शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

पनवेलमधील मोरबे धरणाला गळती

By admin | Updated: May 5, 2016 01:14 IST

मोरबे धरणाच्या भिंतींना ठिकठिकाणी तडे गेल्यामुळे त्यातून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. धरणाची डागडुजी करण्याकडे पाटबंधारे खाते दुर्लक्ष करत असल्याचा आरोप

पनवेल : मोरबे धरणाच्या भिंतींना ठिकठिकाणी तडे गेल्यामुळे त्यातून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. धरणाची डागडुजी करण्याकडे पाटबंधारे खाते दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत.पनवेल तालुक्यातील खैरवाडी- गारमाळ परिसरात वसलेले हे मोरबे धरण जवळपास ५० एकर जमिनीवर आहे. या धरणाचे पाणी आजूबाजूच्या गावातील शेतीसाठी तसेच मोरबे, दुंदरेपाडा, चिंचवली या गावांना पिण्यासाठी वापरले जाते. ३.२२ दशलक्ष घनमीटर या धरणाची क्षमता असून ३.१२ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा असतो. तालुक्यातील अनेक गावे पाणीटंचाईने त्रस्त आहेत. सद्यस्थितीत पनवेलमधील ३६ गावे -वाड्यामध्ये पाणीटंचाईसदृश परिस्थिती आहे. येथील आदिवासी बांधवांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे आणि मोरबे धरणातून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. कित्येक महिन्यांपासून धरणाच्या दुरु स्तीकडे पाटबंधारे विभाग लक्ष देत नसल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. मोरबे धरणात पहिल्यांदाच पिंजरा पालन पद्धतीद्वारे मत्स्यव्यवसाय करण्यात येत आहे. ही पद्धत नवीन असून या मत्स्य प्रकल्पामुळे येथील पाणी प्रदूषित झाले असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. धरणातील पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे बाजूला खड्डा खोदून त्यातून पिण्यासाठी पाणी नेता येत नसल्याचे आदिवासी बांधव सांगतात. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या फोडून काचा अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत. एकंदरीत धरण परिसरात दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे पाटबंधारे खात्याने धरणाला लागलेली गळती व दुर्गंधी थांबवावी अशी मागणी येथील नागरिक करत आहे. (प्रतिनिधी)यासंदर्भात अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. ते तपासणीसाठी कोलाड व ठाणे येथील कार्यालयात पाठविण्यात आले आहे. त्यानंतरच धरणाच्या दुरु स्तीला सुरुवात करण्यात येईल.- निकीता महाडिक, शाखा अभियंता,पाटबंधारे विभाग, पनवेल