शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
2
गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं
3
"मे-जून महिन्यात शेतकरी रिकामी, त्यामुळे वाढले खुनाचे गुन्हे", पोलीस अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान   
4
फहाद फासिलचा "१७ वर्षे जुना कीपॅड फोन" चर्चेत; किंमत ऐकून चक्रावून जाल...
5
"आम्ही भारताचे १०-२० जेट सहज पाडले असते, पण..."; बिलावल भुट्टो-ख्वाजा आसिफ यांचा हास्यास्पद दावा!
6
काय बुद्धी सुचली...! १ कोटी पगाराची नोकरी सोडली आणि सिक्युरिटी गार्ड बनला हा व्यक्ती, कशासाठी हा खटाटोप...
7
Video: 6.6.6.6.2.6...; राजस्थानच्या पठ्ठ्यानं मैदान गाजवलं, एकाच षटकात ठोकले ५ षटकार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
9
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
10
नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...
11
"राज्यात गुटखाबंदी असल्याचे म्हणणं हास्यास्पद"; भाजप आमदाराने सरकारलाच घेरलं; म्हणाले, 'कुठेही जा...'
12
"बाळासाहेब म्हणाले, उद्या मी शिवसेना सोडली तर...?"; निष्ठेचा मुद्दा, अंबादास दानवेंनी सांगितला २००४ मधील किस्सा
13
इस्रायलचा सीरियावर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?
14
Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद
15
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा कापरा आवाज...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
16
Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही...
17
सावधान! खोटे टॅक्स क्लेम केलेल्यांना आयकरच्या AI ने पकडले; भरावा लागेल २००% दंड आणि ७ वर्षांपर्यंत जेल!
18
माता न तू वैरिणी! प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; ६ वर्षांच्या चिमुकलीला आईनंच संपवलं
19
Ritual: तीर्थक्षेत्री गेल्यावर अचानक पाळी आली तर दर्शन घ्यावे की नाही? प्रेमानंद महाराजांनी केला खुलासा!
20
इंदूर सलग आठव्यांदा ठरलं भारतातील सर्वात स्वच्छ शहर, महाराष्ट्रातील या शहरानं पटकावला तिसरा क्रमांक  

महाड तालुक्यात विंचुदंशाने दगावण्याच्या प्रमाणात घट

By admin | Updated: May 10, 2016 02:07 IST

महाड तालुक्याच्या ग्रामीण भागात सध्या विंचुदंशाच्या घटनांमध्ये होणारी वाढ चिंतेची बाब बनली असून, वाढती उष्णता दिवसेंदिवस ग्रामीण भागातील जनतेच्या जीवावर बेतण्याची भीती व्यक्त केली जात आहे

महाड : महाड तालुक्याच्या ग्रामीण भागात सध्या विंचुदंशाच्या घटनांमध्ये होणारी वाढ चिंतेची बाब बनली असून, वाढती उष्णता दिवसेंदिवस ग्रामीण भागातील जनतेच्या जीवावर बेतण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वाढत्या उष्णतेमुळे सायंकाळच्या सुमारास गारव्यासाठी हे विंचू जमिनीबाहेर पडतात व पादचाऱ्यांना ते दंश करतात. अशा विंचुदंशामुळे अनेक रुग्णांची प्रकृती गंभीर बनते, मात्र प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयात विंचुदंश प्रतिबंधक लस सहज उपलब्ध होत असल्याने दंश झालेल्या रुग्णांना दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. शासकीय रुग्णालयात ही लस गेल्या काही वर्षांपासून सहज उपलब्ध होत असल्याने विंचुदंश झालेल्या रुग्णांच्या दगावण्याच्या संख्येत कमालीची घट झाली असल्याची माहितीही डॉ. बाविस्कर यांनी ‘लोकमत’ला दिलीगेल्या १५-२० दिवसांपासून महाड तालुक्यात वाढणाऱ्या तापमानामुळे तर विंचुदंशाच्या दररोज सरासरी पाच ते सहा रुग्ण शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत आहेत. मात्र त्वरित उपचारामुळे अत्यंत गंभीर अवस्थेतील रुग्णदेखील सुस्थितीत येतील, मात्र विंचुदंशामुळे रुग्ण दगावण्याची घटना क्वचितच घडते. बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या दररोज विंचुदंशाचे तीन रुग्ण हमखास येतात. त्यांच्यावर या ठिकाणी योग्य रीतीने उपचार केले जातात. वाळण, बिरवाडी, वरंध, दासगांव विभागातील पोलादपूर तालुक्यातील सवांद, धारवली या परिसरातील देखील विंचुदंश झालेल्या रुग्णांवर बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केले जातात, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. ई. सी. बिरादार यांनी दिली.आॅक्टोबरसह मे महिन्यात महाड तालुक्यासह संपूर्ण कोकणात विंचुदंश व सर्पदंशाच्या घटना अधिक घडतात. मात्र अशा रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र व शासकीय रुग्णालयातच उपचारासाठी दाखल करावे, असे आवाहन विंचुदंश संशोधक डॉ. हिंमतराव बावस्कर यांनी केले आहे. विंचुदंश प्रभावी अशी हाफकिनची लस केवळ शासकीय रुग्णालयातच सहज उपलब्ध असते. (वार्ताहर)