शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांना माथाडींचा मदतीचा हात, मुख्यमंत्र्यांनी केले कष्टकरी कामगारांचे कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 03:01 IST

राज्यातील संकटग्रस्त शेतक-यांना माथाडी कामगारांनी मदतीचा हात पुढे केला आहे. ३० लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला.

नवी मुंबई : राज्यातील संकटग्रस्त शेतक-यांना माथाडी कामगारांनी मदतीचा हात पुढे केला आहे. ३० लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला. एका दिवसाचे वेतन शेतकºयांसाठी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामगारांचे स्वागत केले असून, ही कृती इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार काढले आहेत.राज्यातील असंघटित हमाल व कष्टकरी कामगारांना एकत्र आणून त्यांच्यासाठी कायदा बनविण्यास सरकारला भाग पाडण्यामध्ये महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनची महत्त्वाची भूमिका आहे. अण्णासाहेब पाटील यांनी राज्यातील माथाडी कामगारांना त्यांचे हक्क मिळवून दिले. कामगारांना घरे व उपचारासाठी स्वत:चे रुग्णालय सुरू करण्यात आले. राज्यातील माथाडी कामगारांनीही त्यांना मिळालेल्या कष्टाच्या मोबदल्यातील काही वाटा संकटग्रस्तांना देण्याची परंपरा कायम राखली आहे. राज्यात भूकंप, अतिवृष्टी, दुष्काळ व इतर कोणतेही नैसर्गिक संकट असले की, सर्वात प्रथम धावून जातो तो माथाडी कामगारच. मुंबईतील १९९३मधील बॉम्बस्फोटानंतर सर्वप्रथम जनजीवन सुरळीत करण्यामध्येही माथाडी कामगारांचा मोठा वाटा होता. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनीही माथाडींमुळेच दुसºया दिवशी जनजीवन सुरळीत झाल्याचे अनेक वेळा भाषणांमध्ये सांगितले आहे. कामगारांनी पुन्हा एकदा राज्यातील शेतकºयांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. दुष्काळ, अतिवृष्टीमुळे संकटात असलेल्या शेतकºयांना मदत करता यावी, यासाठी कामगारांनी एक दिवसाचे वेतन दिले आहे. ३० लाख रुपयांचा निधी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.माथाडी कामगारांनी केलेल्या मदतीचे मुख्यमंत्र्यांनीही कौतुक केले आहे. कष्टकरी कामगारांनी त्यांचे एका दिवसाचे वेतन शेतकºयांसाठी देणे ही इतरांसाठी प्रेरणादायी गोष्ट आहे. अशाप्रकारे प्रत्येक नागरिकाने मदतीचा हात पुढे केला, तर प्रत्येक संकटग्रस्तांना आधार देणे सहज शक्य असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.माथाडी नेत्यांनीही कामगारांनी आतापर्यंत सामाजिक जाणिवेमधून काय केले, याविषयी माहिती दिली. माथाडी कामगारही शेतकरीच असून, बहुतांश कामगार शेती व्यवसायाशी संबंधित उद्योगामध्ये कार्यरत आहेत. यामुळेच शेतकºयांच्या मदतीसाठी कामगार नेहमीच पुढे येत असल्याचे सांगितले.या वेळी माजी मंत्री शशिकांत शिंदे, आमदार नरेंद्र पाटील, गुलाबराव जगताप, एकनाथ जाधव, गुंगा पाटील, पोपटराव देशमुख व इतर पदाधिकारी उपस्थित होते.>कामगारांना २५०० घरांचे आश्वासनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षभरामध्ये माथाडी कामगारांचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. वडाळा येथील गृहप्रकल्प पूर्ण होण्यामधील अनेक अडथळे दूर केले आहेत. याशिवाय अजून २५०० घरे उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. वडाळामधील गृहप्रकल्पांसाठी जादा चटईक्षेत्र देता येईल का, याविषयी चाचपणी करण्यात येणार आहे. कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, शक्य तितक्या लवकर घरांसह सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले असल्याने कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.माथाडी कामगारांनी राज्यातील प्रत्येक नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतीचा हात पुढे केला आहे. शेतकºयांसाठी एका दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कामगारांनी दिलेला ३० लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला.- नरेंद्र पाटील,माथाडी नेते