शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

३० हजारांहून अधिक भटके कुत्रे

By admin | Updated: February 7, 2016 02:53 IST

रात्री-अपरात्री घरी परतणाऱ्या नागरिकांवर भटक्या कुत्र्यांचे हल्ले होत असल्याने शहरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. संपूर्ण शहरात सुमारे तीन हजार कुत्रे आहेत.

- सूर्यकांत वाघमारे,  नवी मुंबई

रात्री-अपरात्री घरी परतणाऱ्या नागरिकांवर भटक्या कुत्र्यांचे हल्ले होत असल्याने शहरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. संपूर्ण शहरात सुमारे तीन हजार कुत्रे आहेत. निर्बीजीकरणावर दरवर्षी दीड ते दोन कोटी रुपये खर्च होत असले तरी कुत्र्यांची संख्या वाढत असल्याचे समोर येत आहे. भरदिवसा लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांवर कुत्र्यांचे हल्ले होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रात्रीच्या वेळी तर प्रत्येक विभागातल्या रस्त्यावर मोठ्या संख्येने भटके कुत्रे फिरत असतात. हे कुत्रे रात्रीच्या वेळी दुचाकीचालकांच्या मागे लागत असल्याने अपघाताच्या घटनाही शहरात घडल्या असून, यात अनेक जण जखमी झाले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भटक्या श्वानांविषयी चीड निर्माण झालेली आहे.महापालिकेतर्फे २०१२ मध्ये झालेल्या श्वान गणनेनुसार शहरात २९ हजार ८६४ श्वान आहेत. मात्र मागील तीन वर्षांत यात मोठी वाढ झाली आहे. भटके कुत्रे मारण्यावर बंदी असल्याने महापालिकेकडून निर्बीजीकरण करण्यात येते असून, इन डिफेन्स अ‍ॅनिमल या संस्थेमार्फत पालिका हे काम हाताळत आहे. संस्थेला प्रतिश्वान ४०० रुपये दिले जातात. त्यानुसार दरवर्षी महापालिका क्षेत्रातून सुमारे साडेचार ते पाच हजार श्वान पकडले जात असून त्यांच्यावर दीड ते दोन कोटी रुपयांचा खर्च होत आहे. अशाप्रकारे या संस्थेने मागील ८ वर्षांत ३४ हजार ५०० श्वानांना पकडून त्यांच्यावर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया केलेली आहे. एकूण ३४ हजार श्वानांवर सुमारे १६ कोटी रुपयांचा खर्च पालिकेने संस्थेच्या माध्यमातूून केलेला आहे.महापालिकेच्या आठ विभागांतून प्रतिवर्षी ३०० ते ५०० श्वान पकडले जात आहेत. यानंतर त्यांचे निर्बीजीकरण करून पुन्हा त्याच परिसरात सोडले जाते. मात्र वर्षानुवर्षे होणाऱ्या निर्बीजीकरणानंतरही विभागनिहाय वाढती श्वानांची संख्या पाहून पालिकेच्या मोहिमेबाबत नागरिकांना प्रश्नचिन्ह पडत आहे. दिवसा सहसा न दिसणारे कुत्रे रात्रीच्या वेळी मात्र समूहाने रस्त्यावर फिरत असतात. अनेकदा त्यांची संख्या व आक्रमकता पाहून नागरिकांनाही आपला मार्ग बदलावा लागतो. त्यामुळे कुत्रे पकडण्याची कारवाई रात्रीदेखील करण्याची मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे.