शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

म्हसळा आयटीआयच्या इमारतीची दुरवस्था

By admin | Updated: August 12, 2016 02:28 IST

तालुक्यातील विद्यार्थ्यांना अद्ययावत व्यावसायिक शिक्षण मिळावे या हेतूने तालुक्यातील आगरवाडा येथे सुमारे ३ कोटी ५० लाख रुपये खर्च करून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची

अमोल जंगम,  म्हसळातालुक्यातील विद्यार्थ्यांना अद्ययावत व्यावसायिक शिक्षण मिळावे या हेतूने तालुक्यातील आगरवाडा येथे सुमारे ३ कोटी ५० लाख रुपये खर्च करून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची (आयटीआय) दुमजली इमारत बांधण्यात आली. अवघ्या अडीच तीन वर्षांत या इमारतीचे बांधकाम ढासळू लागल्याने हे काम पूर्णपणे नित्कृष्ट दर्जाचे असल्याचे आता निदर्शनास येत आहे. इमारतीचे पत्रे व स्लॅब गळत असल्याने संपूर्ण इमारतीमधील भिंतींवर मोठ्या प्रमाणावर पाणी पाझरत असल्याने शेवाळ आले आहे. आयटीआयमध्ये इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक, मेकॅनिकल अशा कोर्सेसमध्ये विद्युत उपकरणे हाताळावी लागत असल्याने पावसाळ्यात शॉक लागत असल्याने विद्यार्थी व शिक्षकांचा जीव धोक्यात आला आहे. म्हसळा तालुक्यातील आगरवाडा येथे आयटीआयची इमारत बांधण्यासाठी राज्य सरकारने ३ कोटी ५० लाख रुपये मंजूर केले. या इमारतीचे १० फेब्रुवारी २०१३ रोजी तत्कालीन पालकमंत्री आ. सुनील तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे के ले आहे. अनेक ठिकाणी इमारत गळत असल्याने शेवाळ आले आहे. ठिकठिकाणी प्लास्टर, बांधकाम कोसळत आहे. खिडक्या व दरवाजे यांचे बांधकाम कमकुवत असल्याने कधी कोसळतील यांचा भरवसा नाही. स्लॅब, भिंतींना लागलेल्या गळतीमुळे वर्कशॉपमध्ये पाणी साचत असल्याने शिक्षक व विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन विद्युत उपकरणे हाताळावी लागत आहेत. अनेक ठिकाणी शॉक लागत आहे. गेल्यावर्षी वर्कशॉपच्या शेडचे ट्रान्सपरंट पत्रे व अन्य पत्रे फुटले होते. त्यांची दुरु स्ती करताना नवीन पत्रे नीट न लावता शेडवर ठेवून त्यावरती खडी व माती भरलेल्या पिशव्या ठेवल्या आहेत. या सर्व बाबतीत आयटीआय प्रशासनाने बांधकाम खात्याकडे किमान १२ ते १५ वेळा पत्रव्यवहार केला असून एकदाही बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली नसल्याची माहिती आयटीआयच्या कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.