शहरं
Join us  
Trending Stories
1
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
2
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
3
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
4
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
5
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
6
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
7
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
8
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
9
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
11
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
12
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
13
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
14
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
15
इस्रायलने प्रक्षेपित केला गुप्तचर उपग्रह, २४ तास शत्रूवर लक्ष ठेवणार
16
टाटा स्टीलसह 'हे' शेअर्स तेजीत! अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ तणावातही बाजाराची झेप! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ
17
आशिया कप स्पर्धेत हार्दिक पांड्याला मोठा डाव साधण्याची संधी; याआधी फक्त तिघांनी गाठलाय हा पल्ला
18
मारुतीनं 'या' SUV ला खालच्या बाजूला दिले CNG सिलिंडर, मिळणार अख्खा बूट स्पेस; 2 सिलिंडर वाल्या कारचं गणित बिघडणार?
19
अदानींच्या कंपनीचा शेअर पुन्हा 'दम' दाखवणार? ब्रोकरेजच्या मते ₹645 वर जाणार! तुमच्याकडे आहे का?
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे फासे उलटे पडले; पुतिन यांची तगडी ऑफर, भारत रशियाकडून तेल खरेदी वाढवणार?

आॅनलाइन सिस्टीममुळे उमेदवारांच्या शुभ मुहूर्ताला मुरड

By admin | Updated: February 6, 2017 05:00 IST

उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आॅनलाइन सिस्टीम दिली आहे. निवडणूक आयोगाच्या या भूमिकेमुळे पसंतीच्या शुभ मुहूर्तावर उमेदवारी अर्ज भरण्याला उमेदवारांना मुरड

आविष्कार देसाई, अलिबागउमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आॅनलाइन सिस्टीम दिली आहे. निवडणूक आयोगाच्या या भूमिकेमुळे पसंतीच्या शुभ मुहूर्तावर उमेदवारी अर्ज भरण्याला उमेदवारांना मुरड घालावी लागली आहे. शुभ मुहूर्त साधता न आल्याने निवडणुकांच्या निकालावर काही परिणाम तर होणार नाही ना, अशी भीती उमेदवारांसह कार्यकर्त्यांमध्ये आहे.पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रामध्ये विविध राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आजही अशा शुभ मुहूर्ताच्या चक्करमध्ये पडताना दिसून येतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड जिल्ह्यातही अशा अंधश्रध्दांना खतपाणी घातले जाते. शिवाजी महाराजांनी शत्रूवर आक्रमण करताना कधी मुहूर्त पाहिला नाही. त्यांनी फक्त गनिमी काव्याने अचूक वेळ साधत शत्रूला नामोहरण केले होते. त्याच रायगड जिल्ह्यात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड तालुक्यात चवदार तळ््याचा सत्याग्रह करताना मुहूर्त पाहिला नाही, तर त्या वेळची परिस्थिती आणि गरज लक्षात घेतली होती. अशा अनेक महान विभूतींनी विविध कारणांसाठी विजय प्राप्त केला आहे. अपार कष्ट आणि प्रयत्नांची पराकाष्टा केल्याशिवाय हाती काहीच लागत नाही हे त्यांनी आपल्या अनुकरणातून जगाला दाखवून दिले होते. संतांनीही ‘केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे’ अशी शिकवण याच महाराष्ट्रात दिली आहे. म्हणूनच आपला महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे. याच पुरोगामी महाराष्ट्रात आता नेमके उलटे होताना दिसत आहे.निवडणूकच जिंकायची असेल, तर आधी उमेदवारीचा अर्ज शुभ मुहूर्तावर भरला पाहिजे, असे पक्के काही उमेदवारांनी डोक्यात घेतले होते. तसे केले, तर विजय मिळविता येतो असा गोड समजही त्यांचा आहे. मतदारांना विकासाचे गाजर दाखवत त्यांची मते विकत घेऊन सहज जिंकता येते. हाच पॅटर्न सध्या सर्वत्र सुरु असल्याचे दिसून येते. अपार मेहनत घेण्याची तयारी त्यांची नसल्याचे यातूनच अधोरेखित होते. कोणाच्या श्रध्देवर बोट ठेवण्याचा कोणालाही अधिकार दिलेला नाही. त्यामुळे उमेदवार त्यांच्या आवडीच्या शुभ मुहूर्तावर उमेदवारी अर्ज दाखल करीत होते. उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रचंड गाजावाजा करीत शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले जायचे. त्यामुळे वाहतूक कोंडी, सामान्य नागरिकांना त्रास, वाहनाचा खर्च, कार्यकर्ते गोळा करण्याची कसरत असे चित्र पूर्वी सर्रास दिसत होते.निवडणूक आयोगाने आॅनलाइन अर्ज दाखल करण्याच्या सूचना केल्याने मुहूर्तावर अर्ज भरण्याला काही प्रमाणात मुरड घालावी लागली आहे. त्याचप्रमाणे इच्छुक उमेदवारांची संख्या सर्वच राजकीय पक्षात दिसून येते. त्यांच्याकडून कोणताही दगाफटका होऊ नये, यासाठी शक्तिप्रदर्शन, उमेदवारांची यादी जाहीर करणे असे प्रकार या निवडणुकीत दिसले नाहीत.शुभमुहूर्तावर उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने विजयाबाबत काही कार्यकर्ते साशंक असल्याची चर्चा अलिबागच्या प्रांताधिकारी कार्यालयात ऐकावयास मिळते.