शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

माथाडींच्या इशाऱ्याने हादरले शासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 01:28 IST

राज्यातील सर्व माथाडी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिल्याने शासन हादरले असून सर्व प्रमुख मागण्या मान्य केल्या आहेत.

नवी मुंबई : राज्यातील सर्व माथाडी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिल्याने शासन हादरले असून सर्व प्रमुख मागण्या मान्य केल्या आहेत. वादग्रस्त अध्यादेश रद्द करण्यात आला आहे. यामुळे २७ मार्चला माथाडी कामगारांच्या मोर्चाचे विजयी मेळाव्यात रूपांतर होणार असून कामगार मंत्री मान्य केलेल्या मागण्यांविषयीची घोषणा करणार आहेत.माथाडी व सुरक्षा रक्षक कामगार बचाव कृती समितीने सरकारविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. शासनाने माथाडी कायदा व मंडळांचे अस्तित्व संपविण्याचे षडयंत्र रचले आहे. १० फेब्रुवारी २०१६, ६ सप्टेंबर २०१६ व १७ जानेवारी २०१८ ला तीन शासन आदेश काढले आहेत. या आदेशामुळे कामगारांचे अस्तित्व संपण्याची शक्यता निर्माण झाली असल्यामुळे राज्यातील ४० कामगार संघटना एकत्र येवून २७ मार्चला भव्य मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला. यासाठी नेमलेल्या कृती समितीचे नेतृत्व बाबा आढाव, नरेंद्र पाटील, शशिकांत शिंदे, गुलाबराव जगताप, अविनाश रामिष्टे, बळवंतराव पवार, पोपटराव पवार करणार आहेत. एक लाखपेक्षा जास्त कामगार आंदोलनामध्ये सहभागी करण्यासाठी संघटनांनी तयारी केली होती. आंदोलनाच्या इशाºयानंतर सरकार हादरले असून सर्व प्रमुख मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले आहे. १७ जानेवारीला काढलेला वादग्रस्त अध्यादेश विनाअट मागे घेण्यात येणार आहे. यापूर्वीच्या दोन आदेशांमधील माथाडी कायदा व कामगारांसाठी त्रासदायक असणाºया तरतुदी वगळण्यात येणार आहेत. सुरक्षा रक्षकांचेही अनेक प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले आहे.माथाडी कामगार मंगळवारी मस्जीद बंदर येथे एकत्र होणार आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमधील कामगार कांदा बटाटा मार्केटमध्ये एकत्रित जमणार आहेत. तेथून मोर्चाने सानपाडा रेल्वे स्टेशनवरून मस्जीद बंदरपर्यंत जाणार आहेत. या मोर्चामध्ये हजारो कामगार जमणार आहेत. मस्जीदबंदरमध्ये मोर्चाचे विजयी मेळाव्यात रूपांतर होणार आहे. शासनाने कोणत्या मागण्या मान्य केल्याची माहिती दिली जाणार आहे. स्वत: कामगार मंत्री मोर्चाला सामोेरे होवून वादग्रस्त अध्यादेश रद्द केल्याचा व इतर प्रश्न सोडविण्याविषयी आश्वासन देणार आहेत.