शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइलमुळे मैदानी खेळांना पूर्णविराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 02:00 IST

नवी मुंबईतील परिस्थिती : मुलांचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य खालावतेय 

सूर्यकांत वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : नवी मुंबईत कोरोनामुळे मागील वर्षभरापासून प्रत्यक्षात शाळा न भरता ऑनलाइन सुरू आहेत. परिणामी लहान मुलांचा अधिकाधिक वेळ मोबाइलवर जात आहे. यामुळे अनेकांचे मानसिक व शारीरीक स्वास्थ्य खालावू लागले आहे. आजवर लहान मुलांना मोबाइलपासून दूर ठेवा सांगणाऱ्या पालकांनाच मुलांच्या हाती मोबाइल द्यायची वेळ आली आहे. त्यास काही प्रमाणात ऑनलाइन क्लास कारणीभूत ठरले आहेत. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने प्रायमरीच्या मुलांचेही ऑनलाइन क्लास घेतले जात आहेत. यादरम्यान मुलांनी मोबाइल अथवा संगणकासमोर बसावे यासाठी त्यांना त्याची सवय लावली जात आहे. परिणामी मुलांना स्मार्टफोनचा लळा लागल्याने मैदानात जाऊन खेळण्याकडे दुर्लक्ष होत आहे, तर एकमेकांचा संपर्क टाळण्यासाठी पालकांकडूनदेखील मुलांना घराबाहेर पाठवण्यास चालढकल होत आहे. त्यामुळे पुढील काळात मुलांना लागलेली मोबाइलची सवय तोडणे, हेदेखील पालकांना आव्हानात्मक ठरणार आहे. सतत मोबाइलमध्ये डोकावल्याने मुलांच्या डोळ्यांवर तर परिणाम होतच आहे. शिवाय अनेकांची झोपदेखील कमी झाली आहे. याचा परिणाम त्यांच्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्यावर उमटत आहे.लिखाणाचा विसरशाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकडून अधिकाधिक लिखाण होत असते. शिवाय त्यांची पाठांतर शक्ती वाढत असते. परंतु ऑनलाइन शिक्षणामुळे केवळ स्मार्टफोनवर व्हिडिओ बघण्यातच मुलांचा अधिक वेळ जात आहे. यामुळे मुलांची लिखाणाची सवय तुटत चालली आहे. त्यांना पुन्हा लिखाणाकडे वळवायचे असल्यास शाळा हाच उत्तम पर्याय आहे. 

मुले कायम मोबाइलवरऑनलाइन शिक्षणाच्या बहाण्याने प्रायमरी शाळा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून मुलांच्या परीक्षा ऑनलाइनच घेतल्या जात आहेत. त्यात अवघी काहीच मुले शिक्षकांच्या दृष्टीस पडत असल्याने इतर मुले दुर्लक्षित राहत आहेत. अशा मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. त्यामुळे ऑनलाइनपेक्षा ऑफलाइन शिक्षणच बरे अशी भावना अनेक पालकांची आहे.

कोरोनामुळे मोबाइलवर गेम खेळण्याचे प्रमाण वाढले कोरोनामुळे शहरातील उद्याने व मैदाने खेळासाठी बंद आहेत. परिणामी लहान मुलांना घरातच मोबाइलवर वेळ काढावा लागत आहे. अशावेळी त्यांना एका जागी खिळवून ठेवण्यासाठी पालकांना मुलांच्या हाती मोबाइल द्यावा लागत आहे. यामुळे त्यांना वेगवेगळ्या गेमची प्रमाणाबाहेर आवड निर्माण झाली आहे.