शहरं
Join us  
Trending Stories
1
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
4
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
5
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
6
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
7
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
8
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
9
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
10
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
11
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
12
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
13
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
14
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
15
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
16
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
17
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
18
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
19
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
20
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश

नेरुळमध्ये साकारणार स्मृतिवन; महापालिकेचा प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 01:15 IST

आतापर्यंत ४०० पेक्षा जास्त वृक्षपे्रमी नागरिकांनी यासाठी नावनोंदणी केली आहे. एक हजार ५५ इतक्या वृक्षलागवडीपर्यंत ही योजना सुरू राहणार आहे.

नवी मुंबई : महापालिकेने नेरुळ सेक्टर २६ मध्ये २२ हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर स्मृतिवन विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांना त्यांच्या प्रियजनांच्या स्मृती जपता येणार असून, वृक्षांवर त्यांचे नामफलक लावले जाणार आहेत. या योजनेलाही चांगला प्रतिसाद मिळाला असून, आतापर्यंत ४०० पेक्षा जास्त नागरिकांनी नावनोंदणी केली आहे.

स्मृतिवन संकल्पनेत नागरिक एक हजार रुपये नाममात्र शुल्क भरून वृक्ष लागवडीद्वारे प्रियजनांच्या नावाने आठवणी जपू शकतात. संबंधित व्यक्ती व संस्थेचा नामफलक त्या वृक्षावर लावण्यात येणार आहे. वृक्षारोपणासाठी खड्डा खोदणे, त्याकरिता लागणारी लाल माती, शेणखत व नामफलक बसवून तीन वर्षांपर्यंत त्या वृक्षाची जोपासना केली जाणार आहे.

आतापर्यंत ४०० पेक्षा जास्त वृक्षपे्रमी नागरिकांनी यासाठी नावनोंदणी केली आहे. एक हजार ५५ इतक्या वृक्षलागवडीपर्यंत ही योजना सुरू राहणार आहे. महापालिका स्मृतिवनमध्ये बेल, कैलासपती, चिंच, कवठ, बकुळ, बहावा, पांगारा, लिंब, आकाश निंब, पारिजातक, चंदन, सीताअशोक, अर्जुन, समुद्रफळ अशा देशी वृक्षांची लावगड करणार आहे.

नेरुळमधील ज्वेल्स ऑफ नवी मुंबई परिसरातील स्मृतिवनच्या कामाची आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी मंगळवारी पाहणी केली. त्या ठिकाणी ड्रीप व स्प्रिंकलरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. स्मृतिवनच्या उर्वरित भागाचे सपाटीकरण करून त्या ठिकाणी वृक्षलावगड करण्याच्या सूचनाही केल्या आहेत. या वेळी शहर अभियंता सुरेंद्र पाटील, नितीन काळे, अजय संख्ये, पंढरीनाथ चौडे, प्रकाश गिरी, पूनम चासकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.