शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
5
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
6
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
7
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
8
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
9
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
10
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
11
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
12
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
13
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
14
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
15
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
16
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
17
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
18
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
19
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
20
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...

म्हसळा आयटीआयच्या इमारतीची दुरवस्था

By admin | Updated: August 12, 2016 02:28 IST

तालुक्यातील विद्यार्थ्यांना अद्ययावत व्यावसायिक शिक्षण मिळावे या हेतूने तालुक्यातील आगरवाडा येथे सुमारे ३ कोटी ५० लाख रुपये खर्च करून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची

अमोल जंगम,  म्हसळातालुक्यातील विद्यार्थ्यांना अद्ययावत व्यावसायिक शिक्षण मिळावे या हेतूने तालुक्यातील आगरवाडा येथे सुमारे ३ कोटी ५० लाख रुपये खर्च करून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची (आयटीआय) दुमजली इमारत बांधण्यात आली. अवघ्या अडीच तीन वर्षांत या इमारतीचे बांधकाम ढासळू लागल्याने हे काम पूर्णपणे नित्कृष्ट दर्जाचे असल्याचे आता निदर्शनास येत आहे. इमारतीचे पत्रे व स्लॅब गळत असल्याने संपूर्ण इमारतीमधील भिंतींवर मोठ्या प्रमाणावर पाणी पाझरत असल्याने शेवाळ आले आहे. आयटीआयमध्ये इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक, मेकॅनिकल अशा कोर्सेसमध्ये विद्युत उपकरणे हाताळावी लागत असल्याने पावसाळ्यात शॉक लागत असल्याने विद्यार्थी व शिक्षकांचा जीव धोक्यात आला आहे. म्हसळा तालुक्यातील आगरवाडा येथे आयटीआयची इमारत बांधण्यासाठी राज्य सरकारने ३ कोटी ५० लाख रुपये मंजूर केले. या इमारतीचे १० फेब्रुवारी २०१३ रोजी तत्कालीन पालकमंत्री आ. सुनील तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे के ले आहे. अनेक ठिकाणी इमारत गळत असल्याने शेवाळ आले आहे. ठिकठिकाणी प्लास्टर, बांधकाम कोसळत आहे. खिडक्या व दरवाजे यांचे बांधकाम कमकुवत असल्याने कधी कोसळतील यांचा भरवसा नाही. स्लॅब, भिंतींना लागलेल्या गळतीमुळे वर्कशॉपमध्ये पाणी साचत असल्याने शिक्षक व विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन विद्युत उपकरणे हाताळावी लागत आहेत. अनेक ठिकाणी शॉक लागत आहे. गेल्यावर्षी वर्कशॉपच्या शेडचे ट्रान्सपरंट पत्रे व अन्य पत्रे फुटले होते. त्यांची दुरु स्ती करताना नवीन पत्रे नीट न लावता शेडवर ठेवून त्यावरती खडी व माती भरलेल्या पिशव्या ठेवल्या आहेत. या सर्व बाबतीत आयटीआय प्रशासनाने बांधकाम खात्याकडे किमान १२ ते १५ वेळा पत्रव्यवहार केला असून एकदाही बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली नसल्याची माहिती आयटीआयच्या कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.