शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

पालिकेकडून नागरिकांची दिशाभूल

By admin | Updated: March 28, 2016 02:35 IST

महापालिका क्षेत्रातील १०० टक्के सांडपाण्यावर सीटेक तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक मलनि:सारण केंद्रात प्रक्रिया केली जात असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. परंतु वास्तवामध्ये

- नामदेव मोरे,  नवी मुंबईमहापालिका क्षेत्रातील १०० टक्के सांडपाण्यावर सीटेक तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक मलनि:सारण केंद्रात प्रक्रिया केली जात असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. परंतु वास्तवामध्ये जुईनगर ते नेरूळ पश्चिमेकडील मलनि:सारण वाहिन्या अत्याधुनिक केंद्रांना जोडण्याचे काम रखडले आहे. जुईनगरमधील जुन्या केंद्रातून हे पाणी खाडीत सोडले जात आहे. येथील दुर्गंधीमुळे परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. केंद्र शासनाने सर्व शहरांमधील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याच्या सूचना संबंधित महापालिका व नगरपालिकांना दिल्या आहेत. जेएनएनयूआरएम अंतर्गत महापालिकांना यासाठी अनुदानही दिले होते. नवी मुंबई महापालिकेने या योजनेअंतर्गत शहरामध्ये सीटेक तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन केंद्रे उभारली आहेत. शहरामध्ये ३६१ किलोमीटर लांबीच्या नवीन मलनि:सारण वाहिन्या टाकल्या आहेत. पालिकेला या कामगिरीसाठी केंद्र शासनाचा पुरस्कारही मिळाला आहे. १०० टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी पहिली महापालिका असा उल्लेख प्रशासन नेहमीच करते. पालिकेचा पर्यावरणविषयक अहवाल, संकेतस्थळ यावरही याविषयी माहिती देण्यात आली आहे. परंतु वास्तवामध्ये शहरामध्ये शंभर टक्के मलनि:सारण वाहिन्या जोडण्याचे काम पूर्ण झालेले नाही. नेरूळ पश्चिमेकडील सांडपाणी मलनि:सारण वाहिन्यांच्या द्वारे सानपाडा सेक्टर २० मधील केंद्रामध्ये सोडण्यात येणार होते. परंतु हा परिसर मँग्रोजच्या बफर झोनमध्ये येत आहे. यामुळे राज्य शासनाच्या एमसीझेडएमए प्राधिकरणाची परवानगी घेणे आवश्यक आहे. परंतु संबंधित विभागाने २००६ मधील जनहित याचिकेचा हवाला देवून उच्च न्यायालयाची परवानगी घेण्यास सांगितली आहे. परंतु महापालिकेने याविषयी अद्याप योग्य पाठपुरावा केलेला नाही. नेरूळ पश्चिम व जुईनगरमधील सांडपाणी सेक्टर २ मधील जुन्या मलप्रक्रिया केंद्रात सोडले जात आहे. येथे जुन्या व कालबाह्य झालेल्या यंत्रणेच्या मार्फत या सांडपाण्यावर काही प्रमाणात प्रक्रिया केली जात आहे. उर्वरित पाणी तसेच खाडीमध्ये सोडून दिले जात आहे. जुईनगरमध्ये मध्यवर्ती ठिकाणी हे केंद्र आहे. त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी निर्माण होत आहे. या परिसरातील नागरिकांनी सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी सानपाडा केंद्राला जोडण्याचे काम लवकरात लवकर करण्याची मागणी केली आहे. जुना प्रकल्प बंद करून त्या जागेचा परिसरातील नागरिकांना इतर सुविधा देण्यासाठी वापर करण्याची मागणी केली आहे. स्थानिक नगरसेवक रंगनाथ औटी यांनीही याविषयी वारंवार पाठपुरावा केला आहे. वास्तविक नेरूळसारख्या महत्त्वाच्या विभागातील मलनि:सारण वाहिन्या जोडण्याचे काम अपूर्ण असल्याची माहिती पालिकेने आतापर्यंत लोकप्रतिनिधी व नागरिकांकडून लपवून ठेवली होती. सार्वजनिक अभियांत्रिकी विभागाने यापूर्वी अत्याधुनिक मलनि:सारण केंद्रातील पाणी विकून पालिकेला करोडो रूपये मिळतील असे स्वप्न दाखविले होते. परंतु प्रत्यक्षात रोज १८० एमएलडी पाणी खाडीत सोडले जात आहे. याच पद्धतीने मलनि:सारण वाहिन्यांचे काम शंभर टक्के झाल्याचे सांगून पुन्हा जनतेची फसवणूक केली आहे. लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा सुरू- जुईनगरमधील नगरसेवक रंगनाथ औटी यांनी याविषयी वारंवार आवाज उठविला आहे. सेक्टर २ मधील मलनि:सारण केंद्रामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. - नागरिकांमध्ये असंतोष वाढत असून हे काम कधी पूर्ण होणार, असा प्रश्न सर्वसाधारण सभेत उपस्थित केल्यानंतर प्रशासनाने मँग्रोजमुळे काम रखडल्याचे स्पष्ट केले आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष नेरूळ पश्चिमेकडील सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी सानपाडा सेक्टर २० मधील केंद्राला जोडण्यामध्ये मँग्रोजचा अडथळा होत आहे. एमसीझेडएमएने उच्च न्यायालयाची परवानगी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. परंतु यानंतरही जानेवारीपर्यंत महापालिकेने प्रत्यक्षात उच्च न्यायालयात धाव घेतली नव्हती. नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नावर उच्च न्यायालयात चेंबर समन्स दाखल.केंद्राचा तपशीलविभागकेंद्र (एमएलडी)सीबीडी १९नेरूळ से. ५०१००सानपाडा३७.५वाशी १००कोपरखैरणे८७.५ऐरोली८०नेरूळ से. २१७