शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

महापालिका निवडणूक: रिपाइंच्या नवी मुंबई युवक आघाडीला हव्यात सात जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 23:45 IST

पक्षाच्या जिल्हा नेतृत्वाकडे मागणी

नवी मुंबई : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीत भाजपविरोधी महाविकास आघाडी असेच काहीसे चित्र सध्या तरी दिसत आहे. भाजपचा मित्र पक्ष असलेल्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपाइंनेही या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. विशेषत: रिपाइंची युवक आघाडी त्यासाठी अधिक आग्रही असून, या निवडणुकीत सात जागा लढण्याचा निर्धार केला आहे. तशी मागणी पक्षाच्या जिल्हा नेतृत्वाकडे करण्यात आली आहे.नवी मुंबईत रिपाइंची ताकद बऱ्यापैकी असली तरी निवडणुकीच्या राजकारणात या पक्षाला आजपर्यंत आपली क्षमता सिद्ध करता आलेली नाही. महापालिकेच्या मागील पाच निवडणुकीत या रिपाइंला आपला एकही नगरसेवक निवडून आणता आलेला नाही. यामागे पक्षाचे राज्यस्तरीय धोरण, स्थानिक नेत्यांचे प्रमुख पक्षांच्या नेत्यांबरोबर असलेले सुमधुर संबंध, आपसातील हेवेदावे त्यातून निर्माण झालेली गटबाजी आदीमुळे क्षमता असूनही मागील २५ वर्षांत रिपाइंला आपला एकही नगरसेवक निवडून आणता आला नाही; परंतु या वेळीची निवडणूक वेगळी आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीने या निवडणुकीत आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखालील भाजपला थेट आवाहन दिले आहे. केंद्रात आणि राज्यात रिपाइं हा भाजपचा मित्रपक्ष आहे. शिवाय, नवी मुंबईतील रिपाइंच्या नेत्यांचे गणेश नाईक यांच्याबरोबरचे संबंध चांगले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत नाईक रिपाइंला नक्कीच न्यायाची वागणूक देतील, असा विश्वास कार्यकर्त्यांना वाटतो आहे. या पार्श्वभूमीवर रिपाइंच्या जिल्हा नेतृत्वाने युवक आघाडीसाठी सात जागा सोडाव्यात, अशी मागणी युवक आघाडीचे अध्यक्ष विजय कांबळे यांनी केली आहे. तशा आशयाचे पत्र रिपाइंचे जिल्हाध्यक्ष सिद्राम ओहोळ यांना देण्यात आले आहे. युवक आघाडीच्या या मागणीवर जिल्हा नेतृत्व काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिका