शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
2
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
3
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
4
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
7
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
8
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
9
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
10
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
11
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
12
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
13
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
14
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
15
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
16
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
18
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
19
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
20
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?

शिळफाटा परिसरातील चौदा गावांना पुन्हा महापालिकेचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 02:13 IST

ठाणे आणि नवी मुंबईच्या वेशीवर असलेल्या ‘त्या’ १४ गावांना पुन्हा महापालिकेचे वेध लागले आहेत

नवी मुंबई : ठाणे आणि नवी मुंबईच्या वेशीवर असलेल्या ‘त्या’ १४ गावांना पुन्हा महापालिकेचे वेध लागले आहेत. ग्रामस्थांच्या विरोध लक्षात घेऊन राज्य शासनाने एप्रिल २००७ मध्ये ही गावे महापालिकेतून वगळून स्वतंत्र केली होती. आता पुन्हा महापालिकेत समावेश व्हावा, या दृष्टीने ग्रामस्थांनी प्रयत्न सुरू केले आहेत.डिसेंबर १९९१मध्ये ठाणे जिल्हा परिषदेतील ४५ गावांचा समावेश करून नवी मुंबई महापालिकेची स्थापना करण्यात आली. सिडकोच्या नवी मुंबई प्रकल्पात समावेश नसलेल्या पारसिक हिलच्या पलीकडील १४ गावांचा यात समावेश होता. त्यानुसार महापालिकेने दहा वर्षांत सुमारे ७५ कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी रस्ते, पिण्याचे पाणी, माता बाल संगोपन केंद्र, नागरी आरोग्य केंद्र व प्राथमिक शाळांची निर्मिती केली; परंतु महापालिका आपल्या वडिलोपार्जित जमिनी ताब्यात घेईल, या भीतीने सुविधा आणि कररचनेचा बाऊ करीत ग्रामस्थांनी संघर्ष समितीच्या माध्यमातून महापालिकेतून ही गावे वगळण्याची मागणी केली. या मागणीसाठी रक्तरंजित संघर्ष करण्यात आला. ग्रामस्थांचा विरोध लक्षात घेऊन राज्य शासनाने ही गावे महापालिकेतून वगळून ती स्वतंत्र केली. त्यामुळे या गावांचा कारभार पुन्हा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू झाला. असे असले तरी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अपेक्षित विकास साधला जात नसल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. याचाच परिणाम म्हणून पुन्हा महापालिकेत समावेश व्हावा, यासाठी ग्रामस्थांचा पाठपुरावा सुरू आहे. १४ गाव सर्वपक्षीय संघर्ष समितीने दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन दिले होते. या मागणीसाठी आता ग्रामस्थ पुन्हा आक्रमक झाले आहेत.मागील काही वर्षांत १४ गाव परिसरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. लोकवस्ती झपाट्याने वाढत आहे. ग्रामपंचायतीच्या अपुºया उत्पन्नातून या क्षेत्रात पायाभूत सुविधा पुरविण्यास मर्यादा येत आहेत. पाणीपुरवठा, घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापनाचे प्रश्न गंभीर बनले आहेत. गावातील शासकीय गुरचरण जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सक्षम शासकीय यंत्रणा कार्यरत होणे आवश्यक आहे. त्यामुळेच ही १४ गावे पुन्हा समाविष्ट करण्याच्या दृष्टीने महापालिकेने सकारात्मक कार्यवाही करावी, अशी मागणी दहिसर ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच चेतन गजानन पाटील, सदस्य गुरुनाथ मधुकर पाटील यांनी केली आहे.