शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

मराठा आंदोलन शांततेतच, पण सरकारला पेलवणार नाही- मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

By नामदेव मोरे | Updated: October 19, 2023 18:34 IST

आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार

नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवले जाणार आहे. आंदोलन पूर्णपणे शांततेमध्ये होणार असले तरी सरकारला ते पेलवणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी नवी मुंबईत दिला.

मराठा आरक्षणासाठीचा लढा उभारलेले मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी नवी मुंबईला भेट दिली. वाशीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आरक्षण मिळेपर्यंत शांततेमध्ये आंदोलन केले जाणार आहे. पण शांततेमधील हे युद्ध सरकारला पेलवणार नाही. मागितलेल्या मुदतीमध्ये सरकारने निर्णय घेतला नाही तर पुढे आंदोलनाची दिशा काय असेल हे २२ तारखेला स्पष्ट करणार आहे. सद्यस्थितीमध्ये राज्यभर दौरा करून मराठाबांधवांशी संवाद साधत आहे. राज्यात सर्वच मराठ्याचे बालेकिल्ले आहेत. दौऱ्यामधून शांततेमध्ये आंदोलनाचे आवाहन केले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकारने आमच्याकडून वेळ घेतला आहे. या वेळेत निर्णय घेणे हे सरकारचे कर्तव्य आहे. त्यांनी वेळेत निर्णय घेतला नाही तर आम्ही पुढची दिशा स्पष्ट करू, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. नवी मुंबईमध्ये मराठा समाजाच्या विविध संस्था व संघटनांनी जरांगे पाटील यांचे स्वागत केले. यावेळी विठ्ठल मोरे, मिलिंद सूर्यराव, राहुल गावडे, सागर पावगे, मयुर धुमाळ, सिद्धेश कांबळे, योगेश पवार, अमर सकपाळ, विजय धनावडे, विनोद साबळे, उमेश जुनघरे, विनोद पोखरकर, मंगेश मिस्किन, अभिजित पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील