शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

घनकचरा व्यवस्थापनाचे नियोजन कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 02:47 IST

पावसाळा सुरू झाल्यापासून महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे नियोजन कोलमडले आहे.

- नामदेव मोरे नवी मुंबई : पावसाळा सुरू झाल्यापासून महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे नियोजन कोलमडले आहे. कचऱ्याचे प्रमाण ६५० वरून ९०० टन झाले आहे. वृक्ष छाटणी व त्या कचºयाची वाहतूक करताना तारेवरची कसरत करावी लागत असून अनेक ठिकाणी कचºयाचे ढिगारे साचलेले दिसत आहेत.स्वच्छ भारत अभियानामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने उत्तम कामगिरी केली. घनकचरा व्यवस्थापनामध्ये देशात प्रथम क्रमांक मिळविला. स्पर्धेदरम्यान उत्तम कामगिरी करणाºया प्रशासनाची कामगिरी पहिल्याच पावसामध्ये रोडावली आहे. पावसाळ्यामध्ये वाढणाºया कचºयाचा अंदाज आलेला नाही. मनपा क्षेत्रामध्ये रोज ६५० ते ६७५ टन कचरा निर्माण होत असतो. पावसाळा सुरू झाल्यापासून हेच प्रमाण सरासरी ९०० टन झाले आहे. नागरिकांनी घरामधील जुने कपडे व साहित्य कचºयामध्ये टाकण्यास सुरवात केली असल्यामुळे त्याचा ताण कचरा वाहतूक करणाºया यंत्रणेवर पडला आहे. यामुळे पंधरा दिवसांपासून अनेक ठिकाणी कचºयाचे ढिगारे जैसे थे असल्याचे चित्र दिसू लागले आहे. पावसाळ्यात साचलेल्या कचºयामुळे दुर्गंधी निर्माण होत असून साथीचे आजार पसरण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. स्वच्छता विभागाच्या कर्मचारी व अधिकाºयांना नगरसेवकांपासून नागरिक फोन करून कचरा उचलला नसल्याच्या तक्रारी करू लागले आहेत. अनेक नागरिकांनी आयुक्त रामास्वामी एन. यांच्याकडेही तक्रारी केल्या आहेत.शहरात पदपथ व रोडवरील वृक्षाच्या धोकादायक फांद्या तोडण्याचे आव्हानही पालिकेसमोर उभे राहिले आहे. वृक्ष छाटणीनंतर कचºयाची विल्हेवाट लावतानाही कसरत करावी लागत आहे. नागरिकांनी सोसायटीअंतर्गत वृक्ष छाटणी करून कचरा पदपथावर टाकण्यास सुरवात केली आहे. याशिवाय महापालिकेच्या उद्यान विभागाकडून नियमित वृक्षाच्या फांद्या तोडण्याचे काम सुरू आहे. काही वेळा १ हजार टन कचरा निर्माण होत असून तो क्षेपणभूमीवर घेवून जाण्यासाठीची यंत्रणा अपुरी पडू लागली आहे. घनकचरा विभागामध्ये देशात प्रथम क्रमांक मिळविलेल्या महापालिकेच्या पावसाळ्यामध्ये वाढणाºया कचºयाची वाहतूक करण्याचे नियोजन करता आलेले नाही. कचरा वाहतूक करणाºया ठेकेदारानेही अतिरिक्त मनुष्यबळ व वाहने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. पण योग्य काळजी घेतली नसल्याने शहरामध्ये कचºयाचे ढिगारे दिसू लागले असून नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे. पावसामध्ये धोकादायक वृक्ष कोसळण्याच्या घटनाही वाढू लागल्या आहेत. अनेक ठिकाणी वाहनांवर वृक्ष कोसळले आहेत. बहुतांश सर्वच वार्डमधून नगरसेवकांनी व सर्वपक्षीय नागरिकांनी वृक्ष छाटणीसाठी प्रशासनाकडे तगादा लावला आहे. परंतु यंत्रणा अपुरी असल्यामुळे सर्व ठिकाणी एकाच वेळी वृक्षछाटणी करत येत नसल्याने प्रशासनाला नागरिकांच्या नाराजीला सामोरे जावे लागत आहे.>ठेकेदारावर कारवाई करावीपावसाळ्यामध्ये कचºयाचे प्रमाण वाढत असते. ठेकेदाराने वाढणाºया कचºयाची वाहतूक करण्यासाठी जादा मनुष्यबळ व वाहने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. परंतु ठेकेदाराने योग्य काळजी घेतलेली दिसत नसून निष्काळजीपणा केला आहे का याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.>कचºयाचेप्रमाण वाढलेघनकचरा विभागाचे उपआयुक्त तुषार पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, पावसाळा सुरू झाल्यापासून कचºयाचे प्रमाण सरासरी अडीचशे टन वाढले आहे. नागरिक घरातील उशा, गाद्या व इतर रद्दीही कचºयामध्ये टाकत आहेत. सोसायटीमधील वृक्षाच्या फांद्या व पालिकेने छाटणी केलेला कचराही नियमित उचलला जात आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले.