शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

जेएनपीटीच्या विस्तारासाठी खारफुटीची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 23:30 IST

अहवाल सादर करण्याचे निर्देश : पर्यावरण समितीकडून तक्रारीची दखल

नवी मुंबई : जेएनपीटीच्या चौथ्या बंदराच्या विस्तारीकरणाचे काम वेगाने सुरू आहे, त्यासाठी मोठ्या प्रमाणात खारफुटीची कत्तल केल्याची तक्रार पर्यावरणप्रेमी व काही संस्थांनी केली आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या कांदळवन संरक्षण आणि संवर्धन समितीने या तक्रारीची गंभीर दखल घेत या प्रकरणी शहानिशा करून कार्यवाही अहवाल सादर करण्याचे निर्देश महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट आॅथोरिटी (एमसीझेडएमए) ला दिले आहेत.

देशातील सर्वात मोठे बंदर म्हणून जेएनपीटीची ओळख आहे. या बंदराच्या चौथ्या कंटेनर टर्मिनलच्या विस्ताराचे काम सध्या प्रगतिपथावर आहे, त्यासाठी खाडीकिनाऱ्यालगतच्या सुमारे ११० हेक्टर जागेवर भराव टाकण्यात आला आहे. त्यामुळे खारफुटीचा मोठ्या प्रमाणात ºहास होत असल्याची तक्रार पर्यावरण क्षेत्रात काम करणाºया श्री एकवीरा आई प्रतिष्ठान आणि नवी मुंबईतील नेटकनेक्ट फाउंडेशनने कांदळवन संरक्षण समितीकडे केली होती. त्याची दखल घेत समितीने या तक्रारीसंदर्भात सखोल चौकशी करून कारवाईचा सविस्तार अहवाल सादर करण्याचे निर्देश एमसीझेडएमएला दिले होते, त्यानुसार या संदर्भात पाहणी करून अहवाल तयार केल्याची माहिती उरणचे तहसीलदार संदीप भंडारे यांनी दिली. यासंदर्भातील अहवाल कांदळवन समितीला सादर केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, समितीच्या आगामी बैठकीच्या आठ दिवसांअगोदर अहवालाच्या प्रती समितीच्या सर्व सदस्यांना देण्याचे निर्देश कोकण विभागीय आयुक्तांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. तर सखोल चौकशी करून अहवाल सादर करा.

इतकेच नव्हे, तर कत्तल केलेल्या खारफुटीची त्याच जागेवर पुन:लागवड करण्याची मागणी समितीचे सदस्य आणि वनशक्ती फाउंडेशनचे डी. स्टॅलीन यांनी केली आहे.निर्धारित वेळेत अहवाल सादर न केला गेल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे अधिकार कांदळवन समितीला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

उरणमधील २० गावांना फटकाच्आमचा विकासाला विरोध नाही; परंतु विकास मानवी अस्तित्वाला घातक ठरत असेल, तर त्याला विरोध झाला पाहिजे. उरणच्या खाडी परिसरात मोठ्या प्रमाणात भराव करण्यात आला आहे. त्यामुळे या शहरातील जवळपास २० गावे पाण्याखाली गेल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे.

च्ही वस्तुस्थिती असताना जेएनपीटीच्या चौथ्या कंटेनर टर्मिनलसाठी मोठ्या प्रमाणात खारफुटीची तोड करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकल्पाला आमचा विरोध असून, तोडलेल्या खारफुटीची त्याच जागेवर पुन:लागवड करावी, अशी आमची मागणी असल्याचे श्री एकवीरा आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदकुमार पवार यांनी केली आहे.च्उच्च न्यायालयाच्या कांदळवन संरक्षण समितीने या प्रकरणातील कारवाईचा चेंडू पर्यावरण विभागाच्या कोर्टात ढकलला आहे. त्यामुळे राज्य शासनाने यासंदर्भात कठोर कारवाई करावी, अशी मागणी नेटकनेक्ट फाउंडेशनचे बी. एन. कुमार यांनी केली आहे.

टॅग्स :JNPTजेएनपीटी