शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

नेरुळमध्ये साकारणार स्मृतिवन; महापालिकेचा प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 01:15 IST

आतापर्यंत ४०० पेक्षा जास्त वृक्षपे्रमी नागरिकांनी यासाठी नावनोंदणी केली आहे. एक हजार ५५ इतक्या वृक्षलागवडीपर्यंत ही योजना सुरू राहणार आहे.

नवी मुंबई : महापालिकेने नेरुळ सेक्टर २६ मध्ये २२ हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर स्मृतिवन विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांना त्यांच्या प्रियजनांच्या स्मृती जपता येणार असून, वृक्षांवर त्यांचे नामफलक लावले जाणार आहेत. या योजनेलाही चांगला प्रतिसाद मिळाला असून, आतापर्यंत ४०० पेक्षा जास्त नागरिकांनी नावनोंदणी केली आहे.

स्मृतिवन संकल्पनेत नागरिक एक हजार रुपये नाममात्र शुल्क भरून वृक्ष लागवडीद्वारे प्रियजनांच्या नावाने आठवणी जपू शकतात. संबंधित व्यक्ती व संस्थेचा नामफलक त्या वृक्षावर लावण्यात येणार आहे. वृक्षारोपणासाठी खड्डा खोदणे, त्याकरिता लागणारी लाल माती, शेणखत व नामफलक बसवून तीन वर्षांपर्यंत त्या वृक्षाची जोपासना केली जाणार आहे.

आतापर्यंत ४०० पेक्षा जास्त वृक्षपे्रमी नागरिकांनी यासाठी नावनोंदणी केली आहे. एक हजार ५५ इतक्या वृक्षलागवडीपर्यंत ही योजना सुरू राहणार आहे. महापालिका स्मृतिवनमध्ये बेल, कैलासपती, चिंच, कवठ, बकुळ, बहावा, पांगारा, लिंब, आकाश निंब, पारिजातक, चंदन, सीताअशोक, अर्जुन, समुद्रफळ अशा देशी वृक्षांची लावगड करणार आहे.

नेरुळमधील ज्वेल्स ऑफ नवी मुंबई परिसरातील स्मृतिवनच्या कामाची आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी मंगळवारी पाहणी केली. त्या ठिकाणी ड्रीप व स्प्रिंकलरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. स्मृतिवनच्या उर्वरित भागाचे सपाटीकरण करून त्या ठिकाणी वृक्षलावगड करण्याच्या सूचनाही केल्या आहेत. या वेळी शहर अभियंता सुरेंद्र पाटील, नितीन काळे, अजय संख्ये, पंढरीनाथ चौडे, प्रकाश गिरी, पूनम चासकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.