शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

बोल बजरंग बली की जय...

By admin | Updated: September 7, 2015 04:02 IST

गोविंदा रे गोपाळा...असा जयघोष करीत बालगोपाळांनी दहीहंड्या फोडून कृष्णजन्मोत्सव साजरा केला. रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी आठ हजार ५८७ दहीहंड्या लावण्यात आल्या होत्या

अलिबाग : गोविंदा रे गोपाळा...असा जयघोष करीत बालगोपाळांनी दहीहंड्या फोडून कृष्णजन्मोत्सव साजरा केला. रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी आठ हजार ५८७ दहीहंड्या लावण्यात आल्या होत्या. विविध गोविंदा पथकांनी या हंड्या फोडून लोणी आणि लाखो रुपयांच्या बक्षिसांची चांगलीच लयलूट केली.शुक्रवारी रात्री १२ वाजल्यानंतर श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा केल्यानंतर अलिबागचे लक्ष्मीनारायण मंदिर, नागाव, चौल, वरसोली, खंडाळे, खारेपाट विभागासह अन्य ठिकाणी दहीहंड्या फोडण्यात आल्या. यानिमित्ताने कृष्ण पुराणाचे वाचनही करण्यात आले. अलिबाग कोळीवाडा येथील नवजागृती मित्रमंडळाने पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीचा देखावा तयार केला होता. तो पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. रायगड जिल्ह्यात दोन हजार २३३ सार्वजनिक, तर सहा हजार ३५४ दहीहंड्या फोडण्यात आल्या. दहीहंड्या फोडण्यासाठी सकाळपासूनच बालगोपाळांची धूम सुरु होती. विविध गोविंदा पथकांचे जथ्थेच्या जथ्ये गल्लीबोळात, चौकात, नाक्यांवर दिसून येत होती. तुझ्या घरात नाही पाणी घागर उतानी रे गोपाळा... असे गीत गात घराघरांमध्ये पाणी मागितले. या पथकांमध्ये लहान मुलांपासून वरिष्ठांनीही हजेरी लावल्याचे दिसून आले.रविवार सुट्टी आणि गोपाळकाला असा योग जुळून आल्याने अलिबागला पर्यटकांनीही हजेरी लावली होती. त्यामुळे स्थानिकांसह पर्यटकांनी समुद्र किनारी गर्दी केली होती. काहींनी समुद्रस्नानाचाही आनंद लुटला. पर्यटकांमुळे येथे असणारे भेळपुरी, पाणीपुरी, पावभाजी यांचे स्टॉल फुलून गेले होते. (प्रतिनिधी)१नेरळ : येथे गेल्या ८५ वर्षांपासून कृष्णजन्माष्टमीचा उत्सव राऊत कुटुंबीय गुण्यागोविंदाने मोठ्या उत्साहात साजरा करतात. आज या उत्सवात त्यांची चौथी पिढी सहभागी झाली आहे. कर्जत तालुक्यातील भिसेगावातील निशिकांत राऊत यांच्या घरी दरवर्षी हा उत्सव कृष्णजन्माष्टमीच्या दिवशी साजरा केला जातो. या उत्सवाला गावातील व परिसरातील बाळगोपाळ, तरु ण मंडळी, महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने हजेरी लावतात.२उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मानाची दहीहंडी फोडल्यानंतर गावातील बाळगोपाळ उर्वरित हंड्या फोडतात. राऊत कुटुंबीयांच्या घरातील सुशीला राऊत यांनी त्यांचे सासरे गोपाळ वाळकू राऊत यांनी गणेशोत्सवात आपल्या घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यासाठी उल्हास नदीवर गेले होते. त्या ठिकाणी मूठभर वाळू काढण्यासाठी नदीच्या पात्रात हात टाकला असता त्यांच्या हातात एक सुंदर अशी सुबक बाळकृष्णाची मूर्ती सापडली. त्यांनी ती मूर्ती घरी आणून देवघरात ठेवून पूजाविधी केला. तेव्हापासून जन्माष्टमीचा उत्सव सुरु झाला आहे. ३आज या उत्सवाला ८५ वर्षे पूर्ण होत असल्याचे चंद्रकांत राऊत यांनी सांगितले. जन्माष्टमीच्या दिवशी नदीच्या पात्रात सापडलेल्या कृष्णमूर्तीचा पूजाविधी केला जातो व रात्री १२ वाजता ती मूर्ती पाळण्यात ठेवून पाळणा म्हटला जातो. गावातील सर्व मंडळी उत्सवाला हजेरी लावतात.४या उत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे गावातील व परिसरातील नवोदित दाम्पत्य अपत्य लाभासाठी बाळकृष्णाचे दर्शन घेतल्यानंतर पाळणा हलविण्याची प्रथा आजही कायम आहे. त्यामुळे कृष्णाला पाळण्यात ठेवल्यानंतर नवोदित दाम्पत्य पाळणा हलविण्यासाठी गर्दी करतात.