शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

मकर संक्रातीमुळे तीळ गुळासह बाजरी शेंगदाण्याची आवक वाढली; चार दिवसात ८८ टन तीळाची विक्री 

By नामदेव मोरे | Updated: January 11, 2024 19:03 IST

मकर संक्रातीच्या पार्श्वभुमीवर बाजार समितीमध्ये तीळ, गुळ, शेंगदाणेसह बाजरीची आवक वाढली आहे.

नवी मुंबई: मकर संक्रातीच्या पार्श्वभुमीवर बाजार समितीमध्ये तीळ, गुळ, शेंगदाणेसह बाजरीची आवक वाढली आहे. चार दिवसामध्ये तब्बल ८८ टन तीळाची विक्री झाली आहे. २०८ टन गुळ व ६२६ टन शेंगदाण्याची विक्री झाली आहे. हिवाळा सुरू झाला की ग्राहकांकडून बाजरीला मागणी वाढती. मकर संक्रातीला बाजरीची भाकरी व गाजर, वाटाणा, वालाच्या शेंगाची उसळ केली जाते. यावर्षी बाजरीचे दरही कमी झाले असल्यामुळे ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. एक महिन्यापुर्वी बाजरी २८ ते ४३ रुपये किलो दराने विकली जात होती. सद्यस्थितीमध्ये २७ ते ३७ रुपये किलो दराने विक्री होत आहे. या आठवड्यात चार दिवसात ३३० टन बाजरीची विक्री झाली आहे.

तीळ व शेंगदाण्याचे लाडूही संक्रातीच्या दिवशी वाटले जातात. यामुळे या वस्तूंची मागणीही वाढली आहे.बाजार समितीमध्ये तीळ १४० ते २०० रुपये किलो, गुळ ४७ ते ५५ रुपये व शेंगदाणे ९० ते १३६ रुपये किलो दराने विकले जात आहेत. संक्रातीमुळे या चारही वस्तूंना मागणी वाढली असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. तीळ व गुळाचे दर स्थिर असून बाजरी व शेंगदाण्याचे दर काही प्रमाणात कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

संक्रातीमुळे चाद दिवसातील आवक व बाजारभाववस्तू - आवक - बाजारभावतीळ - ८८.२ - १४० ते २००गुळ - २०८ - ४७ ते ५५शेंगदाणे - ६२६ - ९० ते १३६बाजरी - २७ ते ३७

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMakar Sankrantiमकर संक्रांती