शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

पाण्याचा निचरा होण्यासाठी महामार्गावर उपाययोजना; गटारांचेही काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 01:11 IST

खारघर हिरानंदानी ते बेलापूर उड्डाणपूल येथे पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी कुठलाही मार्ग नव्हता. त्यामुळे पाणी साचून पावसाळ्यात अडचणी येत असत.

कळंबोली : पनवेल-सायन महामार्गावर खड्ड्यात पावसाचे पाणी साचू नये, त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाने खबरदारी घेतली आहे. पावसाळी नाले साफ करण्याबरोबरच ज्या ठिकाणी पावसाच्या निचरा होण्यासाठी जागा नाही. या ठिकाणी पदपथ खोदून मोरी काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे आगामी पावसाळ्यात वाहनचालकांना गैरसोयीला सामोरे जावे लागणार नाही, असे संबंधित विभागाचे म्हणणे आहे.

पावसाळा आला पनवेल-सायन महामार्गावर जाणे-येणे खूपच जिकिरीचे बनत होते. सांगायचे झाले तर मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडत होते त्यामुळे वाहतूककोंडी होत होती. खारघर ते बेलापूर हे अंतर कापण्यासाठी कधी कधी एक तास लागत होता. त्यावर उपाययोजना म्हणून ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडत होते, अशा पुलावर सिमेंट काँक्र ीटीकरण करण्यात आले आहे. याशिवाय पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचून वाहतुकीला अडथळा येत होता. कित्येक वेळा वाहने बंद पडतात. त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. कळंबोली कॉलनी ते कामोठे बस स्टॉप या पर्यंत काँक्रीट गटारे बांधण्याचे काम सुरू आहे. तसेच कोपरा या ठिकाणी उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

खारघर हिरानंदानी ते बेलापूर उड्डाणपूल येथे पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी कुठलाही मार्ग नव्हता. त्यामुळे पाणी साचून पावसाळ्यात अडचणी येत असत. म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने पद खोदून महामार्गावरील पावसाचे पाणी बाजूच्या नाल्यामध्ये वाहून जावे याकरिता प्रत्येक दहा मीटर अंतरावर मोरी काढण्यात आल्या आहेत. त्या काँक्रीट करून त्याच्यावर पुन्हा अच्छादन करण्यात येत आहे. भारती विद्यापीठ, खारघर रेल्वेस्थानकासमोर काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या काही दिवसांत ते पूर्णत्वास येईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे पावसाचे पाणी साचून रहदारीला अडथळा निर्माण होणार नाही, असा विश्वासही या विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.