शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
2
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
3
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
4
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
5
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
6
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
7
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
8
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
9
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
10
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
11
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
12
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
13
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
14
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
15
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
16
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
17
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
18
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
19
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
20
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार

जेएनपीटी सीएसआर फंडाचा गैरवापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 06:47 IST

जेएनपीटी बंदर उरण तालुक्यात येते. मात्र जेएनपीटी प्रशासनाने सीएसआर फंडाचा उपयोग उरण तालुक्यासाठी केला नसून राज्यातील विविध जिल्ह्यातील प्रकल्प, विविध कार्यक्र मांना केला असल्याची माहिती उघडकीस आले आहे.

- मधुकर ठाकूरउरण - जेएनपीटी बंदर उरण तालुक्यात येते. मात्र जेएनपीटी प्रशासनाने सीएसआर फंडाचा उपयोग उरण तालुक्यासाठी केला नसून राज्यातील विविध जिल्ह्यातील प्रकल्प, विविध कार्यक्र मांना केला असल्याची माहिती उघडकीस आले आहे.जेएनपीटी बंदर उरणमध्ये येत असले तरी सीएसआरचा एकही रु पया उरणसाठी खर्च न झाल्याने उरणमधील नागरिकांची एक प्रकारची फसवणूक झाली आहे. सीएसआर फंडाचा निधी समस्याग्रस्त जेएनपीटी प्रकल्पग्रस्त गावांसाठी न वापरता इतरत्र वापरल्यामुळे प्रकल्पग्रस्तांवर झालेल्या अन्यायाविरोधात आवाज उठविण्यासाठी १७ मे रोजी उरणमधील करळ फाटा येथे उरण सामाजिक संस्थेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.माहिती अधिकारअंतर्गत उघड झालेल्या माहितीनुसार २०१६-१७ ते २०१७-१८ या दोन वर्षात सीएसआर फंडातून २१ कोटी रु पयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. नागपूर, अमरावती, नंदुरबार, वाशिम, धुळे, पुणे, औरंगाबाद, लातूर आदी सतरा जिल्ह्यांसाठी हा निधी दिला आहे.जेएनपीटी बंदरासाठी उरण तालुक्यातील दोन गावे विस्थापित झाली आहेत. त्यातील हनुमान कोळीवाडा हे गाव तर वाळवीग्रस्त झाले आहे. इतर प्रकल्पग्रस्त १८ गावात आजही आरोग्य, शिक्षण, रस्ते इत्यादी नागरी सुविधांचा अभाव आहे. अवजड वाहतुकीमुळे तालुक्यात अपघातांचे प्रमाण वाढले असून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अपघातात मृत व्यक्तीचे कुटुंब वा जखमींना जेएनपीटी प्रशासन कोणत्याही प्रकारची मदत करत नाही. येथील डोंगराचे उत्खनन, वृक्षतोड, प्रचंड वाहतूक, धुळीच्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परंतु तालुक्यात अद्ययावत रुग्णालय नाही. उरणमध्ये विविध समस्यांवर उपाययोजना करण्याऐवजी जेएनपीटीने अलीकडेच मुंबईतील रुग्णालयास १ कोटीचा निधी दिला आहे.आंदोलनाचा इशाराउरणमध्ये प्रकल्पग्रस्तांनी एकत्र येवून अभियांत्रिकी विद्यालय उभारण्याचा संकल्प केला आहे. ५ वर्षांपासून सदर संस्था जेएनपीटीकडे आर्थिक मदतीसाठी विनंती करीत आहे. परंतु आश्वासनाखेरीज संस्थेस एक रु पयाचीही मदत नाही. तसेच जेएनपीटी आणि आताच्या सिंगापूर पोर्टमुळे मोरा, हनुमान कोळीवाडा, पाणजे, बेलपाडा, गव्हाण, व उरण कोळीवाडा गावातील मच्छीमारांवर आर्थिक संकट कोसळले असून जेएनपीटीकडून कोणतीही भरपाई मिळालेली नाही.

टॅग्स :JNPTजेएनपीटीRaigadरायगडnewsबातम्या