शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
4
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
5
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
6
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
7
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
8
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
9
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
10
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
11
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
12
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
13
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
14
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
15
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
16
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
17
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
18
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
19
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
20
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...

कोकण भवनवर धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 01:36 IST

उपायुक्तांचे आश्वासन : मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

नवी मुंबई : शासनाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही गावांमध्ये राबविण्यात आलेल्या अरुणा प्रकल्पात स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करताना कायद्याची उलट अंमलबजावणी झाल्याचा आरोप करीत प्रकल्पग्रस्तांनी कोकण भवन कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. पुनर्वसन विभागाच्या उपआयुक्तांनी माहिती घेऊन कार्यवाही करण्याचे आश्वासन आंदोलकांना दिले असून मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

अरुणा मध्यम प्रकल्प राबविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील आखवणे, नागपवाडी, भोम गावातील प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी शासनाने संपादित केल्या आहेत. या प्रकल्पाला सुरु वात करताना प्रकल्पग्रस्तांना मोबदला, पर्यायी शेती, २३ नागरी सुविधांसह पुनर्वसन करणे, बंधनकारक होते; परंतु तसे न करता बेजबाबदारपणे कायद्याचे उल्लंघन केले असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. जुलै महिन्यात प्रकल्पात पाणीसाठा सुरू झाल्याने प्रकल्पग्रस्तांची सुमारे १२५ राहती घरे पाण्याखाली जाऊन ५०० कुटुंबांचे लाखो रु पयांचे नुकसान झाल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. सदर विषयात न्याय मिळविण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी शुक्रवार, ८ नोव्हेंबर रोजी कोकण भवन कार्यालयावर धरणे आंदोलन केले. या वेळी धरणाच्या पाण्याखाली घरे जाऊन झालेल्या प्रकल्पग्रस्तांना दहा लाखांची मदत मिळावी, बेघर झालेल्या कुटुंबांना नागरी सुविधांसह निवासी भूखंड देण्यात यावेत, कार्यवाही होईपर्यंत मासिक घरभाडे म्हणून २० हजार रु पये देण्यात यावेत. संपूर्ण मोबदला मिळण्यासाठी असलेल्या त्रुटी निकाली काढाव्यात, ज्या कुटुंबांना शासकीय नोकरीची आवश्यकता नाही, अशा कुटुंबांना १५ लाख रु पये देण्यात यावेत, अशा विविध १९ मागण्या प्रकल्पग्रस्तांनी केल्या आहेत. आंदोलकांच्या कमिटीने कोकण विभागाचे पुनर्वसन उपायुक्त अरु ण अभंग यांच्याशी याबाबत चर्चा केली. कमिटीने अभंग यांना दिलेल्या माहितीचा दोन आठवड्यात अहवाल मागवून पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे लढा संघर्षाचा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तानाजी कांबळे यांनी सांगितले. न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला, या वेळी सुरेश नागप, श्रीधरबुवा नागप, शा. गो. नागप, अजय नागप, प्रकाश सावंत, सूर्यकांत नागप, प्रकाश मोरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई