शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

मुजोर रिक्षाचालकांकडून प्रवासी वेठीस

By admin | Updated: November 2, 2015 01:52 IST

वाशी रेल्वे स्थानक ते कोपरखैरणे मार्गावर प्रवास करणाऱ्यांवर रिक्षाचालकांनी भाडेवाढ लादली आहे. अचानक झालेल्या भाडेवाढीमुळे प्रवाशांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे

नवी मुंबई : वाशी रेल्वे स्थानक ते कोपरखैरणे मार्गावर प्रवास करणाऱ्यांवर रिक्षाचालकांनी भाडेवाढ लादली आहे. अचानक झालेल्या भाडेवाढीमुळे प्रवाशांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. वाहतूक पोलिसांनी बेकायदा चौथी सीट बंद केल्याचे निमित्त साधत रिक्षा संघटनेने प्रवाशांना वेठीस धरले आहे.वाशी रेल्वे स्थानक ते कोपरखैरणे मार्गावर धावणाऱ्या रिक्षांच्या भाडेदरात शुक्रवारपासून वाढ झाली आहे. रिक्षाचालक-मालक एकता युनियनने झालेल्या या दरवाढीचा फलक स्थानकाबाहेरील रिक्षा स्टँडवर लावलेला आहे. परंतु अचानक झालेल्या या भाडेवाढीमुळे प्रवाशांचे रिक्षाचालकांसोबत वाद होऊ लागले आहेत. यापुर्वी वाशी स्थानक ते एमजीएमपर्यंत १०, तर कोपरखैरणेपर्यंत २० रुपये घेतले जायचे. मुळात सन २०१४ च्या आरटीओच्या दरपत्रकानुसार हे दर कमीच होते. मात्र आरटीओने वाशी-कोपरखैरणे मार्गावर शेअर रिक्षासाठी २८ रुपये दराची मान्यता दिलेली असतानाही रिक्षाचालक स्वत:च्या सोयीनुसार २० रुपये भाडे आकारत होते. तर दर कमी केल्याच्या बदल्यात रिक्षात बेकायदा चौथा प्रवासी घेतला जायचा. यामुळे वाशी-कोपरखैरणे मार्गावर सर्रास चौथा प्रवासी घेऊनच रिक्षा चालवल्या जात होत्या. मात्र त्याकडे अनेक दिवस डोळेझाक केल्यानंतर वाहतूक पोलिसांनी चौथा प्रवासी घेणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाईला सुरुवात केली आहे. ही कारवाई टाळत होणारा तोटा भरून काढण्यासाठी रिक्षाचालक संघटनेने प्रवास भाड्यात पाच रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सुधारित दरानुसार वाशी स्थानक ते एमजीएमपर्यंत १५, तर कोपरखैरणे पर्यंत २५ रुपये भाडे आकारायला सुरुवात केली आहे. हे दर आरटीओची मान्यता असलेल्या २८ रुपयांपेक्षा कमीच असल्याने त्यात काही गैर नसल्याचे रिक्षाचालकांचे म्हणणे आहे. मात्र आरटीओने जेव्हा भाडेवाढ करायला मान्यता दिलेली तेव्हाच ती लागू न करता त्यात सोयीनुसार बदलाचे अधिकार रिक्षा संघटनांना दिले कोणी, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित होत आहे. तसेच रिक्षात चौथा प्रवासी घेणे बेकायदेशीर असतानाही आरटीओ व वाहतूक पोलिसांनी रिक्षाचालकांचे लाड कशासाठी पुरवायचे, असाही यावरून वाशी रेल्वे स्थानकालगतच्या रिक्षा स्टँडवर रिक्षाचालक व प्रवासी यांच्यात वाद होऊ लागले आहेत. त्यामध्ये रिक्षाचालकांची अरेरावीची भाषा सहन करावी लागत आहे.