शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवारांच्या शहरात सभा

By admin | Updated: February 13, 2017 05:14 IST

राज्यभर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे वारे वाहत असतानाच त्याचे लोन नवी मुंबईकडे फिरले आहे. राज्यातील विविध ठिकाणच्या उमेदवारांच्या प्रचार सभा

सूर्यकांत वाघमारे / नवीमुंबई राज्यभर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे वारे वाहत असतानाच त्याचे लोन नवी मुंबईकडे फिरले आहे. राज्यातील विविध ठिकाणच्या उमेदवारांच्या प्रचार सभा नवी मुंबईत होत असून, त्यामधून मतदारांना प्रलोभने दिली जात आहेत. राज्यात सध्या १० मनपा, २५ जिल्हा परिषदा व २९६ पंचायत समितींच्या निवडणुकीची रंगत सुरू आहे. त्या ठिकाणच्या उमेदवारांच्या प्रचार सभा नवी मुंबईतही होऊ लागल्या आहेत. रविवारी कोपरखैरणे येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मेळावा आयोजित करण्यात आला होता. तर काँग्रेसच्या वतीने कोपरखैरणेतच कराड दक्षिण जिल्ह्याचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या दोन्ही सभांना पश्चिम महाराष्ट्रातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. नोकरीनिमित्ताने मुंबईसह नवी मुंबईत राहणाऱ्यांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांची संख्या जास्त असून, त्यापैकी बहुतांश माथाडी कामगार आहेत. यामुळे सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर व पुणे आदी ठिकाणी निवडणुका असल्यास शहराकडचा हा मतदार ‘राजा’ झालेला असतो. त्यांचे मत पदरात पाडून घेण्यासाठी शहरात ठिकठिकाणी बैठका व सभांचे आयोजन केले जाते. यापूर्वी पृथ्वीराज चव्हाण व विलासकाका हुंडाळकर यांच्यातल्या विधानसभेच्या लढतेच्या प्रचारसभाही नवी मुंबईत झालेल्या आहेत. त्यावरून पश्चिम महाराष्ट्रात निवडणूक असल्यास नवी मुंबईत विशेष करून कोपरखैरणेत प्रचारसभा घेणे हा पायंडाच पडलेला आहे. अशा सभांकरिता प्रभाव पडेल, अशा नेतृत्वाला बोलावून मतदारांची बांधणी करण्याचा प्रयत्न केला जातो. यंदाही नवी मुंबईत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचार सभा रंगण्याला सुरुवात झाली आहे. त्यामध्ये वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली येथील मध्यमवर्गीय कुटुंबावर विषेश लक्ष केंद्रित केले जात आहे. अनेकांची शहरात व गावाकडे अशी दुहेरी मतदार नोंदणी आहे. त्यापैकी बहुतांश जण दोन्हीकडे मतदानाचा हक्क बजावत असतात. यामुळे विधानसभा निवडणूक काळात नवी मुंबईत मतदान केल्यानंतर खासगी बस भरून गावाकडे जात असतात. यावरूनच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी दुहेरी मतदानासंदर्भात एपीएमसी मध्ये केलेले वक्तव्य वादग्रस्तही ठरले होते. यामुळे राज्यातल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत होणाऱ्या राजकीय सभांकडे निवडणूक आयोगाने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. नुकतेच वाईतील एका उमेदवारासंदर्भात झालेल्या प्रचार सभेनंतर उपस्थित मतदारांची विशेष ठिकाणी खानावळीची सोय करण्यात आली होती. त्या ठिकाणी कौटुंबिक मेळाव्याच्या निमित्ताने भेट स्वरूपात टिफीनचे वाटप केल्याचे दिसून आले. एकाच वेळी हे दोन्ही कार्यक्रम झाल्यामुळे त्याचा निवडणुकीशी संबंध असल्याची शक्यताही नाकारता येत नाही.