शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
2
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
3
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
4
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
5
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
6
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश
7
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
8
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
9
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
10
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
11
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
12
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
13
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
14
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
15
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
16
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
17
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
18
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
19
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
20
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!

पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवारांच्या शहरात सभा

By admin | Updated: February 13, 2017 05:14 IST

राज्यभर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे वारे वाहत असतानाच त्याचे लोन नवी मुंबईकडे फिरले आहे. राज्यातील विविध ठिकाणच्या उमेदवारांच्या प्रचार सभा

सूर्यकांत वाघमारे / नवीमुंबई राज्यभर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे वारे वाहत असतानाच त्याचे लोन नवी मुंबईकडे फिरले आहे. राज्यातील विविध ठिकाणच्या उमेदवारांच्या प्रचार सभा नवी मुंबईत होत असून, त्यामधून मतदारांना प्रलोभने दिली जात आहेत. राज्यात सध्या १० मनपा, २५ जिल्हा परिषदा व २९६ पंचायत समितींच्या निवडणुकीची रंगत सुरू आहे. त्या ठिकाणच्या उमेदवारांच्या प्रचार सभा नवी मुंबईतही होऊ लागल्या आहेत. रविवारी कोपरखैरणे येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मेळावा आयोजित करण्यात आला होता. तर काँग्रेसच्या वतीने कोपरखैरणेतच कराड दक्षिण जिल्ह्याचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या दोन्ही सभांना पश्चिम महाराष्ट्रातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. नोकरीनिमित्ताने मुंबईसह नवी मुंबईत राहणाऱ्यांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांची संख्या जास्त असून, त्यापैकी बहुतांश माथाडी कामगार आहेत. यामुळे सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर व पुणे आदी ठिकाणी निवडणुका असल्यास शहराकडचा हा मतदार ‘राजा’ झालेला असतो. त्यांचे मत पदरात पाडून घेण्यासाठी शहरात ठिकठिकाणी बैठका व सभांचे आयोजन केले जाते. यापूर्वी पृथ्वीराज चव्हाण व विलासकाका हुंडाळकर यांच्यातल्या विधानसभेच्या लढतेच्या प्रचारसभाही नवी मुंबईत झालेल्या आहेत. त्यावरून पश्चिम महाराष्ट्रात निवडणूक असल्यास नवी मुंबईत विशेष करून कोपरखैरणेत प्रचारसभा घेणे हा पायंडाच पडलेला आहे. अशा सभांकरिता प्रभाव पडेल, अशा नेतृत्वाला बोलावून मतदारांची बांधणी करण्याचा प्रयत्न केला जातो. यंदाही नवी मुंबईत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचार सभा रंगण्याला सुरुवात झाली आहे. त्यामध्ये वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली येथील मध्यमवर्गीय कुटुंबावर विषेश लक्ष केंद्रित केले जात आहे. अनेकांची शहरात व गावाकडे अशी दुहेरी मतदार नोंदणी आहे. त्यापैकी बहुतांश जण दोन्हीकडे मतदानाचा हक्क बजावत असतात. यामुळे विधानसभा निवडणूक काळात नवी मुंबईत मतदान केल्यानंतर खासगी बस भरून गावाकडे जात असतात. यावरूनच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी दुहेरी मतदानासंदर्भात एपीएमसी मध्ये केलेले वक्तव्य वादग्रस्तही ठरले होते. यामुळे राज्यातल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत होणाऱ्या राजकीय सभांकडे निवडणूक आयोगाने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. नुकतेच वाईतील एका उमेदवारासंदर्भात झालेल्या प्रचार सभेनंतर उपस्थित मतदारांची विशेष ठिकाणी खानावळीची सोय करण्यात आली होती. त्या ठिकाणी कौटुंबिक मेळाव्याच्या निमित्ताने भेट स्वरूपात टिफीनचे वाटप केल्याचे दिसून आले. एकाच वेळी हे दोन्ही कार्यक्रम झाल्यामुळे त्याचा निवडणुकीशी संबंध असल्याची शक्यताही नाकारता येत नाही.