शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

विनापरवाना रिक्षांवर चालढकल कारवाई

By admin | Updated: June 18, 2017 02:22 IST

शहरात विनापरवाना रिक्षा चालवल्या जात असतानाही त्यावर कारवाईला आरटीओ चालढकल करत असल्याचे दिसत आहे. वाढत्या विनापरवाना रिक्षांच्या संख्येमुळे

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शहरात विनापरवाना रिक्षा चालवल्या जात असतानाही त्यावर कारवाईला आरटीओ चालढकल करत असल्याचे दिसत आहे. वाढत्या विनापरवाना रिक्षांच्या संख्येमुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे विनापरवाना रिक्षांच्या आडून गुन्हेगारांना आश्रय मिळत असल्याने त्यांच्यावर कारवाईची नागरिकांची मागणी आहे.स्मार्ट सिटी म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबईची बोगस रिक्षांचे शहर, अशी दुसरी ओळख निर्माण होत चालली आहे. राज्यात विविध ठिकाणी भंगारात निघालेल्या रिक्षा नवी मुंबईत विनापरवाना चालवल्या जात आहेत. दिवसेंदिवस अशा विनापरवाना रिक्षांची संख्या वाढत चालल्याने प्रत्येक नोडमध्ये त्यांच्या टोळ्या तयार झाल्या आहेत. यामुळे विनापरवाना रिक्षा चालवणाऱ्यांकडून अधिकृत व प्रामाणिक रिक्षाचालकांनाही दमदाटी होत आहे. त्यांच्यात उघडपणे हाणामारीच्या देखील घटना घडत असताना आरटीओ मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा संताप नागरिकांकडून व्यक्त होत आहे. नुकताच ठाणे येथे तरुणीसोबत रिक्षात घडलेल्या प्रकारानंतर ठाणे आरटीओने बोगस रिक्षाचालकांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे; परंतु नवी मुंबईत अद्यापही बोगस रिक्षा सुरूच आहेत. यामुळे ठाण्याप्रमाणे नवी मुंबईत देखील घटना घडल्यानंतर आरटीओ व वाहतूक पोलीस कारवाईचा मुहूर्त शोधणार का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.सद्यस्थितीला नवी मुंबईतले सर्वच नोडमधील प्रमुख रस्ते रिक्षांनी व्यापले आहेत. त्यापैकी बहुतांश रिक्षा विनापरवाना चालवल्या जात आहेत. अद्यापही अनेक रिक्षांना मीटर बसवण्यात आलेले नाहीत, तर काही रिक्षा खासगी वापराच्या परवान्यावर प्रवासी वाहतुकीसाठी वापरल्या जात आहेत. विनापरवाना रिक्षांची कागदोपत्री नोंदच नसल्यामुळे त्यामध्ये ठाण्यासारखी घटना घडल्यास गुन्हेगारांचा शोध घेणार कसा? हा गंभीर प्रश्न आहे. यामुळे हे शहर बोगस रिक्षांपासून मुक्त करावे अशी प्रवासी नागरिकांची मागणी आहे. त्यासंबंधीच्या तक्रारीदेखील अनेकांनी केल्या आहेत. मात्र, यानंतरही आरटीओकडून विनापरवाना रिक्षांविरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली जात नसल्याचे दिसत आहे.