शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
2
“निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल”; कुणाल कामराची टीका
3
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
4
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
5
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
6
मी काय बोललो समजलं का? धर्मेंद्र यांच्या प्रकरणावरुन 'भिडू'ने पापाराझींची मराठीत घेतली शाळा
7
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
8
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
9
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
10
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोळ्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
11
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
12
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
13
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
14
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
15
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
16
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
18
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
19
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
20
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
Daily Top 2Weekly Top 5

महाडमध्ये थकबाकीदारांचा वीजपुरवठा तोडण्यास सुरुवात; यादीत ३० हजार ग्राहक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 00:33 IST

महावितरणकडून कारवाई सुरू; ३७० जणांचा वीजपुरवठा खंडित

लोकमत न्यूज नेटवर्कदासगाव : कोरोनाच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात वीजबिल थकले होते. सरकारने वारंवार ग्राहकांना दिलासा देण्याचे नेहमी आश्वासन दिले. आठ दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्र्यांनी वीजबिल थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित केला जाणार नाही, अशी घोषणा केली होती. मात्र अचानक ऊर्जामंत्र्यांनी थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश दिल्याने महाड तालुक्यात वीजबिल थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे काम महावितरणकडून करण्यात येत आहे. गुरुवारी संध्याकाळपर्यंत महाड तालुक्यात ३७० थकीत वीजबिल ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याची माहिती महावितरण सूत्राकडून देण्यात आली.

कोरोना महामारीच्या काळात जवळपास नऊ महिने वीजबिल महावितरणच्या ऑफिसमध्ये भरण्याची प्रक्रिया बंद होती. ऑनलाइन वीजबिल स्वीकारली जात होती. वीजग्राहकांचा समज होता की या काळातील वीजबिल माफ होतील किंवा यामध्ये काहीतरी सूट देण्यात येईल. मात्र असे न होता अचानक ७ ते ८ महिन्यांची बिलं भरमसाठ आली. वीजग्राहकांनी कल्पनाही केली नव्हती एवढी बिलं येतील. दर महिना येणाऱ्या बिलामध्ये दुपटीने वाढ झाली. बिलवाढीची तक्रार संपूर्ण महाराष्ट्रात येऊ लागली. बिल कमी करण्यासाठी महावितरणाच्या कार्यालयामध्ये नागरिकांच्या रांगा लागू लागल्या. मात्र कार्यालयामध्ये थातूरमातूर उत्तर देऊन ग्राहकांची समज काढत तुम्हाला बिल भरावी लागतील, असे सांगून परत पाठवले जात होते. आजपर्यंत कोणत्याही थकबाकी वीजग्राहकाला महावितरणच्या कार्यालयामधून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात महावितरणचे वीजबिल बाकी राहिलेली आहे. कोरोना महामारी अगोदर दर महिने येणारे वीजबिल कमी येत होते मग अचानक दुपटीने ही वीजबिल वाढली कशी? याचे उत्तर आजही महावितरणकडे नाही. थोडक्यात पाहिले तर सरकारने कोरोनाच्या काळात लॉकडाऊन करून वीजग्राहकांवर अन्यायच केला आहे. ऊर्जामंत्र्यांच्या आदेशानंतर संपूर्ण महाराष्ट्रात महावितरणने गुरुवारपासून वीजबिल थकीत असलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे काम सुरू केले आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई