शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

अनधिकृत झोपडपट्टीत जास्त कुपोषण

By admin | Updated: September 17, 2014 01:30 IST

अनधिकृत झोपडय़ांमध्ये राहणारी 70 टक्के मुले तर अधिकृत झोपडय़ांमध्ये राहणारी 4क्.67 टक्के मुले कुपोषित असल्याचे सर्वेक्षणात समोर आले आहे.

मुंबई  : मुंबईतील अनधिकृत झोपडय़ा हा विषय नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतोच. मात्र एका सर्वेक्षणातून पुढे आलेल्या माहितीमुळे हा विषय अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याचे दिसून आले आह़े कारण अनधिकृत झोपडय़ांमध्ये राहणारी 70 टक्के मुले तर अधिकृत झोपडय़ांमध्ये राहणारी 4क्.67 टक्के मुले कुपोषित असल्याचे सर्वेक्षणात समोर आले आहे.
घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकरनगर आणि इंडियन ऑइलनगर या दोन झोपडपट्टय़ांमधील 3क्क् लहान मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. ऑब्झव्र्हर रिसर्च फाउंडेशन आणि एम. बी. बारविला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिरांचे आयोजन करून हे सर्वेक्षण करण्यात आले. अनधिकृत झोपडपट्टीमध्ये कुपोषणाचे प्रमाण जास्त दिसून आले आहे. यामध्ये असेही आढळून आले आहे की, यापैकी 41 टक्के मुले ही त्यांना मिळणा:या मिडडे मिलमधले अर्धे किंवा त्याहून कमी अन्न खातात. आणि इतर अन्न फेकून देतात. कुपोषणाचा परिणाम हा फक्त मुलांच्या शारीरिक वाढीवर होत नाही, तर बौद्धिक वाढीवरदेखील होतो. कुपोषित मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नाही, एकाग्रता कमी असते. 
मुलांची वाढ देखील खुंटलेली दिसल्याचे चित्र या परिसरामध्ये दिसून आले आहे. अधिकृत झोपडपट्टीमध्ये राहणा:या 34 टक्के मुलांची वाढ खुंटलेली दिसून आली तर अनधिकृत झोपडपट्टीमध्ये राहणा:या 51.33 टक्के मुलांची वाढ खुंटलेली असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. काही मुलांना चांगल्या सवयी नसल्याचेही दिसून आले आहे. त्यांची वर्तणूक सामान्य मुलांसारखी नसून त्रसदायक असल्याचेही दिसून आले आहे. ज्या मुलांच्या घरी पाण्याची जोडणी नाही, रोजच्या रोज अन्न मिळत नाही, 
ज्यांच्या घराच्या आजूबाजूचा 
परिसर अस्वच्छ आहे अशा मुलांमध्ये हे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले आहे.  (प्रतिनिधी)
 
कुपोषण कमी करण्यासाठी काय करू शकता ?  अंगणवाडीत मिडडे मेल, खाऊ दिला जातो त्यामध्ये बदल करण्यात यावा. मुलांना कशाची गरज आहे, काय खातील याचा विचार केला गेला पाहिजे. मुलांसाठी कोणते अन्न सकस आहे, याविषयी पालकांमध्ये जागृती केली पाहिजे. महापालिका शाळांमधील आरोग्य कार्यक्रमात बदल करण्यात यावेत. स्थलांतरित मुलांर्पयत पोहचण्यासाठी काही उपाययोजना आखल्या पाहिजेत. झोपडपट्टीतील आरोग्याविषयी पुन्हा एकदा विचार करून आरोग्याची आखणी केली पाहिजे.