शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

भाजपा सरकारच्या काळात देशाची लूट; चार वर्षांत इंधनदर २५ रुपयांनी वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 05:59 IST

चार वर्षांत राज्यातील आणि देशातील जनतेची भयंकर लूट या दोन्ही सरकारने केली आहे. चार वर्षांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये सुमारे २५ रु पयांनी वाढ झाली आहे.

नवी मुंबई : चार वर्षांत राज्यातील आणि देशातील जनतेची भयंकर लूट या दोन्ही सरकारने केली आहे. चार वर्षांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये सुमारे २५ रु पयांनी वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या करातून या सरकारने १५ लाख कोटी रु पयांपेक्षा जास्त रक्कम देशातील सामान्य जनतेच्या खिशातून कमावल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. शुक्रवार, ५ आॅक्टोबरला वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात नवी मुंबई राष्ट्रवादीच्या जिल्हाकार्यकारिणीची बैठकी वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे पाटील यांनी भाजपा सरकारवर केला. या वेळी माजी मंत्री गणेश नाईक, सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव उपस्थित होते.महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथील स्मारक उभे करण्यासाठी राज्य गहाण ठेवण्याची भाषा राज्याचे मुख्यमंत्री करीत आहेत, म्हणजेच राज्याची अर्थव्यवस्था अडचणीत असल्याचे स्पष्ट होत आहे. डॉ. आंबेडकरांची दहा स्मारके उभी करण्याची अर्थव्यवस्थेची ताकद होती; परंतु गेल्या साडेतीन-चार वर्षांत इंदू मिल विषयाबाबत काहीच केले नाही, आता निवडणुका जवळ आल्यावर राज्य गहाण ठेवू; पण आम्ही स्मारक करू, असे म्हणण्याची भाषा म्हणजे स्मारक करण्याचा विचार मनातच नसल्याचे त्यांनी सांगितले. इतर दुसऱ्या स्मारकांसाठी वारेमाप पैसा उधळताना राज्य गहाण ठेवण्याची बुद्धी झाली नाही; परंतु महामानवाचे स्मारक उभारताना तिजोरीत खणखणाट आहे, हे कळायला लागले असल्याचे सांगत, भाजपा आणि शिवसेना सरकारची स्मारक उभे करण्याची इच्छाच नव्हती, असा आरोप पाटील यांनी राज्य सरकारवर केला आहे.एमआयएम आणि भारिप एकत्र आल्याने इतर कोणत्या पक्षाचा फायदा आणि तोटा होणार नसून, समविचारी पक्ष म्हणून भारिप काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आल्यास भाजपाचा तोटा होईल आणि भारिपने काही कारण दाखवून निवडणूक स्वतंत्र लढवली, तर भाजपाचा फायदा होईल, असे भाकीतही पाटील यांनी या वेळी केले. मनसेबरोबर अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, तसेच संपर्कदेखील केलेला नाही या बाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असे पाटील यांनी सांगितले.जर भाजपा आणि शिवसेनेचा पराभव करायचा असेल तर सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन पाटील यांनी केले; परंतु असे झाले नाही, तर भाजपाच्या फायद्यासाठी कोण स्वतंत्रपणे उभे राहिले आहेत, याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जनतेला पटवून सांगणार असून, राज्यातील जनता तेवढे समजून घेईल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.विरोधी पक्षात असल्याने निवडणुकांना सामोरे जाताना या सरकारने काय केले, यापेक्षा आम्ही काय करणार आहोत, हे नागरिकांसमोर मांडणार असल्याचे पाटील म्हणाले. प्रभाव कमी होत असल्याचे लक्षात येत असल्याने भाजपा आणि शिवसेना पक्षांकडून काही आमदार आमच्या संपर्कात आहेत, असे सांगितले जात असल्याचे पाटील यांनी सांगितले.मुख्यमंत्र्यांचा गट हा आयारामांचाभाजपाने आयारामांना एकत्रित केले आहे. भाजपामध्ये मुख्यमंत्र्यांचा गट हा आयारामांचा गट असून, भाजपाचे निष्ठावंत मुख्यमंत्र्यांच्या गटात नाहीत. बाहेरून आलेले मुख्यमंत्र्यांच्या गटाचे सामर्थ्यवान प्रतिनिधित्व करीत असून, भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते मागच्या खुर्चीत बसलेले असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.राष्ट्रवादीच्या पदाधिकाºयांची हजेरीनवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नवी मुंबई जिल्हा, तालुका पातळीवरील पदाधिकाºयांची प्रत्येकाच्या नावानिशी हजेरी घेतली, यामध्ये काही पदाधिकारी गैरहजर असल्याचे लक्षात आले. सभागृहात सुरू असलेली हजेरी पाहून उपस्थित पदाधिकाºयांना धडकी भरली होती.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई