शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

मराठा आंदोलन शांततेतच, पण सरकारला पेलवणार नाही- मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

By नामदेव मोरे | Updated: October 19, 2023 18:34 IST

आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार

नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवले जाणार आहे. आंदोलन पूर्णपणे शांततेमध्ये होणार असले तरी सरकारला ते पेलवणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी नवी मुंबईत दिला.

मराठा आरक्षणासाठीचा लढा उभारलेले मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी नवी मुंबईला भेट दिली. वाशीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आरक्षण मिळेपर्यंत शांततेमध्ये आंदोलन केले जाणार आहे. पण शांततेमधील हे युद्ध सरकारला पेलवणार नाही. मागितलेल्या मुदतीमध्ये सरकारने निर्णय घेतला नाही तर पुढे आंदोलनाची दिशा काय असेल हे २२ तारखेला स्पष्ट करणार आहे. सद्यस्थितीमध्ये राज्यभर दौरा करून मराठाबांधवांशी संवाद साधत आहे. राज्यात सर्वच मराठ्याचे बालेकिल्ले आहेत. दौऱ्यामधून शांततेमध्ये आंदोलनाचे आवाहन केले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकारने आमच्याकडून वेळ घेतला आहे. या वेळेत निर्णय घेणे हे सरकारचे कर्तव्य आहे. त्यांनी वेळेत निर्णय घेतला नाही तर आम्ही पुढची दिशा स्पष्ट करू, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. नवी मुंबईमध्ये मराठा समाजाच्या विविध संस्था व संघटनांनी जरांगे पाटील यांचे स्वागत केले. यावेळी विठ्ठल मोरे, मिलिंद सूर्यराव, राहुल गावडे, सागर पावगे, मयुर धुमाळ, सिद्धेश कांबळे, योगेश पवार, अमर सकपाळ, विजय धनावडे, विनोद साबळे, उमेश जुनघरे, विनोद पोखरकर, मंगेश मिस्किन, अभिजित पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील