शहरं
Join us  
Trending Stories
1
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
2
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
3
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
4
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
5
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
6
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
7
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
8
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
9
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
10
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
11
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
12
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
13
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
14
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
15
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
16
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
17
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
18
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
19
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
20
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...

गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया

By admin | Updated: April 16, 2017 04:40 IST

कळंबोली सर्कलगत असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीला गळती लागल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली

कळंबोली : कळंबोली सर्कलगत असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीला गळती लागल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली पाण्याचे डोह साचले आहे. एकीकडे पाणीटंचाई जाणवत असताना दुसरीकडे अशाप्रकारे लाखो लिटर पाणी वाया जात असल्याबद्दल नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. वारंवार दुरुस्ती करूनही गळती होत असल्याने एमजेपीही हतबल झाल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून भोकरपाडा ते जेएनपीटी आणि कळंबोली या दरम्यान ३५ वर्षांपूर्वी जलवाहिनी टाकण्यात आली होती. आजघडीला ती अतिशय जुनाट आणि जर्जर झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी गळती लागून कारंजे उडताना दिसतात. जवळपास २५ टक्के पाण्याची गळती होत आहे. कळंबोली स्टील मार्केट परिसरात तर वाहनचालक, झोपडपट्टीवासी जाणूनबुजून जलवाहिन्या फोडत असल्याच्या तक्र ारी येत आहेत. द्रुतगती महामार्गालगत असलेल्या एमजेपीच्या जलवाहिनीला गेल्या अनेक वर्षांपासून फुटीचे ग्रहण लागले आहे. येथून मोठ्या प्रमाणात पाणी पुलाखालील खड्ड्यात पडते. त्या ठिकाणी गेल्यानंतर कडक उन्हाळ्यातही पावसाळा आहे की, असा भास होतो. सध्या पनवेल शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. दुसरीकडे सिडको वसाहतीत मागणीप्रमाणे पाणी मिळत नाही, ही वस्तुस्थिती असताना कळंबोली पुलाखाली लाखो लिटर पाणी साचलेले आहे. त्याचा वापर कशासाठीही करता येत नसल्याची खंत शंकर वीरकर या रहिवाशांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे, जलशुद्धीकरण केंद्रात स्वच्छ केलेल्या पिण्याच्या पाण्याचा अशा प्रकारे अपव्यय होऊ देणे अतिशय चुकीची बाब असल्याचे मत खांदा वसाहतीतील सविता मिसाळ यांनी व्यक्त केले.