शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
2
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
3
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
4
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
5
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
6
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
7
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
8
Video: गळफास घेतलेल्या तरुणाला जीवनदान; पोलिस अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवले प्राण
9
VHT 2025-26 : पांड्याचं 'तांडव'! वनडेत ठोकली टी-२० स्टाईल सेंच्युरी; संघाने जिंकली ४०० पारची लढाई
10
नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला केंद्राचा हिरवा कंदील; प्रवास वेळेत 17 तासांची बचत होणार
11
Hello 2026! न्यूझीलंडमध्ये नववर्षाचे जंगी स्वागत; ऑकलंडच्या स्काय टॉवरवर फटाक्यांची आतषबाजी
12
साबणापासून फेस पॅकपर्यंत... गाढविणीच्या दुधामुळे पालटलं नशीब, आता करतेय लाखोंची कमाई
13
गुंतवणूकदारांची 'चांदी'! वर्षाच्या शेवटच्या दिवशी ४ लाख कोटींची कमाई; मेटल आणि रिलायन्स शेअर्समध्ये धूम
14
"भाजपाला मदत व्हावी म्हणून अंबादास दानवेंनी निवडून येणाऱ्या महिलांचे तिकीट कापले", ठाकरेंच्या दोन नेत्यांमध्ये वाजले!
15
'भाजपा उपऱ्यांचा पक्ष बनलाय; आता रेशिमबाग नाही तर अदानी-अंबानी भाजपा चालवणार', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका 
16
चीनमध्ये सापडला २२०० वर्षापूर्वीचा जुना नॅशनल हायवे; डोंगर फोडून बनवला होता चार पदरी रस्ता
17
नवऱ्याचे तुकडे करणारी मुस्कान झाली आई; जेलमध्ये साहिलचा जल्लोष, कैद्यांना म्हणाला, 'तुम्ही काका झालात'
18
Municipal Election 2026: कल्याण, पनवेल, धुळ्यात भाजपाचा 'विजयारंभ'! सहा उमेदवार बनले बिनविरोध 'नगसेवक'
19
गुंतवणूक सोन्यात की शेअर बाजारात? ३ लाखांच्या सोन्यावर पुढील वर्षी किती नफा मिळेल? सोपं गणित
20
नशीब असावं तर असं! राष्ट्रवादीतून भाजपात आल्या आणि २४ तासांत झाल्या नगरसेविका, धुळ्यात उज्वला भोसले बिनविरोध
Daily Top 2Weekly Top 5

शिळफाटा परिसरातील चौदा गावांना पुन्हा महापालिकेचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 02:13 IST

ठाणे आणि नवी मुंबईच्या वेशीवर असलेल्या ‘त्या’ १४ गावांना पुन्हा महापालिकेचे वेध लागले आहेत

नवी मुंबई : ठाणे आणि नवी मुंबईच्या वेशीवर असलेल्या ‘त्या’ १४ गावांना पुन्हा महापालिकेचे वेध लागले आहेत. ग्रामस्थांच्या विरोध लक्षात घेऊन राज्य शासनाने एप्रिल २००७ मध्ये ही गावे महापालिकेतून वगळून स्वतंत्र केली होती. आता पुन्हा महापालिकेत समावेश व्हावा, या दृष्टीने ग्रामस्थांनी प्रयत्न सुरू केले आहेत.डिसेंबर १९९१मध्ये ठाणे जिल्हा परिषदेतील ४५ गावांचा समावेश करून नवी मुंबई महापालिकेची स्थापना करण्यात आली. सिडकोच्या नवी मुंबई प्रकल्पात समावेश नसलेल्या पारसिक हिलच्या पलीकडील १४ गावांचा यात समावेश होता. त्यानुसार महापालिकेने दहा वर्षांत सुमारे ७५ कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी रस्ते, पिण्याचे पाणी, माता बाल संगोपन केंद्र, नागरी आरोग्य केंद्र व प्राथमिक शाळांची निर्मिती केली; परंतु महापालिका आपल्या वडिलोपार्जित जमिनी ताब्यात घेईल, या भीतीने सुविधा आणि कररचनेचा बाऊ करीत ग्रामस्थांनी संघर्ष समितीच्या माध्यमातून महापालिकेतून ही गावे वगळण्याची मागणी केली. या मागणीसाठी रक्तरंजित संघर्ष करण्यात आला. ग्रामस्थांचा विरोध लक्षात घेऊन राज्य शासनाने ही गावे महापालिकेतून वगळून ती स्वतंत्र केली. त्यामुळे या गावांचा कारभार पुन्हा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू झाला. असे असले तरी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अपेक्षित विकास साधला जात नसल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. याचाच परिणाम म्हणून पुन्हा महापालिकेत समावेश व्हावा, यासाठी ग्रामस्थांचा पाठपुरावा सुरू आहे. १४ गाव सर्वपक्षीय संघर्ष समितीने दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन दिले होते. या मागणीसाठी आता ग्रामस्थ पुन्हा आक्रमक झाले आहेत.मागील काही वर्षांत १४ गाव परिसरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. लोकवस्ती झपाट्याने वाढत आहे. ग्रामपंचायतीच्या अपुºया उत्पन्नातून या क्षेत्रात पायाभूत सुविधा पुरविण्यास मर्यादा येत आहेत. पाणीपुरवठा, घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापनाचे प्रश्न गंभीर बनले आहेत. गावातील शासकीय गुरचरण जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सक्षम शासकीय यंत्रणा कार्यरत होणे आवश्यक आहे. त्यामुळेच ही १४ गावे पुन्हा समाविष्ट करण्याच्या दृष्टीने महापालिकेने सकारात्मक कार्यवाही करावी, अशी मागणी दहिसर ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच चेतन गजानन पाटील, सदस्य गुरुनाथ मधुकर पाटील यांनी केली आहे.