शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

मोरबेत सप्टेंबरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 23:33 IST

नागरिकांना दिलासा : पाणीकपात टळली

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मुंबईनंतर राज्यात स्वत:च्या मालकीचे धरण असलेली नवी मुंबई ही राज्यातील दुसरी महापालिका ठरली आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघाला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात सध्या पुढील चार महिने म्हणजेच सप्टेंबर महिन्यापर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांची पाण्याविषयीची चिंता मिटली आहे.गेल्या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने धरण ओव्हरफ्लो झाले होते. गेल्या वर्षी मागील ९८ वर्षांनंतर प्रथमच धरण परिसरात जवळजवळ पाच हजार मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणात मुबलक पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. हे पाणी पुढील चार महिने म्हणजेच सप्टेंबरपर्यंत पुरेल, असा विश्वास महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.धरणाची पाणी साठविण्याची क्षमता १९०.८९ एवढी असून धरण ८८ मीटर पातळीला पूर्ण क्षमतेने भरते. सध्या धरणातील पाण्याची पातळी ७४ मीटर इतकी असल्याची माहिती मोरबे धरणाचे कार्यकारी अभियंता अजय संखे यांनी ‘लोकमत’ला दिली. विशेष म्हणजे गेल्या वर्षी तिवरे धरणाच्या दुर्घटनेनंतर मोरबे धरणाची पाटबंधारे विभागामार्फत पाहणी करण्यात आली होती. तेव्हा धरण मजबूत असल्याचे व नवीन अभियंत्यांना अभ्यास करण्यासाठी हे धरण दाखविले जावे, अशी शिफारस करण्यात आली होती.नवी मुंबई शहर हे मोरबे धरणामुळे जलसंपन्न झाले आहे. धरणातून शहराला चोवीस तास अखंडित पाणीपुरवठा केला जातो.