शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

मराठा आंदोलक एपीएमसीसह मैदानांवर तळ ठोकणार, पालिकेकडून फिरत्या शौचालयांची अपेक्षा

By नामदेव मोरे | Updated: January 23, 2024 15:03 IST

२६ जानेवारीला लाखो आंदोलक ध्वजाला सलामी देणार

नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: मराठा आंदोलक २५ जानेवारीला नवी मुंबईमध्ये मुक्काम करणार आहेत. एपीएमसी मार्केटसह मैदानांचा आधार घेतला जाणार आहे. महानगरपालिकेने फिरत्या शौचालयासह पाणी व्यवस्था करावी, अशी अपेक्षा केली असली तरी अद्याप त्यांनी कोणतीही शासनाकडून ठोस उपाययोजना केलेली नाही. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पहाटे नवी मुंबईमध्येच ध्वजाला सलामी देऊन आंदोलक मुंबईकडे रवाना होणार आहेत.

आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिंडी मुंबईकडे येत आहे. २५ जानेवारीला दुपारी आंदोलक पनवेलमध्ये येणार आहेत. सायंकाळी सर्वांचा मुक्काम नवी मुंबईत होणार आहे. सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलकांच्या राहण्याची, जेवणाची व सर्व प्रकारची सोय करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाच मार्केटमध्ये राहण्याची सोय केली जाणार आहे. यासाठी बाजार समिती प्रशासनाला पत्र दिले आहे. महानगरपालिकेची मैदाने, सिडको प्रदर्शन केंद्र व इतर ठिकाणीही सोय करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. नियोजनासाठीची माहिती देण्यासाठी मंगळवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. महानगरपालिकेकडून फिरते शौचालय, पाणी व इतर सुविधा मिळण्याची अपेक्षा आहे. परंतु, अद्याप प्रशासनाकडून बैठक झालेली नाही. यामुळे पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

आंदोलकांना जेवण पुरविण्यासाठी शहरातील प्रत्येक विभागातील मराठा नागरिकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. वैद्यकीय पथके तैनात केली जाणार आहेत. नवी मुंबई केमिस्ट असोसिएशननेही वैद्यकीय मदत देण्याची तयारी केली आहे. सर्वांनी त्यांचे योगदान देण्यास सुरुवात केली आहे. ठाणे जिल्हाधिकारी, पनवेल महानगरपालिका आयुक्त यांच्याशीही समन्वय साधला जात असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. यावेळी बन्सी डोके, विनोद पोखरकर, डॉ. अमरदीप गरड, डॉ. बाळासाहेब जगताप, विजय खोपडे, सुनीता देशमुख, जयश्रीराजे महाडिक, सुजल बर्गे, गणेश ढोकळे पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

ध्वजारोहणाला सर्वाधिक गर्दी

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पहाटे एपीएमसी परिसरामध्ये आंदोलक राष्ट्रध्वजाला सलामी देणार आहेत. लाखोंच्या संख्येने मराठा समाज यावेळी उपस्थित राहणार असल्यामुळे ध्वजारोहणाला विक्रमी गर्दी होण्याची शक्यताही मराठा समन्वयक समितीने व्यक्त केली.

अस्वच्छता झाली तर महापालिका जबाबदार

आंदोलकांसाठी पुरेशा प्रमाणात फिरती शौचालये आणि पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी महानगरपालिका प्रशासनाकडेही केली आहे. पण, या सुविधा मिळाल्या नाही व शहरात अस्वच्छता झाली तर त्याला महापालिका प्रशासन जबाबदार असा इशाराही समन्वयकांनी दिला.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई