शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

नेरुळमध्ये साकारणार स्मृतिवन; महापालिकेचा प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 01:15 IST

आतापर्यंत ४०० पेक्षा जास्त वृक्षपे्रमी नागरिकांनी यासाठी नावनोंदणी केली आहे. एक हजार ५५ इतक्या वृक्षलागवडीपर्यंत ही योजना सुरू राहणार आहे.

नवी मुंबई : महापालिकेने नेरुळ सेक्टर २६ मध्ये २२ हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर स्मृतिवन विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांना त्यांच्या प्रियजनांच्या स्मृती जपता येणार असून, वृक्षांवर त्यांचे नामफलक लावले जाणार आहेत. या योजनेलाही चांगला प्रतिसाद मिळाला असून, आतापर्यंत ४०० पेक्षा जास्त नागरिकांनी नावनोंदणी केली आहे.

स्मृतिवन संकल्पनेत नागरिक एक हजार रुपये नाममात्र शुल्क भरून वृक्ष लागवडीद्वारे प्रियजनांच्या नावाने आठवणी जपू शकतात. संबंधित व्यक्ती व संस्थेचा नामफलक त्या वृक्षावर लावण्यात येणार आहे. वृक्षारोपणासाठी खड्डा खोदणे, त्याकरिता लागणारी लाल माती, शेणखत व नामफलक बसवून तीन वर्षांपर्यंत त्या वृक्षाची जोपासना केली जाणार आहे.

आतापर्यंत ४०० पेक्षा जास्त वृक्षपे्रमी नागरिकांनी यासाठी नावनोंदणी केली आहे. एक हजार ५५ इतक्या वृक्षलागवडीपर्यंत ही योजना सुरू राहणार आहे. महापालिका स्मृतिवनमध्ये बेल, कैलासपती, चिंच, कवठ, बकुळ, बहावा, पांगारा, लिंब, आकाश निंब, पारिजातक, चंदन, सीताअशोक, अर्जुन, समुद्रफळ अशा देशी वृक्षांची लावगड करणार आहे.

नेरुळमधील ज्वेल्स ऑफ नवी मुंबई परिसरातील स्मृतिवनच्या कामाची आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी मंगळवारी पाहणी केली. त्या ठिकाणी ड्रीप व स्प्रिंकलरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. स्मृतिवनच्या उर्वरित भागाचे सपाटीकरण करून त्या ठिकाणी वृक्षलावगड करण्याच्या सूचनाही केल्या आहेत. या वेळी शहर अभियंता सुरेंद्र पाटील, नितीन काळे, अजय संख्ये, पंढरीनाथ चौडे, प्रकाश गिरी, पूनम चासकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.