शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेकडून नागरिकांची दिशाभूल

By admin | Updated: March 28, 2016 02:35 IST

महापालिका क्षेत्रातील १०० टक्के सांडपाण्यावर सीटेक तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक मलनि:सारण केंद्रात प्रक्रिया केली जात असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. परंतु वास्तवामध्ये

- नामदेव मोरे,  नवी मुंबईमहापालिका क्षेत्रातील १०० टक्के सांडपाण्यावर सीटेक तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक मलनि:सारण केंद्रात प्रक्रिया केली जात असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. परंतु वास्तवामध्ये जुईनगर ते नेरूळ पश्चिमेकडील मलनि:सारण वाहिन्या अत्याधुनिक केंद्रांना जोडण्याचे काम रखडले आहे. जुईनगरमधील जुन्या केंद्रातून हे पाणी खाडीत सोडले जात आहे. येथील दुर्गंधीमुळे परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. केंद्र शासनाने सर्व शहरांमधील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याच्या सूचना संबंधित महापालिका व नगरपालिकांना दिल्या आहेत. जेएनएनयूआरएम अंतर्गत महापालिकांना यासाठी अनुदानही दिले होते. नवी मुंबई महापालिकेने या योजनेअंतर्गत शहरामध्ये सीटेक तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन केंद्रे उभारली आहेत. शहरामध्ये ३६१ किलोमीटर लांबीच्या नवीन मलनि:सारण वाहिन्या टाकल्या आहेत. पालिकेला या कामगिरीसाठी केंद्र शासनाचा पुरस्कारही मिळाला आहे. १०० टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी पहिली महापालिका असा उल्लेख प्रशासन नेहमीच करते. पालिकेचा पर्यावरणविषयक अहवाल, संकेतस्थळ यावरही याविषयी माहिती देण्यात आली आहे. परंतु वास्तवामध्ये शहरामध्ये शंभर टक्के मलनि:सारण वाहिन्या जोडण्याचे काम पूर्ण झालेले नाही. नेरूळ पश्चिमेकडील सांडपाणी मलनि:सारण वाहिन्यांच्या द्वारे सानपाडा सेक्टर २० मधील केंद्रामध्ये सोडण्यात येणार होते. परंतु हा परिसर मँग्रोजच्या बफर झोनमध्ये येत आहे. यामुळे राज्य शासनाच्या एमसीझेडएमए प्राधिकरणाची परवानगी घेणे आवश्यक आहे. परंतु संबंधित विभागाने २००६ मधील जनहित याचिकेचा हवाला देवून उच्च न्यायालयाची परवानगी घेण्यास सांगितली आहे. परंतु महापालिकेने याविषयी अद्याप योग्य पाठपुरावा केलेला नाही. नेरूळ पश्चिम व जुईनगरमधील सांडपाणी सेक्टर २ मधील जुन्या मलप्रक्रिया केंद्रात सोडले जात आहे. येथे जुन्या व कालबाह्य झालेल्या यंत्रणेच्या मार्फत या सांडपाण्यावर काही प्रमाणात प्रक्रिया केली जात आहे. उर्वरित पाणी तसेच खाडीमध्ये सोडून दिले जात आहे. जुईनगरमध्ये मध्यवर्ती ठिकाणी हे केंद्र आहे. त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी निर्माण होत आहे. या परिसरातील नागरिकांनी सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी सानपाडा केंद्राला जोडण्याचे काम लवकरात लवकर करण्याची मागणी केली आहे. जुना प्रकल्प बंद करून त्या जागेचा परिसरातील नागरिकांना इतर सुविधा देण्यासाठी वापर करण्याची मागणी केली आहे. स्थानिक नगरसेवक रंगनाथ औटी यांनीही याविषयी वारंवार पाठपुरावा केला आहे. वास्तविक नेरूळसारख्या महत्त्वाच्या विभागातील मलनि:सारण वाहिन्या जोडण्याचे काम अपूर्ण असल्याची माहिती पालिकेने आतापर्यंत लोकप्रतिनिधी व नागरिकांकडून लपवून ठेवली होती. सार्वजनिक अभियांत्रिकी विभागाने यापूर्वी अत्याधुनिक मलनि:सारण केंद्रातील पाणी विकून पालिकेला करोडो रूपये मिळतील असे स्वप्न दाखविले होते. परंतु प्रत्यक्षात रोज १८० एमएलडी पाणी खाडीत सोडले जात आहे. याच पद्धतीने मलनि:सारण वाहिन्यांचे काम शंभर टक्के झाल्याचे सांगून पुन्हा जनतेची फसवणूक केली आहे. लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा सुरू- जुईनगरमधील नगरसेवक रंगनाथ औटी यांनी याविषयी वारंवार आवाज उठविला आहे. सेक्टर २ मधील मलनि:सारण केंद्रामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. - नागरिकांमध्ये असंतोष वाढत असून हे काम कधी पूर्ण होणार, असा प्रश्न सर्वसाधारण सभेत उपस्थित केल्यानंतर प्रशासनाने मँग्रोजमुळे काम रखडल्याचे स्पष्ट केले आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष नेरूळ पश्चिमेकडील सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी सानपाडा सेक्टर २० मधील केंद्राला जोडण्यामध्ये मँग्रोजचा अडथळा होत आहे. एमसीझेडएमएने उच्च न्यायालयाची परवानगी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. परंतु यानंतरही जानेवारीपर्यंत महापालिकेने प्रत्यक्षात उच्च न्यायालयात धाव घेतली नव्हती. नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नावर उच्च न्यायालयात चेंबर समन्स दाखल.केंद्राचा तपशीलविभागकेंद्र (एमएलडी)सीबीडी १९नेरूळ से. ५०१००सानपाडा३७.५वाशी १००कोपरखैरणे८७.५ऐरोली८०नेरूळ से. २१७