शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

पालिकेकडून नागरिकांची दिशाभूल

By admin | Updated: March 28, 2016 02:35 IST

महापालिका क्षेत्रातील १०० टक्के सांडपाण्यावर सीटेक तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक मलनि:सारण केंद्रात प्रक्रिया केली जात असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. परंतु वास्तवामध्ये

- नामदेव मोरे,  नवी मुंबईमहापालिका क्षेत्रातील १०० टक्के सांडपाण्यावर सीटेक तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक मलनि:सारण केंद्रात प्रक्रिया केली जात असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. परंतु वास्तवामध्ये जुईनगर ते नेरूळ पश्चिमेकडील मलनि:सारण वाहिन्या अत्याधुनिक केंद्रांना जोडण्याचे काम रखडले आहे. जुईनगरमधील जुन्या केंद्रातून हे पाणी खाडीत सोडले जात आहे. येथील दुर्गंधीमुळे परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. केंद्र शासनाने सर्व शहरांमधील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याच्या सूचना संबंधित महापालिका व नगरपालिकांना दिल्या आहेत. जेएनएनयूआरएम अंतर्गत महापालिकांना यासाठी अनुदानही दिले होते. नवी मुंबई महापालिकेने या योजनेअंतर्गत शहरामध्ये सीटेक तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन केंद्रे उभारली आहेत. शहरामध्ये ३६१ किलोमीटर लांबीच्या नवीन मलनि:सारण वाहिन्या टाकल्या आहेत. पालिकेला या कामगिरीसाठी केंद्र शासनाचा पुरस्कारही मिळाला आहे. १०० टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी पहिली महापालिका असा उल्लेख प्रशासन नेहमीच करते. पालिकेचा पर्यावरणविषयक अहवाल, संकेतस्थळ यावरही याविषयी माहिती देण्यात आली आहे. परंतु वास्तवामध्ये शहरामध्ये शंभर टक्के मलनि:सारण वाहिन्या जोडण्याचे काम पूर्ण झालेले नाही. नेरूळ पश्चिमेकडील सांडपाणी मलनि:सारण वाहिन्यांच्या द्वारे सानपाडा सेक्टर २० मधील केंद्रामध्ये सोडण्यात येणार होते. परंतु हा परिसर मँग्रोजच्या बफर झोनमध्ये येत आहे. यामुळे राज्य शासनाच्या एमसीझेडएमए प्राधिकरणाची परवानगी घेणे आवश्यक आहे. परंतु संबंधित विभागाने २००६ मधील जनहित याचिकेचा हवाला देवून उच्च न्यायालयाची परवानगी घेण्यास सांगितली आहे. परंतु महापालिकेने याविषयी अद्याप योग्य पाठपुरावा केलेला नाही. नेरूळ पश्चिम व जुईनगरमधील सांडपाणी सेक्टर २ मधील जुन्या मलप्रक्रिया केंद्रात सोडले जात आहे. येथे जुन्या व कालबाह्य झालेल्या यंत्रणेच्या मार्फत या सांडपाण्यावर काही प्रमाणात प्रक्रिया केली जात आहे. उर्वरित पाणी तसेच खाडीमध्ये सोडून दिले जात आहे. जुईनगरमध्ये मध्यवर्ती ठिकाणी हे केंद्र आहे. त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी निर्माण होत आहे. या परिसरातील नागरिकांनी सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी सानपाडा केंद्राला जोडण्याचे काम लवकरात लवकर करण्याची मागणी केली आहे. जुना प्रकल्प बंद करून त्या जागेचा परिसरातील नागरिकांना इतर सुविधा देण्यासाठी वापर करण्याची मागणी केली आहे. स्थानिक नगरसेवक रंगनाथ औटी यांनीही याविषयी वारंवार पाठपुरावा केला आहे. वास्तविक नेरूळसारख्या महत्त्वाच्या विभागातील मलनि:सारण वाहिन्या जोडण्याचे काम अपूर्ण असल्याची माहिती पालिकेने आतापर्यंत लोकप्रतिनिधी व नागरिकांकडून लपवून ठेवली होती. सार्वजनिक अभियांत्रिकी विभागाने यापूर्वी अत्याधुनिक मलनि:सारण केंद्रातील पाणी विकून पालिकेला करोडो रूपये मिळतील असे स्वप्न दाखविले होते. परंतु प्रत्यक्षात रोज १८० एमएलडी पाणी खाडीत सोडले जात आहे. याच पद्धतीने मलनि:सारण वाहिन्यांचे काम शंभर टक्के झाल्याचे सांगून पुन्हा जनतेची फसवणूक केली आहे. लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा सुरू- जुईनगरमधील नगरसेवक रंगनाथ औटी यांनी याविषयी वारंवार आवाज उठविला आहे. सेक्टर २ मधील मलनि:सारण केंद्रामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. - नागरिकांमध्ये असंतोष वाढत असून हे काम कधी पूर्ण होणार, असा प्रश्न सर्वसाधारण सभेत उपस्थित केल्यानंतर प्रशासनाने मँग्रोजमुळे काम रखडल्याचे स्पष्ट केले आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष नेरूळ पश्चिमेकडील सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी सानपाडा सेक्टर २० मधील केंद्राला जोडण्यामध्ये मँग्रोजचा अडथळा होत आहे. एमसीझेडएमएने उच्च न्यायालयाची परवानगी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. परंतु यानंतरही जानेवारीपर्यंत महापालिकेने प्रत्यक्षात उच्च न्यायालयात धाव घेतली नव्हती. नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नावर उच्च न्यायालयात चेंबर समन्स दाखल.केंद्राचा तपशीलविभागकेंद्र (एमएलडी)सीबीडी १९नेरूळ से. ५०१००सानपाडा३७.५वाशी १००कोपरखैरणे८७.५ऐरोली८०नेरूळ से. २१७