शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

पाण्यासाठी मोर्बे धरणाची चाचपणी

By admin | Updated: April 30, 2016 02:31 IST

प्रस्तावित पनवेल महानगरपालिकेचा अहवाल जवळपास तयार झाला आहे.

प्रशांत शेडगे,

पनवेल-प्रस्तावित पनवेल महानगरपालिकेचा अहवाल जवळपास तयार झाला आहे. लोकसंख्या, त्यानुसार अभ्यास समितीने वाढत्या लोकसंख्येनुसार आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांचा आढावा घेतला आहे. त्यानुसार प्रस्तावित पनवेल महापालिकेसाठी प्रतिदिनी सुमारे ६५0 एमएलडी पाण्याची आवश्यकता भासणार आहे. त्याकरिता बाळगंगा हेटवणे धरणाबरोबरच पनवेल तालुक्यातील मोर्बे धरणाची चाचपणी केली जात आहे. यासंदर्भात महसूल आणि पाटबंधारे विभागाकडून माहिती मागविण्यात आल्याचे समजते. नवीन महापालिकेच्या स्थापनेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकण विभागीय आयुक्त तानाजी सत्रे यांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास समिती गठीत केली आहे. या समितीने मागील काही महिन्यात भौगोलिक स्थिती, कृषिक अकृषिक क्षेत्र,नगरपालिका, ग्रामपंचायतीचा महसूल, भौगोलिक तसेच प्रशासकीय व आवश्यक मनुष्यबळ आदी गोष्टींचा आढावा घेवून अंतिम अहवाल तयार केला आहे. महापालिका झाल्यानंतर नेमके काय बदल होतील, त्याचबरोबर कोणत्या कोणत्या पायाभूत सुविधांची आवश्यकता भासणार आहे याबाबत परिपूर्ण माहितीचा या अहवालात समावेश करण्यात आला आहे. तसेच प्रस्तावित महापालिकेला भविष्यात भविष्यात नेमके किती पाणी लागेल याबाबतीचा आढावाही घेण्यात आला आहे. त्यानुसार प्रस्तावित पनवेल महापालिकेला पाण्याची मोठ्याप्रमाणात गरज लागणार असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. ही तहान भागविण्याकरिता कोणते कोणते पर्याय आहेत याचीही चाचपणी करण्यात आलेली आहे. आजच्या घडीला पनवेल नगरपालिका हद्द आणि नवीन पनवेल, कळंबोली या वसाहतींना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा केला जातो. नवी मुंबई महापालिका आणि सिडको प्राधिकरणाकडून पाणी विकत घेवून रहिवाशांना पुरवते. कामोठे वसाहतीला नवी मुंबई महानगरपालिकेकडून तर खारघरला हेटवणे धरणातून पाणी दिले जाते. कित्येक गावे बोअरवेलवर अवलंबून आहेत. त्यामुळे जर महानगरपालिका झाली तर पाण्याचे नेमके काय नियोजन करावे लागेल याचा अभ्यासही समितीने केला आहे. प्रस्तावित महानगरपालिकेला एमजेपी,एमआयडीसी हेटवणे धरणातून तर पाणी घ्यावे लागणार आहेच, त्याचबरोबर मोठी तहान शमविण्याकरिता बाळगंगा आणि कोंढाणे धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी घ्यावे लागणार आहे. या धरणातून जवळपास ६00 एमएलडी पाणी उपलब्ध होवू शकते, असा समितीचा निष्कर्ष आहे.