शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
4
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
5
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
6
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
7
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
8
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
9
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
10
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
11
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
12
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
13
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
14
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
15
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
16
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
17
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
18
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
19
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
20
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार

महापालिकेत युतीचा एकछत्री कारभार?

By admin | Updated: January 20, 2015 00:10 IST

ठाणे महापालिकेत महायुती आणि लोकशाही आघाडीच्या समसमान असलेल्या बलाबलात आता पोटनिवडणुकीमुळे बदल झाला आहे.

अजित मांडके ल्ल ठाणेठाणे महापालिकेत महायुती आणि लोकशाही आघाडीच्या समसमान असलेल्या बलाबलात आता पोटनिवडणुकीमुळे बदल झाला आहे. पोटनिवडणुकीमुळे शिवसेनेच्या तीन जागा वाढल्या असून काँग्रेसच्या तीन जागा कमी झाल्या आहेत. तर राष्ट्रवादीच्या पुन्हा ३४ जागा झाल्या आहेत. एकूणच आता महापालिकेत महायुतीचे पक्षीय बलाबल ६७ झाले असून लोकशाही आघाडीचे संख्याबळ हे ६५ वरून ६२ वर आले आहे. त्यामुळे महापालिकेवर तीन वर्षांनंतर महायुतीच्या एककलमी अमलाचे फाटक पुन्हा एकदा खुले झाले आहे.विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसचे नगरसेवक रवींद्र फाटक यांनी सात नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश केला होता. परंतु, विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने पुन्हा त्यांनी पोटनिवडणूक लढविली. त्यांच्यासह काँग्रेसच्या तीन नगरसेवकांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्याने वागळेतही पोटनिवडणूक लागली होती. उर्वरित चार नगरसेवक हे शरीराने काँग्रेसमध्ये असले तरी ते मनाने शिवसेनेत आहेत. दरम्यान, पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर लढणाऱ्या फाटक दाम्पत्यासह कांचन चिंदरकर या विजयी झाल्याने शिवसेनेचे संख्याबळ तीनने वाढले आहे. सध्या शिवसेनेचे संख्याबळ ५२ असून त्यात आता तीन नगरसेवकांची भर पडल्याने ते आता ५५ झाले आहे. दुसरीकडे काँग्रेसचे संख्याबळ हे १८ वरून १५ वर आले आहे. तर राष्ट्रवादीचे संख्याबळ हे ३४ होते. ते आता पुन्हा तेवढेच झाले आहे. दोन नगरसेवकांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरल्याने मुंब्य्रात पोटनिवडणूक झाली होती. या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने आपल्या जागा अबाधित ठेवल्या आहेत. पालिकेत २०१२ नंतर डळमळीत होत असलेले महायुतीचे सिंहासन भक्कम झाले आहे. विशेष म्हणजे महायुतीची ताकद आणखी वाढली असून लोकशाही आघाडी आता पिछाडीवर पडली आहे. यापूर्वी पालिकेत शिवसेनेचे संख्याबळ हे ५३ होते. परंतु काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे लॉरेन्स डिसोझा यांचे नगरसेवक पद रद्द झाल्याने आता ते ५५ झाले असून भाजपा ८, रिपाइं १, बसपा २ आणि एक अपक्ष असे मिळून सत्ताधारी शिवसेना-भाजपाकडे आता ६७ चे संख्याबळ झाले आहे. दुसरीकडे लोकशाही आघाडीकडे राष्ट्रवादीचे ३४ नगरसेवक होते. परंतु, दोघांचे नगरसेवक बाद झाल्याने त्यांची संख्या ३२ झाली होती. परंतु, आता पुन्हा ३४ झाली असून काँग्रेसची संख्या मात्र १८ वरून १५ वर आली आहे. त्यांच्या गोटात मनसेचे सात, अपक्ष सहा असे मिळून ६५ चे संख्याबळ होते. परंतु, आता तीन नगरसेवकांचे संख्याबळ घटल्याने लोकशाही आघाडीचे संख्याबळ आता ६२ वर आले आहे. स्थायी समितीत वर्णी? : रवींद्र फाटक हे निवडून आल्याने आता त्यांना महापालिकेत कोणते पद मिळते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. स्थायी समिती सभापतीपदी वर्णी लागेल, अशी शक्यता आधी वर्तविली जात होती. परंतु, भाजपाच्या आशा शेरबहादूर सिंह यांनी स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा दिल्याने स्थायी समिती आता भाजपाच्या वाटेल जाईल, हे निश्चित झाले आहे. परंतु, आता फाटकांना पालिकेत कोणते पद मिळते, याबाबतची उत्सुकता मात्र पालिकेत वाढली आहे.