शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया

By admin | Updated: April 16, 2017 04:40 IST

कळंबोली सर्कलगत असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीला गळती लागल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली

कळंबोली : कळंबोली सर्कलगत असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीला गळती लागल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली पाण्याचे डोह साचले आहे. एकीकडे पाणीटंचाई जाणवत असताना दुसरीकडे अशाप्रकारे लाखो लिटर पाणी वाया जात असल्याबद्दल नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. वारंवार दुरुस्ती करूनही गळती होत असल्याने एमजेपीही हतबल झाल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून भोकरपाडा ते जेएनपीटी आणि कळंबोली या दरम्यान ३५ वर्षांपूर्वी जलवाहिनी टाकण्यात आली होती. आजघडीला ती अतिशय जुनाट आणि जर्जर झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी गळती लागून कारंजे उडताना दिसतात. जवळपास २५ टक्के पाण्याची गळती होत आहे. कळंबोली स्टील मार्केट परिसरात तर वाहनचालक, झोपडपट्टीवासी जाणूनबुजून जलवाहिन्या फोडत असल्याच्या तक्र ारी येत आहेत. द्रुतगती महामार्गालगत असलेल्या एमजेपीच्या जलवाहिनीला गेल्या अनेक वर्षांपासून फुटीचे ग्रहण लागले आहे. येथून मोठ्या प्रमाणात पाणी पुलाखालील खड्ड्यात पडते. त्या ठिकाणी गेल्यानंतर कडक उन्हाळ्यातही पावसाळा आहे की, असा भास होतो. सध्या पनवेल शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. दुसरीकडे सिडको वसाहतीत मागणीप्रमाणे पाणी मिळत नाही, ही वस्तुस्थिती असताना कळंबोली पुलाखाली लाखो लिटर पाणी साचलेले आहे. त्याचा वापर कशासाठीही करता येत नसल्याची खंत शंकर वीरकर या रहिवाशांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे, जलशुद्धीकरण केंद्रात स्वच्छ केलेल्या पिण्याच्या पाण्याचा अशा प्रकारे अपव्यय होऊ देणे अतिशय चुकीची बाब असल्याचे मत खांदा वसाहतीतील सविता मिसाळ यांनी व्यक्त केले.