थिती आणि गरज लक्षात घेतली होती. अशा अनेक महान विभूतींनी विविध कारणांसाठी विजय प्राप्त केला आहे. अपार कष्ट आणि प्रयत्नांची पराकाष्टा केल्याशिवाय हाती काहीच लागत नाही हे त्यांनी आपल्या अनुकरणातून जगाला दाखवून दिले होते. संतांनीही ‘केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे’ अशी शिकवण याच महाराष्ट्रात दिली आहे. म्हणूनच आपला महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे. याच पुरोगामी महाराष्ट्रात आता नेमके उलटे होताना दिसत आहे.निवडणूकच जिंकायची असेल, तर आधी उमेदवारीचा अर्ज शुभ मुहूर्तावर भरला पाहिजे, असे पक्के काही उमेदवारांनी डोक्यात घेतले होते. तसे केले, तर विजय मिळविता येतो असा गोड समजही त्यांचा आहे. मतदारांना विकासाचे गाजर दाखवत त्यांची मते विकत घेऊन सहज जिंकता येते. हाच पॅटर्न सध्या सर्वत्र सुरु असल्याचे दिसून येते. अपार मेहनत घेण्याची तयारी त्यांची नसल्याचे यातूनच अधोरेखित होते. कोणाच्या श्रध्देवर बोट ठेवण्याचा कोणालाही अधिकार दिलेला नाही. त्यामुळे उमेदवार त्यांच्या आवडीच्या शुभ मुहूर्तावर उमेदवारी अर्ज दाखल करीत होते. उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रचंड गाजावाजा करीत शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले जायचे. त्यामुळे वाहतूक कोंडी, सामान्य नागरिकांना त्रास, वाहनाचा खर्च, कार्यकर्ते गोळा करण्याची कसरत असे चित्र पूर्वी सर्रास दिसत होते.निवडणूक आयोगाने आॅनलाइन अर्ज दाखल करण्याच्या सूचना केल्याने मुहूर्तावर अर्ज भरण्याला काही प्रमाणात मुरड घालावी लागली आहे. त्याचप्रमाणे इच्छुक उमेदवारांची संख्या सर्वच राजकीय पक्षात दिसून येते. त्यांच्याकडून कोणताही दगाफटका होऊ नये, यासाठी शक्तिप्रदर्शन, उमेदवारांची यादी जाहीर करणे असे प्रकार या निवडणुकीत दिसले नाहीत.शुभमुहूर्तावर उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने विजयाबाबत काही कार्यकर्ते साशंक असल्याची चर्चा अलिबागच्या प्रांताधिकारी कार्यालयात ऐकावयास मिळते.