शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

बोल बजरंग बली की जय...

By admin | Updated: September 7, 2015 04:02 IST

गोविंदा रे गोपाळा...असा जयघोष करीत बालगोपाळांनी दहीहंड्या फोडून कृष्णजन्मोत्सव साजरा केला. रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी आठ हजार ५८७ दहीहंड्या लावण्यात आल्या होत्या

अलिबाग : गोविंदा रे गोपाळा...असा जयघोष करीत बालगोपाळांनी दहीहंड्या फोडून कृष्णजन्मोत्सव साजरा केला. रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी आठ हजार ५८७ दहीहंड्या लावण्यात आल्या होत्या. विविध गोविंदा पथकांनी या हंड्या फोडून लोणी आणि लाखो रुपयांच्या बक्षिसांची चांगलीच लयलूट केली.शुक्रवारी रात्री १२ वाजल्यानंतर श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा केल्यानंतर अलिबागचे लक्ष्मीनारायण मंदिर, नागाव, चौल, वरसोली, खंडाळे, खारेपाट विभागासह अन्य ठिकाणी दहीहंड्या फोडण्यात आल्या. यानिमित्ताने कृष्ण पुराणाचे वाचनही करण्यात आले. अलिबाग कोळीवाडा येथील नवजागृती मित्रमंडळाने पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीचा देखावा तयार केला होता. तो पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. रायगड जिल्ह्यात दोन हजार २३३ सार्वजनिक, तर सहा हजार ३५४ दहीहंड्या फोडण्यात आल्या. दहीहंड्या फोडण्यासाठी सकाळपासूनच बालगोपाळांची धूम सुरु होती. विविध गोविंदा पथकांचे जथ्थेच्या जथ्ये गल्लीबोळात, चौकात, नाक्यांवर दिसून येत होती. तुझ्या घरात नाही पाणी घागर उतानी रे गोपाळा... असे गीत गात घराघरांमध्ये पाणी मागितले. या पथकांमध्ये लहान मुलांपासून वरिष्ठांनीही हजेरी लावल्याचे दिसून आले.रविवार सुट्टी आणि गोपाळकाला असा योग जुळून आल्याने अलिबागला पर्यटकांनीही हजेरी लावली होती. त्यामुळे स्थानिकांसह पर्यटकांनी समुद्र किनारी गर्दी केली होती. काहींनी समुद्रस्नानाचाही आनंद लुटला. पर्यटकांमुळे येथे असणारे भेळपुरी, पाणीपुरी, पावभाजी यांचे स्टॉल फुलून गेले होते. (प्रतिनिधी)१नेरळ : येथे गेल्या ८५ वर्षांपासून कृष्णजन्माष्टमीचा उत्सव राऊत कुटुंबीय गुण्यागोविंदाने मोठ्या उत्साहात साजरा करतात. आज या उत्सवात त्यांची चौथी पिढी सहभागी झाली आहे. कर्जत तालुक्यातील भिसेगावातील निशिकांत राऊत यांच्या घरी दरवर्षी हा उत्सव कृष्णजन्माष्टमीच्या दिवशी साजरा केला जातो. या उत्सवाला गावातील व परिसरातील बाळगोपाळ, तरु ण मंडळी, महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने हजेरी लावतात.२उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मानाची दहीहंडी फोडल्यानंतर गावातील बाळगोपाळ उर्वरित हंड्या फोडतात. राऊत कुटुंबीयांच्या घरातील सुशीला राऊत यांनी त्यांचे सासरे गोपाळ वाळकू राऊत यांनी गणेशोत्सवात आपल्या घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यासाठी उल्हास नदीवर गेले होते. त्या ठिकाणी मूठभर वाळू काढण्यासाठी नदीच्या पात्रात हात टाकला असता त्यांच्या हातात एक सुंदर अशी सुबक बाळकृष्णाची मूर्ती सापडली. त्यांनी ती मूर्ती घरी आणून देवघरात ठेवून पूजाविधी केला. तेव्हापासून जन्माष्टमीचा उत्सव सुरु झाला आहे. ३आज या उत्सवाला ८५ वर्षे पूर्ण होत असल्याचे चंद्रकांत राऊत यांनी सांगितले. जन्माष्टमीच्या दिवशी नदीच्या पात्रात सापडलेल्या कृष्णमूर्तीचा पूजाविधी केला जातो व रात्री १२ वाजता ती मूर्ती पाळण्यात ठेवून पाळणा म्हटला जातो. गावातील सर्व मंडळी उत्सवाला हजेरी लावतात.४या उत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे गावातील व परिसरातील नवोदित दाम्पत्य अपत्य लाभासाठी बाळकृष्णाचे दर्शन घेतल्यानंतर पाळणा हलविण्याची प्रथा आजही कायम आहे. त्यामुळे कृष्णाला पाळण्यात ठेवल्यानंतर नवोदित दाम्पत्य पाळणा हलविण्यासाठी गर्दी करतात.