शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
6
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
7
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
8
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
9
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
10
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
11
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
12
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
13
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
15
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
16
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
17
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
18
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
19
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
20
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!

एमआयडीसीतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 01:43 IST

आगीच्या घटना वाढल्या; तळोजातील कंपन्यांकडून अग्निशमन नियमांचे उल्लंघन

- वैभव गायकरपनवेल : तळोजा औद्योगिक वसाहतीमधील सुरक्षेचा प्रश्न अतिशय गंभीर बनत चालला आहे. आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. उद्योजकांकडून अग्निशमन नियमांना हरताळ फासला जात असून अशीच स्थिती राहिली तर भविष्यात भोपाळ सारखी गंभीर घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.भीषण आगीच्या घटनांनी हा परिसर हादरून जात आहे. काही महिन्यांपूर्वी रामके वेस्ट मॅनेजमेंट कंपनीमधील स्फोट, मेसका कंपनीमधील आगीची घटना या अतिशय गंभीर आहेत. मुंबई वेस्ट मॅनेजमेंटमधील स्फोटाची तीव्रता अतिशय गंभीर होती. पनवेलसह कल्याण तालुक्यातील एकूण २५ गावांना याचा हादरा बसला होता. कॉग्निझंट या रासायनिक कंपनीत लागलेल्या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घटनेची गंभीरता लक्षात घेता, पुन्हा एकदा कंपनीचा हलगर्जीपणा येथील रहिवाशांच्या जीवावर बेतता बेतता राहिले. तळोजा एमआयडीसीमध्ये एकूण ३५० रासायनिक कारखाने आहेत. भविष्यात भोपाळसारखी घटना तळोजामध्ये घडण्याची शक्यता आहे. सध्याच्या घडीला मोठ्या प्रमाणात कंपन्यांचा हलगर्जीपणा समोर आला आहे. कॉग्निझंट सारखी अतिशय ज्वालाग्राही रसायनाच्या कंपनीतही कोणतीही सुरक्षेची यंत्रणा राबविली जात नसेल तर येथील रहिवाशांची सुरक्षा खरोखरच राम भरोसे आहे. तळोजा एमआयडीसीलगत १५ गावांचा समावेश आहे. येथील प्रदूषणामुळे येथील ग्रामस्थांचे जीवन असह्य झाले आहे. प्रदूषणामुळे येथील पाण्याच्या स्रोतामधूनही दुर्गंधीयुक्त आणि रासायनिक मिश्रित पाणी येत आहे. तळोजा एमआयडीसीमधील वाढते प्रदूषण लक्षात घेता शेकाप नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी राष्ट्रीय हरित लवादामध्ये धाव घेतली आहे.प्रदूषण आणि दुसरीकडे सुरक्षा अशा द्विधा मनस्थितीत येथील रहिवासी जीवन व्यथित करीत असताना अशाप्रकारे घटनांवर लगाम घालण्यासाठी कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. रामके कंपनीत झालेल्या स्फोटात शेकडो ग्रामस्थांच्या घरांना तडे गेले होते. अनेक घरांचे मोठे नुकसान झाले. मात्र, या ग्रामस्थांना कोणतीच भरपाई देण्यात आली नाही. एवढी मोठी घटना घडूनदेखील अशाप्रकारे आगीचे प्रकार थांबले नाहीत. याकरिता एमआयडीसी व औद्योगिक सुरक्षा विभागाने स्वतंत्र मोहीम राबवून एमआयडीसीमधील सर्वच कंपन्यांच्या सुरक्षेचे सर्वेक्षण करण्याची गरज आहे.कंपनीमधील सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही वेळोवेळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करत असतो. कॉग्निझंट कंपनीच्या आगीची चौकशी सुरू आहे. यानंतर संबंधितावर खटला भरण्यात येईल. भविष्यात एमआयडीसीमध्ये आगीच्या घटना घडणार नाहीत या दृष्टीने प्रत्येक कंपनीला सक्त ताकीद देणार आहोत. दोषी कारखान्यांवर कठोर कारवाई केली जाईल.- एम. आर. पाटील, संचालक, औ. सुरक्षा, तळोजा एमआयडीसीरामिक कंपनीतील स्फोटाने खऱ्या अर्थाने येथील सुरक्षेचे धिंडवडे निघाले होते. यांनतर दोन कंपन्यांमध्ये आगीच्या घटना घडल्या तरीदेखील प्रशासनाचे डोळे उघडत नसतील तर तळोजामध्ये पुन्हा एकदा भोपाळ सारखी घटना घडण्यास वेळ लागणार नाही.- हरेश केणी, नगरसेवक, पनवेल महानगरपालिकातळोजा एमआयडीसी विविध घटनाक्रम२८ आॅक्टोबर २००६ : डार्फ कंपनीत भीषण आग१८ जानेवारी २०११ : इंडियन आॅइल कंपनीत आग३ फेब्रुवारी २०११ : ब्रुनेशा कंपनीत आग८ एप्रिल २०१३ : चेसमिक कंपनीत आग२१ मार्च २०१६ : टिकिटार कंपनीत भीषण आग (चार कामगार मृत्युमुखी)३० नोव्हेंबर २०१६ : निडिलक्स कंपनीत आग (दोन कामगारांचा मृत्यू)१९ डिसेंबर २०१६ : मेंबा केम कंपनीत आग२८ आॅक्टोबर २०१८ : रामिक कंपनीत विस्फोट (एक जखमी) (२५ गावांना हादरा)१७ डिसेंबर २०१८: मेसफार कंपनीत आग१३ जून २०१९ : कॉग्निझंट कंपनीत आग

टॅग्स :MIDCएमआयडीसी