शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

महापालिकेची प्लास्टीकविरोधी कारवाई थंडावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 01:17 IST

शहरात सर्रास वापर सुरू; कचऱ्यात वाढले प्लास्टीक पिशव्यांचे प्रमाण

- योगेश पिंगळेनवी मुंबई : बंदी असताना नवी मुंबईत प्लास्टीक पिशव्यांचा सर्रास वापर होत आहे. प्लास्टीक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर महापालिकेकडून होणारी कारवाई थंडावली आहे.पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी राज्य शासनाने निकृष्ट दर्जाच्या आणि ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीकच्या पिशव्या वापरण्यावर बंदी घातली. त्यानंतर फेरीवाले, मासळी मार्केट, बाजार समिती परिसर, भाजी मंडई, दुकानदार आदींकडून महापालिकेने प्लास्टीकच्या पिशव्यांचा साठा जप्त केला होता. त्यानंतर, प्लास्टीकचा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली होती. या कारवाईमध्ये शहरातील आठही नोडमधून लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. त्यानंतर प्लास्टीक पिशव्यांचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले होते.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्यापासून लॉकडाऊन घेण्यात आला होता. त्यानंतर टप्प्याटप्प्याने घेण्यात आलेल्या अनलॉकमध्ये हळूहळू सर्व उद्योगधंदे पूर्वपदावर आले आहेत. नवी मुंबई शहरात गेल्या काही महिन्यांपासून फेरीवाल्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. प्लास्टीकच्या पिशव्यांचा फेरीवाल्यांकडून सर्रास वापर केला जात असून, कचऱ्यात प्लास्टीक पिशव्यांचे प्रमाण वाढले आहे. प्लास्टीक पिशव्यांच्या वापरावर होणाऱ्या कारवाईत गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.शहरात प्लास्टीक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर सातत्याने कारवाया करण्यात येत असून, लॉकडाऊन काळातही कारवाया करण्यात आल्या आहेत. प्लास्टीक कारवाईसाठी शहरात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.- सुजाता ढोले, अतिरिक्त आयुक्त, न.मुं.म.पाप्लास्टीक पिशव्यांच्या वापरावर होणाऱ्या कारवाईत गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी महापालिका प्रशासनाचे खूप दुर्लक्ष झाल्याचे चित्र शहरात दिसते आहे. अशा प्रकारे केला दंड वसूूलकालावधी    वसूल केलेला दंड१ एप्रिल, २०१९ ते ३० मार्च, २०२०    ३३ लाख ३५ हजार रुपये१ एप्रिल, २०२० ते ३० नोव्हेंबर, २०२०    २ लाख २० हजार रुपये

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी