शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

फुकट्यांमुळे तोट्यातील उपक्रम घाट्यात; एनएनएमटी प्रशासन हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 23:16 IST

दोन वर्षांत ७,८८० प्रवाशांवर दंडात्मक कारवाई

नवी मुंबई : अगोदरच तोट्यात असलेल्या एनएमएमटीला फुकट्या प्रवाशांमुळेही घाटा बसू लागला आहे. अशा फुकट्यांना आळा घालण्याच्या प्रयत्नात मागील दोन वर्षांत ७,८८० प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे; परंतु सततच्या कारवाईनंतरही फुकट्या प्रवाशांची संख्या घटत नसल्याने प्रशासन हतबल झाले आहे.

नवी मुंबई महापालिकेने शहरवासीयांच्या सोयीसाठी सुरू केलेला परिवहन उपक्रम सुरुवातीपासूनच तोट्यात आहे; परंतु प्रवाशांची सोय म्हणून ही सार्वजनिक दळणवळण व्यवस्था टिकवून ठेवण्यात आली आहे. अशातच परिवहनच्या तोट्यात भर टाकण्याचे काम फुकट्या प्रवाशांकडून केले जात आहे. त्यामुळे उपक्रम अधिकच घाट्यात चालल्याचे दिसून येत आहे. अशा फुकट्या प्रवाशांचा शोध घेण्यासाठी परिवहनकडून विविध मार्गांवर तिकीट तपासणीसांद्वारे मोहीम राबवली जाते. मागील दोन वर्षांत ७,८८० प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये २०१८ मध्ये ३,८१३ प्रवाशांकडून पाच लाख ६६ हजार ७८३ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर गतवर्षात ४,०६१ प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्याकडून पाच लाख ९४ हजार २०९ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. शहरातील गर्दीच्या मार्गावर तसेच शहराबाहेर जाणाऱ्या काही मार्गावर हे प्रवासी आढळून आले आहेत. गर्दीचा फायदा घेऊन विनातिकीट प्रवास केला जातो. अनेकदा वाहकाने प्रवाशाकडे तिकिटाबाबत चौकशी केल्यास त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. अशा वेळी वाहकाने वाद घातल्यास त्यांनाच फुकट्या प्रवाशांच्या दमदाटीलाही सामोरे जावे लागते. त्यामध्ये महाविद्यालयीन तरुणांचाही सर्वाधिक सहभाग दिसून येत आहे. तर वर्षभर करण्यात आलेल्या कारवार्इंमध्ये मार्च, एप्रिल व आॅगस्ट ते डिसेंबर दरम्यान सर्वाधिक फुकटे प्रवासी आढळून आले आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईnmmcनवी मुंबई महापालिका