शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

विनापरवाना रिक्षांवर चालढकल कारवाई

By admin | Updated: June 18, 2017 02:22 IST

शहरात विनापरवाना रिक्षा चालवल्या जात असतानाही त्यावर कारवाईला आरटीओ चालढकल करत असल्याचे दिसत आहे. वाढत्या विनापरवाना रिक्षांच्या संख्येमुळे

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शहरात विनापरवाना रिक्षा चालवल्या जात असतानाही त्यावर कारवाईला आरटीओ चालढकल करत असल्याचे दिसत आहे. वाढत्या विनापरवाना रिक्षांच्या संख्येमुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे विनापरवाना रिक्षांच्या आडून गुन्हेगारांना आश्रय मिळत असल्याने त्यांच्यावर कारवाईची नागरिकांची मागणी आहे.स्मार्ट सिटी म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबईची बोगस रिक्षांचे शहर, अशी दुसरी ओळख निर्माण होत चालली आहे. राज्यात विविध ठिकाणी भंगारात निघालेल्या रिक्षा नवी मुंबईत विनापरवाना चालवल्या जात आहेत. दिवसेंदिवस अशा विनापरवाना रिक्षांची संख्या वाढत चालल्याने प्रत्येक नोडमध्ये त्यांच्या टोळ्या तयार झाल्या आहेत. यामुळे विनापरवाना रिक्षा चालवणाऱ्यांकडून अधिकृत व प्रामाणिक रिक्षाचालकांनाही दमदाटी होत आहे. त्यांच्यात उघडपणे हाणामारीच्या देखील घटना घडत असताना आरटीओ मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा संताप नागरिकांकडून व्यक्त होत आहे. नुकताच ठाणे येथे तरुणीसोबत रिक्षात घडलेल्या प्रकारानंतर ठाणे आरटीओने बोगस रिक्षाचालकांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे; परंतु नवी मुंबईत अद्यापही बोगस रिक्षा सुरूच आहेत. यामुळे ठाण्याप्रमाणे नवी मुंबईत देखील घटना घडल्यानंतर आरटीओ व वाहतूक पोलीस कारवाईचा मुहूर्त शोधणार का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.सद्यस्थितीला नवी मुंबईतले सर्वच नोडमधील प्रमुख रस्ते रिक्षांनी व्यापले आहेत. त्यापैकी बहुतांश रिक्षा विनापरवाना चालवल्या जात आहेत. अद्यापही अनेक रिक्षांना मीटर बसवण्यात आलेले नाहीत, तर काही रिक्षा खासगी वापराच्या परवान्यावर प्रवासी वाहतुकीसाठी वापरल्या जात आहेत. विनापरवाना रिक्षांची कागदोपत्री नोंदच नसल्यामुळे त्यामध्ये ठाण्यासारखी घटना घडल्यास गुन्हेगारांचा शोध घेणार कसा? हा गंभीर प्रश्न आहे. यामुळे हे शहर बोगस रिक्षांपासून मुक्त करावे अशी प्रवासी नागरिकांची मागणी आहे. त्यासंबंधीच्या तक्रारीदेखील अनेकांनी केल्या आहेत. मात्र, यानंतरही आरटीओकडून विनापरवाना रिक्षांविरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली जात नसल्याचे दिसत आहे.