शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मुंबईत पहिल्यांदाच मलावी केंट आंब्याची आवक, प्रतिकिलो ६२५ ते ६७५ रूपये दराने विक्री

By नामदेव मोरे | Updated: December 24, 2024 18:49 IST

Navi Mumbai: मलावी हापूस व टॉमी अटकीन नंतर पहिल्यांदाच मलावी येथील केंट आंबा भारतीय बाजारपेठेत दाखल झाला आहे. मुंबई बाजार समितीमध्ये एक टन आवक झाली असून प्रतिकिलो ६२५ ते ६७५ रुपये दराने विक्री होत आहे. १५ जानेवारीपर्यंत हे आंबे उपलब्ध होणार आहेत.

- नामदेव मोरेनवी मुंबई  - मलावी हापूस व टॉमी अटकीन नंतर पहिल्यांदाच मलावी येथील केंट आंबा भारतीय बाजारपेठेत दाखल झाला आहे. मुंबई बाजार समितीमध्ये एक टन आवक झाली असून प्रतिकिलो ६२५ ते ६७५ रुपये दराने विक्री होत आहे. १५ जानेवारीपर्यंत हे आंबे उपलब्ध होणार आहेत.

दक्षीण पूर्व आफ्रिकेतील हापूस सदृष्य व टाॅमी अटकीन हे आंबे मागील काही वर्षापासून नोव्हेंबरमध्ये भारतीय बाजारपेठेमध्ये उपलब्ध होत असतात. यावर्षी २८ नोव्हेंबरला या आंब्याची आयात झाली होती. दोन्ही आंब्यांना ग्राहकांकडून प्रतिसाद मिळाल्यानंतर आता मलावी येथील केंट आंबेही मंगळवारी बाजारसमितीमध्ये दाखल झाले आहेत. केंट आंब्याच्या २७० पेट्या दाखल झाल्या आहेत. एक पेटीमध्ये ४ किलो आंबे आहेत. प्रतीबॉक्स २५०० ते २७०० रुपये दराने विकले जात आहेत. प्रतीकिलो आंब्याचा दर ६२५ ते ६७५ रुपये असा आहे. हे आंबे मुंबईसह पुणे, बंगलोर, राजकोट, अहमदाबाद व दिल्ली येथे पाठविण्यात आले आहेत. केंट आंब्याचा हंगाम १५ जानेवारीपर्यंत चालणार आहे. पुढील १५ ते २० दिवस आंब्याची आयात सुरू राहणार आहे.

यावर्षी कोकणच्या हापूसची आवक मार्चपासून सुरू होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर अखेरीस मलावी येथून टॉमी अटकीनची आयात झाली होती. आता केंट आंब्याची आवक सुरू झाली असून त्यालाही ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आहे.- संजय पानसरे, संचालक फळ मार्केट

टॅग्स :MangoआंबाNavi Mumbaiनवी मुंबई