शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

विनापरवाना रिक्षांवर चालढकल कारवाई

By admin | Updated: June 18, 2017 02:22 IST

शहरात विनापरवाना रिक्षा चालवल्या जात असतानाही त्यावर कारवाईला आरटीओ चालढकल करत असल्याचे दिसत आहे. वाढत्या विनापरवाना रिक्षांच्या संख्येमुळे

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शहरात विनापरवाना रिक्षा चालवल्या जात असतानाही त्यावर कारवाईला आरटीओ चालढकल करत असल्याचे दिसत आहे. वाढत्या विनापरवाना रिक्षांच्या संख्येमुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे विनापरवाना रिक्षांच्या आडून गुन्हेगारांना आश्रय मिळत असल्याने त्यांच्यावर कारवाईची नागरिकांची मागणी आहे.स्मार्ट सिटी म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबईची बोगस रिक्षांचे शहर, अशी दुसरी ओळख निर्माण होत चालली आहे. राज्यात विविध ठिकाणी भंगारात निघालेल्या रिक्षा नवी मुंबईत विनापरवाना चालवल्या जात आहेत. दिवसेंदिवस अशा विनापरवाना रिक्षांची संख्या वाढत चालल्याने प्रत्येक नोडमध्ये त्यांच्या टोळ्या तयार झाल्या आहेत. यामुळे विनापरवाना रिक्षा चालवणाऱ्यांकडून अधिकृत व प्रामाणिक रिक्षाचालकांनाही दमदाटी होत आहे. त्यांच्यात उघडपणे हाणामारीच्या देखील घटना घडत असताना आरटीओ मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा संताप नागरिकांकडून व्यक्त होत आहे. नुकताच ठाणे येथे तरुणीसोबत रिक्षात घडलेल्या प्रकारानंतर ठाणे आरटीओने बोगस रिक्षाचालकांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे; परंतु नवी मुंबईत अद्यापही बोगस रिक्षा सुरूच आहेत. यामुळे ठाण्याप्रमाणे नवी मुंबईत देखील घटना घडल्यानंतर आरटीओ व वाहतूक पोलीस कारवाईचा मुहूर्त शोधणार का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.सद्यस्थितीला नवी मुंबईतले सर्वच नोडमधील प्रमुख रस्ते रिक्षांनी व्यापले आहेत. त्यापैकी बहुतांश रिक्षा विनापरवाना चालवल्या जात आहेत. अद्यापही अनेक रिक्षांना मीटर बसवण्यात आलेले नाहीत, तर काही रिक्षा खासगी वापराच्या परवान्यावर प्रवासी वाहतुकीसाठी वापरल्या जात आहेत. विनापरवाना रिक्षांची कागदोपत्री नोंदच नसल्यामुळे त्यामध्ये ठाण्यासारखी घटना घडल्यास गुन्हेगारांचा शोध घेणार कसा? हा गंभीर प्रश्न आहे. यामुळे हे शहर बोगस रिक्षांपासून मुक्त करावे अशी प्रवासी नागरिकांची मागणी आहे. त्यासंबंधीच्या तक्रारीदेखील अनेकांनी केल्या आहेत. मात्र, यानंतरही आरटीओकडून विनापरवाना रिक्षांविरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली जात नसल्याचे दिसत आहे.