शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

कुटुंबनियोजनाची पुरुषांना भीती; चार वर्षांत केवळ ३३ शस्त्रक्रिया, महिलांच्या मात्र ८,४७६

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 00:46 IST

जनजागृतीची गरज : अनेक गैरसमज असल्याने पुरुषांमध्ये उदासीनतेमुळे संख्या कमी

- योगेश पिंगळेनवी मुंबई : नसबंदी केल्याने अशक्तपणा येतो तसेच पुरुषत्वावर परिणाम होतो अशा प्रकारचे विविध गैरसमज समाजात पसरलेले आहेत. गैरसमज आणि भीतीमुळे कुटुंबनियोजन शस्रक्रियेसाठी पुरुषांचे प्रमाण कमी असून, कुटुंब नियोजनाची जबाबदारी आजही महिलांवरच आहे. नवी मुंबई शहरात गेल्या चार वर्षात केवळ ३३ पुरुषांनी, तर ८४७६ महिलांनी कुटुंबनियोजनाची शस्रक्रिया केली आहे. त्यामुळे शस्रक्रियेबाबत केली जाणारी जनजागृती आणखी तीव्र व्हायला हवी, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या आहेत.कुटुंबनियोजनसाठी शासनामार्फत मोहीम राबविली जाते. नागरिकांना याबाबत माहिती व्हावी यासाठी जनजागृती केली जात असून, शासनातर्फे शस्रक्रिया करणाऱ्यांना अनुदान  देण्यात येते. शस्रक्रियेबद्दल अनेक गैरसमज असल्याने कुटुंबनियोजन शस्रक्रिया फक्त स्रियांनीच करावी, असा समज असून, नवी मुंबई शहरात पुरुष नसबंदीचे प्रमाण आजही नगण्यच आहे. नवी मुंबई शहरात २०१७-१८ या वर्षात दोन हजार ६९९ महिलांनी, तर १० पुरुषांनी शस्रक्रिया करून घेतली. २०१८-१९ या वर्षात दोन हजार ७५५ महिलांनी, तर १५ पुरुषांनी शस्रक्रिया करून घेतली. २०१९-२० या वर्षात दोन हजार ५४८ महिलांनी, तर केवळ सहा पुरुषांनी शस्रक्रिया करून घेतली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्च २०२० पासून लॉकडाऊन होता. त्यामुळे रुग्णालयातील इतर कामांवर त्याचा परिणाम झाला होता. २०२०-२१ या वर्षात डिसेंबर महिन्यापर्यंत ४७४ महिलांनी तर फक्त दोन पुरुषांनी कुटुंबनियोजनाची शस्रक्रिया केली.हे आहेत गैरसमजकुटुंबनियोजन शस्रक्रिया केल्यास कमजोरी येईल त्यामुळे काम करता येणार नाही, नपुंसकत्व येईल,  ही शस्रक्रिया करण्याची जबाबदारी महिलांचीच आहे. अशा विविध भीती आणि गैरसमजांमुळे पुरुष शस्रक्रिया करणे टाळत असून, शस्रक्रिया करण्यासाठी महिलांना भाग पाडले जाते.कुटुंबनियोजनाबाबत आजही विविध गैरसमज आहेत. त्यामुळे या शस्रक्रियेसाठी महिलांकडे पाहिजे जाते. आरोग्य विभागाच्या माध्यमातून करण्यात येणारी जनजागृती व्यापक व्हायला हवी. - सचिन गोळे, नागरिककुटुंबनियोजन शस्रक्रिया केल्यावर कमजोरी येते तसेच पुरुषत्व संपते यासारखे अनेक गैरसमज नागरिकांमध्ये आहेत. पुरुषांना याबाबत योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या शंकांचे निरसन व्हायला हवे. यासाठी जनजागृतीची मोहीम तीव्र होणे गरजेचे आहे.- किशोर पवार, नागरिककुटुंबनियोजन शस्रक्रिया करण्याबाबत नागरिकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. कुटुंबातील कमावती व्यक्ती पुरुष असल्याने त्यांची शस्रक्रिया केल्यास त्यांना त्रास होऊ शकतो, अशी काही महिलांचीच मानसिकता असल्याने या शस्रक्रियेसाठी महिलाच पुढाकार घेतात. कुटुंब नियोजनासाठी महापालिकेच्या माध्यमातून सातत्याने जनजागृती केली जाते गैरसमज दूर करून पुरुषांनीदेखील यासाठी पुढे आलं पाहिजे.- डॉ. धनवंती घाडगे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, न. मुं. म.पा.