शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

मुंबई-अहमदाबाद हाय वे जॅम

By admin | Updated: May 16, 2017 00:51 IST

मुंबई अहमदाबाद हायवेवरील जुन्या वरसोवा पूलावरून किती टन वजनाच्या गाड्या जाऊ शकतात याच्या निश्चितीसाठी रविवारपासून पूल वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात

लोकमत न्यूज नेटवर्कवसई : मुंबई अहमदाबाद हायवेवरील जुन्या वरसोवा पूलावरून किती टन वजनाच्या गाड्या जाऊ शकतात याच्या निश्चितीसाठी रविवारपासून पूल वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आल्याने हायवेवर वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे लोकांचे प्रचंड हाल सुरु झाले आहेत. हा पूल चार दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याने मुंबईकडे जाणारी वाहने मनोर नाका आणि चिंचोटी नाक्यावरून वळवण्यात आली आहेत. जुन्या वरसोवा पूलाला तडे गेल्याने २४ डिसेंबर २०१३ पासून हा पूल सहा महिने बंद ठेवण्यात आला होता. त्यावेळी एक गर्डर बदलून हा पूल वाहतूकीसाठी पुन्हा सुरु करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर आॅक्टोबर २०१६ ला या पुलाला तडे गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर या पूलावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली होती. या पूलावरून आॅक्टोबर महिन्यापासून फक्त हलक्या वाहनांची वाहतूक सुरु ठेवण्यात आली आहे. त्यासाठी एकदिशा मार्ग सुरु ठेवण्यात आला आहे. एकेरी वाहतूक वीस मिनिटे सुरु ठेवली जात असल्याने सध्या याठिकाणी वाहतूक कोंडीने वाहनचालकांना त्रस्त केले आहे.आता जुन्या पूलाच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्यात आले आहे. या पूलावरून किती वजनाची वाहने जाऊ शकतात याची तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी रविवारपासून चार दिवस पूलावरून वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. सध्या एकाच पूलावरून वाहतूक सुरु ठेवण्यात आल्यामुळे रविवारपासून मुंबई अहमदाबाद हायवेवर वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. सध्या अवज़ड वाहने मनोर आणि चिंचोटी नाक्यावरून वळवण्यात आली आहेत. असे असले तरी सध्या हायववेर दहा-दहा किलोमीटरच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत. दरम्यान, जुन्या पूलाला तडे गेल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ११ जून २०१४ पासून १५ टनांपेक्षा अधिक क्षमतेच्या वाहनांना बंदी घातली आहे. त्यानंतर ठाणे आणि पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांनाही बंदीचेआदेश दिलेले आहेत. तरीही त्याचे सर्रास उल्लंघन होत असल्याचा आरोप नेत्यांनी व स्थानिकांनी केला आहे.