शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

Maharashtra Election 2019 : उरणमध्ये भाजपची दुटप्पी भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 05:04 IST

राज्यातील अनेक मतदारसंघांमध्ये शिवसेना व भाजपमध्ये बंडखोरी झाली आहे.

नवी मुंबई : राज्यातील चार बंडखोर उमेदवारांची भाजपने पक्षातून हकालपट्टी केली आहे; परंतु उरण मतदारसंघातील बंडखोर उमदेवार महेश बालदी यांच्यावर अद्याप काहीही कारवाई केलेली नाही. यामुळे या बंडखोरीला पक्षाचे पाठबळ असल्याचा समज निर्माण होऊ लागला आहे. पनवेलमधून शिवसेनेने माघार घेऊन युती धर्माचे पालन केले; परंतु उरणमध्ये मात्र भाजपने बंडखोरी माघारी घेतली नसल्याने शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्येही नाराजी निर्माण झाली आहे.राज्यातील अनेक मतदारसंघांमध्ये शिवसेना व भाजपमध्ये बंडखोरी झाली आहे. दोन्ही पक्षाच्या प्रमुखांनी बंडखोरांना उमेदवारी मागे घेण्याचे आवाहन केले होते. जे माघार घेणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता. भाजपने मीरा-भार्इंदरमध्ये आमदार नरेंद्र मेहता यांच्या विरोधात बंडखोरी करणाºया गीता जैन यांच्यासह राज्यातील चार ठिकाणच्या बंडखोरांवर कारवाई केली आहे; परंतु रायगड जिल्ह्यातील उरण मतदारसंघामधील बंडखोर उमेदवार महेश बालदी यांच्यावर अद्याप काहीही कारवाई केलेली नाही. युतीमध्ये ही जागा शिवसेनेला देण्यात आली असून, विद्यमान आमदार मनोहर भोईर निवडणूक लढवत आहेत. २०१४ च्या निवडणुकीमध्ये भाजपचे महेश बालदी तिसºया क्रमांकावर होते.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये येथूनही शिवसेना उमेदवाराला मोठे मताधिक्य मिळाले होते. युती झाल्यामुळे शिवसेनेला त्याचा लाभ झाला असता; परंतु बालदी यांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. बालदी यांनी शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांचा अर्ज भरताना भाजपचे पनवेलरायगडमधील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूरही अर्ज भरताना उपस्थित होते.पनवेलमध्ये शिवसेनेचे बबन पाटील यांनी बंडखोरी केली होती. त्यांनी माघार घेतली तर उरणमध्ये भाजप माघार घेईल, अशी चर्चा पहिल्यांदा सुरू होती. पनवेलमधून शिवसेनेने माघार घेऊन युती धर्माचे पालन केले; परंतु उरणमध्ये भाजपने बंडखोरी कायम ठेवली आहे. भाजप हा शिस्तबद्ध पक्ष असल्याने बालदी यांच्यावर कारवाई केली जाईल, असे बोलले जात होते; परंतु अद्याप काहीही कारवाई झालेली नाही. बालदी यांनी नगरसेवक ते नगराध्यक्ष व जेएनपीटीचे विश्वस्त म्हणूनही काम केले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विश्वासू म्हणूनही ते ओळखले जातात. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे पाठबळ असल्याने त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचेही बोलले जात आहे. तालुक्यातील पक्षाचे पदाधिकारीही त्यांचाच प्रचार करत असल्याचे बोलले जात आहे. यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, उरणमधील बंडखोरी पक्षाच्या राज्यस्तरीय नेत्यांच्या लक्षात आली असून ते यावर उचित निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.कारवाई न झाल्यास चुकीचा संदेश- रायगड जिल्ह्यातील पनवेल मतदारसंघामध्ये शिवसैनिकांनी बंडखोरी मागे घेऊन भाजपला पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. त्याच धर्तीवर उरणमध्येही भाजप-शिवसेना उमेदवाराला सहकार्य करेल, अशी अपेक्षा सर्वांना होती; परंतु भाजप उमेदवाराची बंडखोरी कायम असून त्यांच्यासोबत तालुक्यातील पदाधिकारीही आहेत.- बंडखोर उमेदवारावर कारवाई झाली नसल्यामुळे त्याचा चुकीचा संदेश जिल्ह्यात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बंडखोर उमेदवाराला पक्षाचा अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचा समज निर्माण होऊ शकतो.नेत्यांच्या छायाचित्रांचाही वापरभाजपचे बंडखोर उमेदवार महेश बालदी यांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी तयार केलेल्या पत्रकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाच्या प्रमुख नेत्यांचे फोटोही वापरले आहेत.याविषयी शिवसेना पदाधिकाºयांनी भाजपच्या नेत्यांना माहिती दिली आहे; परंतु अद्याप त्याविषयी पक्षाकडून ठोस भूमिका घेण्यात न आल्याने मतदारसंघात संभ्रम आहे.

टॅग्स :uran-acउरणNavi Mumbaiनवी मुंबईpanvel-acपनवेलRaigadरायगड