शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
5
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
6
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
7
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
8
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
9
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
10
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
11
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
12
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
13
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
14
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
15
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
16
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
17
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
18
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
19
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
20
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

म्हसळा, अलिबागमध्ये वाहतूककोंडी

By admin | Updated: January 30, 2017 02:14 IST

श्री क्षेत्र हरिहरेश्वर व सुवर्ण गणेश मंदिर आणि पर्यटकांसाठी म्हसळा हा दुवा आहे. म्हसळा शहराची लोकसंख्या दहा हजारांपेक्षा जास्त असल्यामुळे रोजच होणाऱ्या वाहतूक कोंडीचा त्रास

म्हसळा : श्री क्षेत्र हरिहरेश्वर व सुवर्ण गणेश मंदिर आणि पर्यटकांसाठी म्हसळा हा दुवा आहे. म्हसळा शहराची लोकसंख्या दहा हजारांपेक्षा जास्त असल्यामुळे रोजच होणाऱ्या वाहतूक कोंडीचा त्रास स्थानिक नागरिकांना होत आहे. त्याचप्रमाणे शहरात मोठी शाळा, कॉलेज असल्यामुळे शालेय विद्यार्थीही या समस्येत भरडले जातात. वारंवार होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे नागरिक संतप्त झाले असून योग्य उपाययोजनेची मागणी होत आहे.म्हसळ्यापासून अवघ्या २०-२२ किमी अंतरावर आशिया खंडातील सर्वात मोठे दिघीपोर्ट आहे. या पोर्टसाठी लागणारी अवजड यंत्रसामग्री म्हसळ्यातूनच पुढे पोर्टकडे जाते व पोर्टमधून आलेला माल म्हसळ्यातूनच मुंबई-पुण्याकडे जातो. या मार्गावरून सातत्याने सहा चाकापासून अगदी वीस चाकापर्यंतची वाहने ४० ते ४५ टनापर्यंत माल वाहतूक करतात. म्हसळ्याची बाजारपेठ मोठी असून ती अरु ंद आहे. पुरेसे वाहतूक पोलीस नसल्याने हातगाडी, रिक्षा, मिनीडोर, मोटारसायकल यावर पोलिसांचे नियंत्रण नाही. यामुळे बाजारपेठेत रिक्षा, मिनीडोर यांचे जिथे प्रवासी हात दाखवेल तिथे स्टॉप अशी परिस्थिती निर्माण झाली असून त्यामुळेही दिवसातून अनेक वेळा वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. दिवेआगर, हरिहरेश्वर, मुरु ड, श्रीवर्धन ही पर्यटन स्थळे झाल्यामुळे दिवसेंदिवस वाहनांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामध्ये एस.टी.च्याही सुमारे दोनशे फेऱ्या दररोज होतात. बायपासचा विशेष उपयोग होत नाही, बायपास जर तोंडसुरेपासून पुढे जानसई निदवरु न पुढे सुरई आणि पुढे मुख्य रस्त्याला जोडला गेला असता तर ही समस्या भविष्यात उद्भवली नसती असे जाणकारांचे स्पष्ट मत आहे. या बायपासचा सर्व्हेही करण्यात आला होता, परंतु काही धनदांडग्यांच्या जमिनी जात होत्या म्हणून या बायपासकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे काही जुने नागरिक सांगतात.या वाहतूक कोंडीबाबत काही दिवसात उपाय केले जातील, असे आश्वासन म्हसळा पोलीस ठाण्याकडून दिले गेले होते, परंतु आजही परिस्थिती जैसे थे असल्याचे दिसून येत आहे. २६ जानेवारीपासून मधला एक शुक्र वार वगळता चौथा शनिवार व नंतर रविवार असल्यामुळे शुक्र वारची एक दिवसाची सुटी टाकून हजारो पर्यटक श्रीवर्धन-हरेश्वर-दिवेआगरला आल्यामुळे सर्वत्र हाऊसफुल्लचे बोर्ड लागलेले दिसत होते. म्हसळा हा एकमेव पर्यायी मार्ग असल्यामुळे म्हसळेकरांना सातत्याने ट्रॅफिकला सामोरे जावे लागते. अपुऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांमुळे वाहतूक नियंत्रण करणे ही कसरत पोलिसांना करावी लागते. (वार्ताहर)अलिबागमध्ये वाहतुकीला शिस्तीची गरज1 अलिबाग : तालुक्यात वाढते शहरीकरण, पर्यटकांच्या संख्येत होणारी वाढ, बेशिस्त पार्किंग, हातगाडीवाल्यांनी गिळलेले रस्ते यामुळे अलिबाग शहरामध्ये वाहतूक कोंडीची समस्या उग्र रुप धारण करीत आहे. यावर तातडीने उपाययोजना करुन शहराला वाहतुकीची शिस्त लावण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्ह्याचे मुख्यालय येथेच असल्याने विविध सरकारी, खासगी संस्थांची कार्यालये, बँका, पतसंस्था, शाळा, महाविद्यालये येथे मोठ्या संख्येने आहेत. 2अलिबाग येथे पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. विशेष करुन वीकेएण्डला. अलिबागमधील प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण झालेले असले तरी तेथील रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची पार्किंग असते. त्याचप्रमाणे अलिबाग एसटी स्टॅण्ड, स्टेट बँक आॅफ इंडिया, जुने भाजी मार्केट, जामा मशिद रस्ता, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शिवाजी पुतळा, मारुती नाका या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी नित्याची झालेली आहे. 3अलिबाग शहरामध्ये काही ठिकाणी एक दिशा मार्ग केले आहेत. परंतु त्या नियमांचे पालन केले जात नाही. त्याचप्रमाणे वाहतूक पोलिसांसह अलिबाग नगरपरिषद हा विषय गांभीर्याने घेत नसल्याची तक्रार पत्रकारांनी रायगड जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक यांच्याकडे काहीच दिवसांपूर्वी केली होती. वाहतूक समस्येवर लवकरच तोडगा काढला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले होते.