शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

कुटुंबनियोजनाची पुरुषांना भीती; चार वर्षांत केवळ ३३ शस्त्रक्रिया, महिलांच्या मात्र ८,४७६

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 00:46 IST

जनजागृतीची गरज : अनेक गैरसमज असल्याने पुरुषांमध्ये उदासीनतेमुळे संख्या कमी

- योगेश पिंगळेनवी मुंबई : नसबंदी केल्याने अशक्तपणा येतो तसेच पुरुषत्वावर परिणाम होतो अशा प्रकारचे विविध गैरसमज समाजात पसरलेले आहेत. गैरसमज आणि भीतीमुळे कुटुंबनियोजन शस्रक्रियेसाठी पुरुषांचे प्रमाण कमी असून, कुटुंब नियोजनाची जबाबदारी आजही महिलांवरच आहे. नवी मुंबई शहरात गेल्या चार वर्षात केवळ ३३ पुरुषांनी, तर ८४७६ महिलांनी कुटुंबनियोजनाची शस्रक्रिया केली आहे. त्यामुळे शस्रक्रियेबाबत केली जाणारी जनजागृती आणखी तीव्र व्हायला हवी, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या आहेत.कुटुंबनियोजनसाठी शासनामार्फत मोहीम राबविली जाते. नागरिकांना याबाबत माहिती व्हावी यासाठी जनजागृती केली जात असून, शासनातर्फे शस्रक्रिया करणाऱ्यांना अनुदान  देण्यात येते. शस्रक्रियेबद्दल अनेक गैरसमज असल्याने कुटुंबनियोजन शस्रक्रिया फक्त स्रियांनीच करावी, असा समज असून, नवी मुंबई शहरात पुरुष नसबंदीचे प्रमाण आजही नगण्यच आहे. नवी मुंबई शहरात २०१७-१८ या वर्षात दोन हजार ६९९ महिलांनी, तर १० पुरुषांनी शस्रक्रिया करून घेतली. २०१८-१९ या वर्षात दोन हजार ७५५ महिलांनी, तर १५ पुरुषांनी शस्रक्रिया करून घेतली. २०१९-२० या वर्षात दोन हजार ५४८ महिलांनी, तर केवळ सहा पुरुषांनी शस्रक्रिया करून घेतली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्च २०२० पासून लॉकडाऊन होता. त्यामुळे रुग्णालयातील इतर कामांवर त्याचा परिणाम झाला होता. २०२०-२१ या वर्षात डिसेंबर महिन्यापर्यंत ४७४ महिलांनी तर फक्त दोन पुरुषांनी कुटुंबनियोजनाची शस्रक्रिया केली.हे आहेत गैरसमजकुटुंबनियोजन शस्रक्रिया केल्यास कमजोरी येईल त्यामुळे काम करता येणार नाही, नपुंसकत्व येईल,  ही शस्रक्रिया करण्याची जबाबदारी महिलांचीच आहे. अशा विविध भीती आणि गैरसमजांमुळे पुरुष शस्रक्रिया करणे टाळत असून, शस्रक्रिया करण्यासाठी महिलांना भाग पाडले जाते.कुटुंबनियोजनाबाबत आजही विविध गैरसमज आहेत. त्यामुळे या शस्रक्रियेसाठी महिलांकडे पाहिजे जाते. आरोग्य विभागाच्या माध्यमातून करण्यात येणारी जनजागृती व्यापक व्हायला हवी. - सचिन गोळे, नागरिककुटुंबनियोजन शस्रक्रिया केल्यावर कमजोरी येते तसेच पुरुषत्व संपते यासारखे अनेक गैरसमज नागरिकांमध्ये आहेत. पुरुषांना याबाबत योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या शंकांचे निरसन व्हायला हवे. यासाठी जनजागृतीची मोहीम तीव्र होणे गरजेचे आहे.- किशोर पवार, नागरिककुटुंबनियोजन शस्रक्रिया करण्याबाबत नागरिकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. कुटुंबातील कमावती व्यक्ती पुरुष असल्याने त्यांची शस्रक्रिया केल्यास त्यांना त्रास होऊ शकतो, अशी काही महिलांचीच मानसिकता असल्याने या शस्रक्रियेसाठी महिलाच पुढाकार घेतात. कुटुंब नियोजनासाठी महापालिकेच्या माध्यमातून सातत्याने जनजागृती केली जाते गैरसमज दूर करून पुरुषांनीदेखील यासाठी पुढे आलं पाहिजे.- डॉ. धनवंती घाडगे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, न. मुं. म.पा.