शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
2
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान संतापला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
3
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
4
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
5
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
6
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
7
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
8
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
9
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
10
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
11
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
12
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
13
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना
14
महिलांना आता ‘आदिशक्ती’चे बळ; चोंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
15
साडेपाच हजार कोटी खर्चून राज्यात मंदिरांचा जीर्णोद्धार; मंत्रिमंडळाचा निर्णय : ६८१ कोटी अहिल्यादेवी स्मृतिस्थळासाठी 
16
आधीच्या ओबीसी आरक्षणानुसार ४ महिन्यांत निवडणुका घ्या; मिनी विधानसभेचा मार्ग मोकळा
17
पदवीसाठी २७ मे रोजी पहिली गुणवत्ता यादी ; उद्यापासून प्रवेश
18
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
19
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
20
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन

ऑनलाइन आरटीई प्रवेश यंत्रणेचा गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 00:11 IST

आरटीई ऑनलाइन प्रवेशाची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली असून, प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी पालकांना यंत्रणेतील गोंधळामुळे होणाऱ्या त्रासाला सामोरे जावे लागले.

- सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : आरटीई ऑनलाइन प्रवेशाची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली असून, प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी पालकांना यंत्रणेतील गोंधळामुळे होणाऱ्या त्रासाला सामोरे जावे लागले. संकेतस्थळावर जिल्ह्यांच्या यादीतून नाशिक वगळता इतर जिल्हे गायब असल्याने पाल्याच्या नावाची नोंदणीच होऊ शकलेली नाही. तर संकेतस्थळावर मराठीतून मदतकेंद्राची नावाची पाटी कोरीच असल्याने यंत्रणेतील सावळागोंधळ उघड झाला.बालकांना शिक्षणाचा हक्क अधिनियमानुसार शासनातर्फे आरटीई २५ टक्के प्रवेशाची प्रक्रिया राबवली जाते. वंचित गटांतर्गत तसेच दुर्बल घटकातील बालकांना शिक्षण घेता यावे, याकरिता आॅनलाइन नोंदणीद्वारे त्याना मोफत प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मात्र, या संधीचा लाभ घेताना पालकांना सर्वाधिक मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे समोर येत आहे. आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी जाहीर करण्यात आलेली दोन्ही संकेतस्थळ पालकांना गोंधळात टाकत आहेत. सन २०१९-२० च्या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशाची आॅनलाइन नोंदणी प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली असून, ती २२ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. मात्र, या प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी यंत्रणेतील गोंधळ उघड झाला आहे. प्रथमच नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नावाची नोंदणी करण्यासाठी वास्तव्याच्या जिल्ह्याची नोंद आवश्यक आहे. मात्र, संकेतस्थळावर केवळ नाशिक जिल्हाच उपलब्ध असून, उर्वरित ३५ जिल्हे अद्याप नोंदीवर आलेले नाहीत. यामुळे पहिल्याच दिवशी पाल्याची नोंदणी करण्याचा प्रयत्न असलेल्या पालकांच्या पदरी निराशाच आली.नवी मुंबईत वास्तव्याला असलेल्या काही पालकांनी या घोळामुळे मदतकेंद्राची यादी तपासली असता, त्यामध्ये काही अधिकाऱ्यांचे नंबर चुकीचे असल्याचेही आढळून आले, तर गेल्या अनेक वर्षांपासून संकेतस्थळावर चुकीचे नंबर छापले जात असल्याने संबंधितांना त्रास सहन करावा लागत असल्याचेही उघड झाले. तर संकेतस्थळ मराठीतून उघडल्यास त्यात ठाणे जिल्ह्यातील मदतकेंद्राच्या अधिकाºयांच्या नावाची पाटी कोरीच असून, केवळ नंबर झळकत आहेत. त्यामुळे मदतीसाठी संपर्क करायचा तर कसा व कोणाला? असा प्रश्न पालकांना सतावत आहे. तर संपूर्ण राज्यासाठी असलेल्या हेल्पलाइनचा नंबरही चुकीचा असल्यानेही पालकांची गैरसोय होताना दिसत आहे.मंगळवारी सकाळपासून कोणत्याही अडथळ्याविना प्रवेश प्रक्रिया सुरू होणे पालकांना अपेक्षित असतानाही, दुपारी ४ नंतर संकेतस्थळावर प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. त्यातही नोंदणीपासून ते मदतीपर्यंत अनेक त्रुटी असल्याने आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेचा पहिलाच दिवस पालकांना गैरसोयीचा ठरला.